शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : शेषराव मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:45 IST

न्यायालयाचा निकाल लोकशाहीत अंतिम मानला जातो. असे असतानाही सावरकरांचे गांधी, नेहरू परिवार व काँग्रेसशी असलेले संबंध समजून न घेता त्यांच्या बदनामीची मोहिम अद्यापही का सुरू आहे? असा प्रश्न पडतो.

ठळक मुद्देसावरकरांची भूमिका गांधी अथवा काँग्रेसविरोधी नव्हती हे अनेक पत्रातून स्पष्टमृत्यूनंतरही स्वातंत्र्यवीरांची होत असलेली बदनामी माझ्या मनाला पटत नाही.

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या विचारात राष्ट्रभक्ती व राष्ट्रहित होते. हे आपण कधी समजून घेणार आहोत की नाही? सावकरांच्या विचारात देशभक्ती असेल, तर महात्मा गांधी यांच्या सारख्या व्यक्तीची हत्या करून स्वत:ला कलंकित करण्याची त्यांना इच्छा होती का? गांधीजींच्या विचारांचे समर्थन करणारे सावरकर गांधी हत्याकांडात सहभागी तरी होतील का? महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांचा दुरान्वये देखील संबंध नव्हता. न्यायालयातही तेच सिद्ध झाले. त्यामुळेच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र सावरकरांची अव्याहत बदनामी सुरू ठेवणाऱ्यांना आणखी कोणते पुरावे द्यावेत? असा खडा सवाल ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी मंगळवारी सावरकर विरोधकांसमोर उपस्थित केला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिरात आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४४ व्या ज्ञानसत्रात प्रा. मोरे यांनी चौथे पुष्प गुंफले. कै. म.म.दत्तो वामन पोतदार स्मृती व्याख्यानात ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले.     न्यायालयाचा निकाल लोकशाहीत अंतिम मानला जातो. असे असतानाही सावरकर- गांधी, सावरकर-नेहरू, सावरकर-कॉँग्रेस संबंध न समजून घेता सावरकरांच्या बदनामीची मोहिम अद्यापही का सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित करीत प्रा. मोरे म्हणाले, सावरकरांची भूमिका गांधी अथवा काँग्रेसविरोधी नव्हती, तर समर्थनाची होती. हे सावरकरांच्या अनेक पत्रातून स्पष्ट होते. गांधी हत्याकांडात सावकरांचा सहभाग होता अशी एकमेव साक्ष दिगंबर बडगे यांनी दिली होती. त्यात अनेक तफावती आहेत. कपूर आयोगानेही गांधी हत्येसंदर्भात जे निष्कर्ष काढले आहेत ते निराधार व बेकायदेशीर आहेत. कारण बडगे हे एकमेव साक्षीदार असताना कपूर आयोगाने एकदाही बडगे यांची साक्ष घेतली नाही. ही गोष्ट गंभीर आहे. सावरकरांची गांधीजींविषयीची भूमिका, न्यायालयात सादर झालेले पुरावे, तर्क वितर्क आदी सर्व बाबींचा विचार करता गांधी हत्येत सावकरांचा दुरान्वये संबंध नव्हता हेच सिद्ध होते. त्यामुळेच मृत्यूनंतरही स्वातंत्र्यवीरांची होत असलेली बदनामी माझ्या मनाला पटली नाही. सावरकरांच्या बदनामीच्या मोहिमेत सत्यता नाही म्हणून सावरकरांची खरी बाजू पुस्तकांच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर