शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

सासवड शहराचा पाणीपुरवठा अडकला राजकीय साठमारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:33 IST

सासवड शहरातील ६० हजार नागरिकांना रोज सुमारे ६० लाख लिटर पाणी लागते...

ठळक मुद्देसासवडला गेले तीन दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई पाणी विकत घेण्याची नागरिकांवर वेळ 

सासवड : वीर धरणातून नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन २६ मेपर्यंत चालू राहिल्याने वीर धरणातील पाणीपातळी मृत साठ्याच्याही खाली गेल्याने सासवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी येणे पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे अतिशय आतील बाजूला असलेल्या जुन्या धरणामध्ये तात्पुरते दोन वीजपंंप लावून जॅकवेलमध्ये पाणी घेण्याची सासवड नगरपालिकेची कसरत सुरू असून, त्यातून सासवड शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. सासवड शहरातील ६० हजार नागरिकांना रोज सुमारे ६० लाख लिटर पाणी लागते. शहराला पाणीपुरवठा करणारे सिद्धेश्वर, गराडे, घोरवडी धरणांतील पाण्याचा स्रोत आटल्याने आता पिण्याच्या पाण्यासाठी वीर योजनेचा स्रोत आहे. त्यातून पदाधिकारी यांनी पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारी यांना भेटून याबाबत निवेदन दिले होते. तरीही आचारसंहितेचे कारण देऊन सदर प्रश्न प्रलंबित ठेवल्याने व जलसंपदा (नियोजन) विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने सासवड शहरातील नागरिकांचे अडचणीत वाढ झाली. जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे या खात्याचे मंत्री असून याबाबतचे नियोजन त्यांच्या खात्याकडे आहे. वास्तविक निरा डावा कालव्यास आवर्तन १५ दिवस जादा सोडल्याने धरणातील पाणी पातळी वेगाने कमी होत गेली. यावर सासवड नगरपरिषदेने मा. जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा केल्याने दि २६ मे रोजी नीरा डावा कालव्याचे ऊन्हाळी आवर्तन बंद केले. त्यानंतर दोन दिवसात शहराचा पाणीपुरवठा पाणी पातळी खाली गेल्याने विस्कळीत झाला यावर सोशल मीडिया व नागरिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुंजवणी धरणातून अर्धा टीएमसी पाणी वीर धरणात सोडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, हे पाणी वीर धरणात किती क्षमतेने पोहोचेल व किती टीएमसी पाणी धरणात येईल याविषयी शंकाच आहे..............................४राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार वीर धरणाचा डावा कालवा बंद करण्याबाबत व अर्धा टीएमसी गुंजवणी धरणातील  पाणी  २३० क्युसेक्स वेगाने  वीर धरणात सोडण्याचे आदेश दिले खरे; परंतु गुंजवणी धरणातून सोडलेले पाणी प्रत्यक्ष वीर धरणात किती पोहोचणार? तसेच हे पाणी सासवड शहरासाठी राखीव आहे का ? कारण वीर धरणावरून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यन्वित आहेत. त्यामुळे हे पाणी पूर्ण क्षमतेने सासवडला मिळेल का? याविषयी गंभीर साशंकता सासवडच्या नागरिकांमध्ये आहे.

................

* सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती संजय ग. जगताप तसेच सासवडचे नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील ही कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी सांगितले. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले..........

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी