शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

सासवडकरांना मिळणार दोन दिवसाआड पाणी; पाण्याचा जपून वापर करा, मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 20:19 IST

पाणी जपून वापरा: नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन...

सासवड (पुणे) : सासवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे गराडे आणि घोरवडी ही दोन धरणे पूर्णपणे आटली आहेत. सध्या वीर धरणावरून पाणीपुरवठा केला जात असून पावसाने अद्यापही ओढ दिल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर नागरिकांवर मोठ्या संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. उपलब्ध पाणीसाठा पाऊस होईपर्यंत पुरण्यासाठी यापुढे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सासवड नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.

गराडे, घोरवडी, सिद्धेश्वर जलाशयातील उपलब्ध पाणी स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी आवश्यक असल्याने तेथील पाणी उपसा बंद करण्याच्या पाटबंधारे विभागाने लेखी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता केवळ वीर धरणाच्या पाण्यावर सासवडचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने सासवड शहराचा नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड होता. दि.१९ पासून दोन दिवसाआड केल्याचे सासवड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दवंडीद्वारे जाहीर केले. लांबलेल्या पावसाने पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सासवड शहरास ऐन पावसाळ्यात टंचाईच्या झळा बसतानाच विस्कळित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागण्याचे संकट आले आहे.

सासवड शहरास एकमेव वीर धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या वीर धरणात सासवडला पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे; परंतु पावसाळा असूनही पाऊसच पडत नसल्याने पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच, पाऊस सुरू झाला तरी पाणीसाठा होण्यास काही दिवस लागतील आणि पाऊसच झाला नाही तर पाणी टंचाईचे संकट आणखी वाढण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाणी पुढील साठा होईपर्यंत नागरिकांना पिण्यासाठी मिळाले पाहिजे यासाठी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संकेत नंदवंशी यांनी दिली आहे.

सासवडला पाणीपुरवठा करणारे गराडे धरण दोन महिन्यांपूर्वीच कोरडे पडल्याने तेव्हापासून पाणी उपसा बंद केला आहे. तसेच घोरवडी धरणात पाणी उपलब्ध असेपर्यंत त्यातील उपसा सुरूच होता; परंतु सध्या घोरवडी धरण पूर्णपणे आटले आहे. वीर धरणात ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पावसाने ताण दिल्याने दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सद्यःस्थितीत सर्व यंत्रणा सुरळीत चालू आहे. वादळी वारे येणे किंवा तांत्रिक बिघाड अथवा विद्युत बिघाड झाला तरच व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने नागरिकांनी पाणी वाया न घालविता जपून वापर करावा.

- निखिल मोरे, मुख्याधिकारी, नगरपालिका, सासवड.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे