शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नरेंद्र मोदींपासून अजितदादा अन् राज ठाकरेंना संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला, म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 03:29 IST

‘मी स्वीट खात नाही,’ लोक मला मिरच्या आणि कारलीच खायला घालतात, असं मार्मिक उत्तर राऊत यांनी दिले.

मुलाखतीच्या शेवटी एक रँपिड फायर राऊंड घेऊयात, ज्यात काही नावं सांगतो. त्यांच्याविषयी एक चांगला गुण सांगायचा आणि एक सल्ला द्यायचा असे सांगताच, झालं ना आता? असं राऊत म्हटले. जेवणानंतर ‘स्वीट डिश’ हवी ना? असं प्रत्युत्तर अतुल कुलकर्णी यांनी देताच सभागृहात हशा पिकला. त्यावर ‘मी स्वीट खात नाही,’ लोक मला मिरच्या आणि कारलीच खायला घालतात, असं मार्मिक उत्तर राऊत यांनी दिले.नरेंद्र मोदीमोदी हे प्रचंड मेहनती आहेत. त्यांच्याइतकी मेहनत कुणीच घेणार नाही. त्यांना मी काय सल्ला देणार? त्यांना सल्ला द्यायचा अधिकार मला नाही. फक्त पत्रकार या नात्याने सांगू इच्छितो, की आसपासच्या आपल्या सहकाऱ्यांकडेही लक्ष द्यायला पाहिजे.अमित शहाप्रखर राष्ट्रभक्त आहेत. त्यांनी जे काही निर्णय घेतले उदा : कलम ३७० असो ते कौतुकास्पद आहे. ते खूप हिमतीचे आहेत. पण देशात लोकशाही आहे हे त्यांनी मान्य केले पाहिजे. अनेक विषयांत विरोधी पक्षाचे मत समजूनघेतले पाहिजे.नितीन गडकरीगडकरी यांनी दिल्लीत जास्त लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. ते नागपूरमध्येच बसून भाषण करतात. त्यांची गरज दिल्लीत जास्त आहे. कुणीतरी महाराष्ट्राच्या नेत्याने दिल्लीत ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरबाळासाहेबांशी माझे खूप चांगले संबंध आहेत. पण भाजपला मदत होईल असं कोणतंही कृत्य त्यांनी करू नये.राहुल गांधीते मनाने खूप चांगले आणि निष्कपट आहेत. पण किमान १५ तास त्यांनी पक्ष कार्यालयात बसणं गरजेचं आहे.असदुद्दीन ओवीसीउत्तम कायदेपंडित आहेत. त्यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. लोक सहमतदेखील होतात. पण जे आंबेडकर यांच्यासंदर्भात म्हणालो तसे त्यांनीही व्होटकटर मशिनची भूमिका बदलायला पाहिजे.अजित पवारहे सध्याच्या मंत्रिमंडळातले अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत. कामाला वाघ असा मंत्री बघितला नाही. निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता आणि हिमतीने काम करणारा माणूस आहे. अजित पवारचे तोंड खराब आहे, असे तेही म्हणतात. पण राजकारणात अशा तोंडाची गरज आहे, माझा त्यांना सल्ला आहे की असेच ठेवा.राज ठाकरेराज ठाकरे कलावंत माणूस आहे. उत्तम व्यंगचित्रकार आहेत. नेतेसुद्धा आहेत. देशात आणि महाराष्ट्रात ही कला लोप पावत आहे. राज ठाकरे यांनी ब्रश घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फटकारे मारले पाहिजेत.उद्धव ठाकरेअनेक वर्षे जवळून पाहत आहेत. ते निष्कपट आहेत. आता मुख्यमंत्री या नात्याने काही कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी