शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

दहावीच्या निकालात शाळांच्या चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे शाळा स्तरावरील ...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे शाळा स्तरावरील काम पूर्ण झाले असून, सध्या शाळांकडून झालेल्या चुकांच्या दुरुस्तीचे काम विभागीय मंडळांकडून केले जात आहे. तसेच राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांना विविध सवलतीचे गुण देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी शासनाने व राज्य मंडळाने विशिष्ट कार्यपद्धती तयार केली होती. परंतु, वेळ कमी असल्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांना निकाल तयार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. त्यात शाळांकडून काही चुकीची माहिती राज्य मंडळाकडे पाठविण्यात आली. त्यामुळे निकालास काहीसा विलंब होऊ शकतो, अशी चर्चा केली जात आहे.

------

मूल्यांकन प्रक्रियेत कोणत्या चुका?

- एका विषयाचे गुण दुसऱ्याच विषयाला दिले.

- सर्व विषयांच्या गुणांची बेरीज न करता माहिती केली सुपूर्द.

- टाईपिंग मिस्टेकमुळे विद्यार्थ्यांना दिले गेले कमी गुण.

- विद्यार्थ्यांचा अर्ज दोन वेळा नोंदविला गेल्याने दिसले पेंडिंग विद्यार्थी

---------------------

पुणे विभागातील दहावीचे एकूण विद्यार्थी : २,७१,५०३

मुले : १,५०,६९०

मुली : १,२०,७९७

मूल्यांकन झालेल्या शाळा : १०० टक्के

--------------------

शाळांनी मूल्यमापनाचे काम पूर्ण केले असून काही किरकोळ कामे बाकी आहेत. तसेच राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जात असून, सध्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आदी सवलतीचे गुण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात दहावीचा निकाल प्रसिद्ध करता येऊ शकतो, असे राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------------------

अंतर्गत मूल्यमापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थी परगावी गेल्यामुळे त्यांचे मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावे लागले. विद्यार्थ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने काही विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागले. मूल्यमापनाबाबत विद्यार्थी व पालक कोणतीही कल्पना नसल्याचे निदर्शनास आले.

- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदराबाई मराठे विद्यालय

-------------

शाळांकडून झालेल्या काही चुकांची दुरुस्ती करण्याचे काम विभागीय मंडळ पातळीवर सुरू आहे. गुण भरताना चुका होणे, सर्व विषयांची बेरीज न तपासणे, अशा चुका शाळांकडून झाल्या आहेत. मूळ कागदपत्र पाहून या चुका दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ