शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत साहित्य संंमेलन आयोजित करण्यात 'सरहद'ला रस नाही :संजय नहारांची स्पष्ट भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 22:10 IST

दिल्लीत ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात सरहद संस्थेला रस नाही आणि भविष्यात कधीच त्यासाठी पुढाकार घेतला जाणार नाही.

पुणे : दिल्लीत ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात सरहद संस्थेला रस नाही आणि भविष्यात कधीच त्यासाठी पुढाकार घेतला जाणार नाही अशी भूमिका सरहद संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक येथे नियोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचा पत्ता नाही. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची 95 व्या साहित्य संंमेलानाच्या आयोजनासाठी चाचपणी सुरू झाली आहे. नुकत्याच महामंडळाच्या झालेल्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनावर चर्चा देखील करण्यात आली आहे. भविष्यात सरहदद संस्था संमेलन घेण्यास पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न अखिल भारतीय महामंडळाशी संबंधित व्यक्तींसह साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि दिल्लीतील मराठी बांधवांकडून सरहदद संस्थेला विचारला जात आहे.त्या पार्श्वभूमीवर सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी स्पष्टपणे मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांना पत्राद्वारे आपली भूमिका कळविली आहे.

सरहद संस्थेचा दिल्लीसाठीचा प्रस्ताव केवळ महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर 1 मे 2021 रोजी साठीचा होता. तो प्रस्ताव कोव्हिड अथवा वेगवेगळ्या कारणांनी नाशिक संमेलन पुढे गेल्याने भविष्यात संस्था पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र त्याचवेळी संस्था भविष्यात कधीही  साहित्य संमेलनासाठी पुढाकार घेणार नसल्याचे लेखी कळवले होते.

नाशिकला संमेलनासाठी शुभेच्छा देताना भविष्यात योग्यवेळी दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले पाहिजे हीच सरहदची भूमिका होती, आहे आणि भविष्यातही राहील. मात्र कौतिकराव ठाले पाटील यांच्यासारख्या व्यक्तीगत अहंकार असणा-या प्रवृत्ती महामंडळात असपेर्यंत दिल्लीत संमेलन होणे अशक्य आहे असे वाटते याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. नाही. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची 95 व्या साहित्य संंमेलानाच्या आयोजनासाठी चाचपणी सुरू झाली आहे. नुकत्याच महामंडळाच्या झालेल्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनावर चर्चा देखील करण्यात आली आहे. भविष्यात सरहद संस्था संमेलन घेण्यास पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न अखिल भारतीय महामंडळाशी संबंधित व्यक्तींसह साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि दिल्लीतील मराठी बांधवांकडून सरहद संस्थेला विचारला जात आहे.त्या पाशर््वभूमीवर सरहदद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी स्पष्टपणे मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांना पत्राद्वारे आपली भूमिका कळविली आहे.

सरहद संस्थेचा दिल्लीसाठीचा प्रस्ताव केवळ महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर 1 मे 2021 रोजी साठीचा होता. तो प्रस्ताव कोव्हिड अथवा वेगवेगळ्या कारणांनी नाशिक संमेलन पुढे गेल्याने भविष्यात संस्था पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.मात्र त्याचवेळी संस्था भविष्यात कधीही  साहित्य संमेलनासाठी पुढाकार घेणार नसल्याचे लेखी कळवले होते.

नाशिकला संमेलनासाठी शुभेच्छा देताना भविष्यात योग्यवेळी दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले पाहिजे हीच सरहदची भूमिका होती, आहे आणि भविष्यातही राहील. मात्र कौतिकराव ठाले पाटील यांच्यासारख्या व्यक्तीगत अहंकार असणा-या प्रवृत्ती महामंडळात असपेर्यंत दिल्लीत संमेलन होणे अशक्य आहे असे वाटते याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनSanjay Naharसंजय नहार