शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सासवडकरांना मिळणार दोन दिवसाआड पाणी; पाण्याचा जपून वापर करा, मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 20:19 IST

पाणी जपून वापरा: नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन...

सासवड (पुणे) : सासवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे गराडे आणि घोरवडी ही दोन धरणे पूर्णपणे आटली आहेत. सध्या वीर धरणावरून पाणीपुरवठा केला जात असून पावसाने अद्यापही ओढ दिल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर नागरिकांवर मोठ्या संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. उपलब्ध पाणीसाठा पाऊस होईपर्यंत पुरण्यासाठी यापुढे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सासवड नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.

गराडे, घोरवडी, सिद्धेश्वर जलाशयातील उपलब्ध पाणी स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी आवश्यक असल्याने तेथील पाणी उपसा बंद करण्याच्या पाटबंधारे विभागाने लेखी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता केवळ वीर धरणाच्या पाण्यावर सासवडचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने सासवड शहराचा नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड होता. दि.१९ पासून दोन दिवसाआड केल्याचे सासवड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दवंडीद्वारे जाहीर केले. लांबलेल्या पावसाने पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सासवड शहरास ऐन पावसाळ्यात टंचाईच्या झळा बसतानाच विस्कळित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागण्याचे संकट आले आहे.

सासवड शहरास एकमेव वीर धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या वीर धरणात सासवडला पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे; परंतु पावसाळा असूनही पाऊसच पडत नसल्याने पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच, पाऊस सुरू झाला तरी पाणीसाठा होण्यास काही दिवस लागतील आणि पाऊसच झाला नाही तर पाणी टंचाईचे संकट आणखी वाढण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाणी पुढील साठा होईपर्यंत नागरिकांना पिण्यासाठी मिळाले पाहिजे यासाठी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संकेत नंदवंशी यांनी दिली आहे.

सासवडला पाणीपुरवठा करणारे गराडे धरण दोन महिन्यांपूर्वीच कोरडे पडल्याने तेव्हापासून पाणी उपसा बंद केला आहे. तसेच घोरवडी धरणात पाणी उपलब्ध असेपर्यंत त्यातील उपसा सुरूच होता; परंतु सध्या घोरवडी धरण पूर्णपणे आटले आहे. वीर धरणात ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पावसाने ताण दिल्याने दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सद्यःस्थितीत सर्व यंत्रणा सुरळीत चालू आहे. वादळी वारे येणे किंवा तांत्रिक बिघाड अथवा विद्युत बिघाड झाला तरच व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने नागरिकांनी पाणी वाया न घालविता जपून वापर करावा.

- निखिल मोरे, मुख्याधिकारी, नगरपालिका, सासवड.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे