शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सवंगड्यांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 5:50 AM

माळीण दुर्घटनेतून नशिबाने वाचलेल्या तसेच माळीण गावाच्या आजूबाजूला असलेल्या वाड्यावस्त्यांवर राहणाºया मुलांनी आपल्या सवंगड्यांच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना ताज्या केल्या

नीलेश काण्णवघोडेगाव : माळीण दुर्घटनेतून नशिबाने वाचलेल्या तसेच माळीण गावाच्या आजूबाजूला असलेल्या वाड्यावस्त्यांवर राहणाºया मुलांनी आपल्या सवंगड्यांच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना ताज्या केल्या. त्या सांगताना आजही त्यांना गहिवरून येत आहे.दुघर्टनेला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने या मुलांशी जुन्या गावातील बंद शाळेजवळ ‘लोकमत’ने संवाद साधला. या वेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. जुने मित्र, गावातील मारुतीचं मंदिर, मंदिराजवळील पटांगण, लपाछपी खेळताना पायाखाली घातलेले गाव, गावातील बैलपोळा आठवतो.आता शाळा नवीन इमारतीत भरते; परंतु, रोज या शाळेत जाण्यासाठी जुन्या गावातून जावे लागते. रस्त्याने जाताना मुलांना मातीचा ढिगारा दिसतो. मात्र त्यांच्या आवडीचे मारुती मंदिर, पटांगण, शाळेतील मित्र, गुरुजी, शाळेचे भरलेले वर्ग दिसत नाहीत.राजश्री विजय लेंभे हिला मीराबरोबर शाळेच्या पटांगणात एकत्र खेळतानाचे दिवस आठवले. लंगडी, कबड्डी खेळतानाचे दिवस, तिच्या घरी जाऊन खाल्लेला डबा आठवतो.चंद्रभागा कुमार लेंभे हिला मैत्रीण सुप्रिया पोटे आठवते. ‘ती माझी बेस्ट फे्रंड होती.पण आता आमचे मित्र आम्हाला भेटणार नाहीत, म्हणून खूप वाईट वाटते,’ असे ती सांगते.प्रवीण दिलीप लेंभे याला आपला जिवलग मित्र सागर व त्याच्याबरोबर बैलपोळ्यात केलेली मजा आठवते. ‘पोळ्याच्या दिवशी सागर आणि मी बैलांना ओढ्यावर नेऊन धुवायचो, सजवायचो, गावातून निघणाºया बैलांच्या मिरवणुकीत नाचायचो आणि संध्याकाळी पोटभोर पोळ्या खायचो. पोळा आला की मला सागर आठवतो’, अशी आठवण प्रवीणने सांगितली.त्याचबरोबर प्रज्वल दिनेश लेंभे, दीपाली विजय लेंभे, जयश्री बुधाजी लेंभे, सचिन संदीप लेंभे, संकेश बुधाजी लेंभे या मुलांनी गावातील यात्रा व बैलपोळ्याविषयीच्या आठवणी सांगितल्या.