शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सासवडकरांना मिळणार दोन दिवसाआड पाणी; पाण्याचा जपून वापर करा, मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 20:19 IST

पाणी जपून वापरा: नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन...

सासवड (पुणे) : सासवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे गराडे आणि घोरवडी ही दोन धरणे पूर्णपणे आटली आहेत. सध्या वीर धरणावरून पाणीपुरवठा केला जात असून पावसाने अद्यापही ओढ दिल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर नागरिकांवर मोठ्या संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. उपलब्ध पाणीसाठा पाऊस होईपर्यंत पुरण्यासाठी यापुढे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सासवड नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.

गराडे, घोरवडी, सिद्धेश्वर जलाशयातील उपलब्ध पाणी स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी आवश्यक असल्याने तेथील पाणी उपसा बंद करण्याच्या पाटबंधारे विभागाने लेखी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता केवळ वीर धरणाच्या पाण्यावर सासवडचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने सासवड शहराचा नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड होता. दि.१९ पासून दोन दिवसाआड केल्याचे सासवड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दवंडीद्वारे जाहीर केले. लांबलेल्या पावसाने पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सासवड शहरास ऐन पावसाळ्यात टंचाईच्या झळा बसतानाच विस्कळित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागण्याचे संकट आले आहे.

सासवड शहरास एकमेव वीर धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या वीर धरणात सासवडला पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे; परंतु पावसाळा असूनही पाऊसच पडत नसल्याने पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच, पाऊस सुरू झाला तरी पाणीसाठा होण्यास काही दिवस लागतील आणि पाऊसच झाला नाही तर पाणी टंचाईचे संकट आणखी वाढण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाणी पुढील साठा होईपर्यंत नागरिकांना पिण्यासाठी मिळाले पाहिजे यासाठी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संकेत नंदवंशी यांनी दिली आहे.

सासवडला पाणीपुरवठा करणारे गराडे धरण दोन महिन्यांपूर्वीच कोरडे पडल्याने तेव्हापासून पाणी उपसा बंद केला आहे. तसेच घोरवडी धरणात पाणी उपलब्ध असेपर्यंत त्यातील उपसा सुरूच होता; परंतु सध्या घोरवडी धरण पूर्णपणे आटले आहे. वीर धरणात ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पावसाने ताण दिल्याने दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सद्यःस्थितीत सर्व यंत्रणा सुरळीत चालू आहे. वादळी वारे येणे किंवा तांत्रिक बिघाड अथवा विद्युत बिघाड झाला तरच व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने नागरिकांनी पाणी वाया न घालविता जपून वापर करावा.

- निखिल मोरे, मुख्याधिकारी, नगरपालिका, सासवड.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे