शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालात शाळांच्या चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे शाळा स्तरावरील ...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे शाळा स्तरावरील काम पूर्ण झाले असून, सध्या शाळांकडून झालेल्या चुकांच्या दुरुस्तीचे काम विभागीय मंडळांकडून केले जात आहे. तसेच राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांना विविध सवलतीचे गुण देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी शासनाने व राज्य मंडळाने विशिष्ट कार्यपद्धती तयार केली होती. परंतु, वेळ कमी असल्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांना निकाल तयार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. त्यात शाळांकडून काही चुकीची माहिती राज्य मंडळाकडे पाठविण्यात आली. त्यामुळे निकालास काहीसा विलंब होऊ शकतो, अशी चर्चा केली जात आहे.

------

मूल्यांकन प्रक्रियेत कोणत्या चुका?

- एका विषयाचे गुण दुसऱ्याच विषयाला दिले.

- सर्व विषयांच्या गुणांची बेरीज न करता माहिती केली सुपूर्द.

- टाईपिंग मिस्टेकमुळे विद्यार्थ्यांना दिले गेले कमी गुण.

- विद्यार्थ्यांचा अर्ज दोन वेळा नोंदविला गेल्याने दिसले पेंडिंग विद्यार्थी

---------------------

पुणे विभागातील दहावीचे एकूण विद्यार्थी : २,७१,५०३

मुले : १,५०,६९०

मुली : १,२०,७९७

मूल्यांकन झालेल्या शाळा : १०० टक्के

--------------------

शाळांनी मूल्यमापनाचे काम पूर्ण केले असून काही किरकोळ कामे बाकी आहेत. तसेच राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जात असून, सध्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आदी सवलतीचे गुण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात दहावीचा निकाल प्रसिद्ध करता येऊ शकतो, असे राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------------------

अंतर्गत मूल्यमापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थी परगावी गेल्यामुळे त्यांचे मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावे लागले. विद्यार्थ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने काही विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागले. मूल्यमापनाबाबत विद्यार्थी व पालक कोणतीही कल्पना नसल्याचे निदर्शनास आले.

- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदराबाई मराठे विद्यालय

-------------

शाळांकडून झालेल्या काही चुकांची दुरुस्ती करण्याचे काम विभागीय मंडळ पातळीवर सुरू आहे. गुण भरताना चुका होणे, सर्व विषयांची बेरीज न तपासणे, अशा चुका शाळांकडून झाल्या आहेत. मूळ कागदपत्र पाहून या चुका दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ