शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

टेकड्या वाचवा, तरच मत देऊ ! पुण्यातील टेकडी प्रेमींचा निर्धार

By श्रीकिशन काळे | Updated: October 20, 2024 19:01 IST

पुण्यातील पर्यावरणाचा प्रश्न हा विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात यावा आणि त्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे

पुणे : हिरव्यागार टेकड्या ही पुण्याची ओळख आहे. परंतु पुणे वेगाने वाढत असून टेकड्यांवरील अतिक्रमणेही वाढली आहेत. या टेकड्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यामुळे टेकड्या वाचविण्यासाठी व टेकडीवरील प्रस्तावित तीन प्रकल्प रद्द करण्यासाठी जो उमेदवार काम करेल, त्यांनाच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही मतदान करू, असा निर्धार टेकडी प्रेमींनी रविवारी (दि.२०) केला. मोठ्या संख्येने पुणेकर टेकडीवर आले होते आणि त्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला.

वेताळ टेकडीसाठी पुणेकरांनी वेळोवेळी संरक्षण आणि जतन करण्यासाठी आंदोलने केली आहेत. आता विधानसभा निवडणूक आल्याने टेकडीप्रेमी एकत्र येत असून, ती वाचविण्यासाठी जो उमेदवार काम करेल, त्यालाच आम्ही मत देऊ, असा निर्धार नागरिकांनी यावेळी केला. रविवारी सकाळी टेकडीप्रेमींनी आपला मारुती ते खाणीपर्यंत पदयात्रा काढली. यामध्ये सहभागी झालेल्या टेकडीप्रेमींनी ‘टेकड्या वाचवा’चा संदेश लिहिलेला फलक हाती घेतला होता. सोबतच घोषणाही दिल्या. याप्रसंगी वेताळ टेकडी बचाव कृती समितीचे सदस्य सुमिता काळे, सुषमा दाते, प्रदीप घुमरे आदी उपस्थित होते. टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी या वेळी टेकड्या वाचवासाठी जो उमेदवार काम करेल, त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले. पुण्यातील पर्यावरणाचा प्रश्न हा विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात यावा आणि त्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असेही स्पष्ट केले.

ही आश्वासने घ्या !

१) पीएमपी सक्षम करावी, मेट्रोचे जाळे विस्तृत करावे, सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी२) पुण्याच्या विकास आराखड्यातून वेताळ टेकडीवरील नियोजित तिन्ही प्रकल्प रद्द करा

३) वेताळ टेकडी व इतर टेकड्यांना नैसर्गिक वारसास्थळे घोषित करावे४) पुण्यातील सर्व टेकड्या, डोंगर हे नो डेव्हलपमेंट झोन म्हणून जाहीर करा

भूजलपातळी वाढण्यासाठी प्रयत्न करा!

शहरातील ओपन अॅमेनिटीज स्पेस सक्तीने कायमस्वरूपी संरक्षित करावी. त्यामुळे भूजलपातळी वाढण्यासाठी मदत होईल. शहरामध्ये सुमारे ८०० अॅमेनिटीज स्पेस आहेत. २०० हून अधिक बागा आणि सरकारी कार्यालयाच्या समोर मोकळ्या जागा आहेत. त्या सर्व ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुण्याची भूजलपातळी चांगली राहील, अशी मागणी केली.

येत्या विधानसभेला पुणेकरांनी जो पर्यावरणासाठी काम करेल, वेताळ टेकडीच्या संरक्षणासाठी काम करेल, त्यालाच मतदान करावे. आपला उमेदवार चांगला निवडावा, कारण आपण पाहतोय पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. टेकडीवरील सर्व प्रकल्प रद्द करण्यासाठी पुणेकरांनी या मतदानाचा उपयोग करून घ्यावा. - सुषमा दाते, सदस्य, वेताळ टेकडी कृती बचाव समिती

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणNatureनिसर्गvidhan sabhaविधानसभाagitationआंदोलन