शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

दोन्ही समाजांनी बंधूभाव जपावा - संदीप पखाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:30 IST

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सामाजिक सलोखा बिघडवून गावातील वातावरण जाणिवपूर्वक दूषित करण्याचा बाहेरची शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये परस्परसंवाद आवश्यक आहे. दोन्ही घटकांनी सकारात्मक भूमिका घेत बंधूभाव जपण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सामाजिक सलोखा बिघडवून गावातील वातावरण जाणिवपूर्वक दूषित करण्याचा बाहेरची शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये परस्परसंवाद आवश्यक आहे. दोन्ही घटकांनी सकारात्मक भूमिका घेत बंधूभाव जपण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.येथे पखाले यांच्या उपस्थितीत शांतता बैठक घेण्यात आली होती. या वेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, ‘घोडगंगा’चे माजी संचालक कैलासराव सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, सरपंच संगीता गव्हाणे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, केशव फडतरे, ज्ञानेश्वर शिंदे, जितेंद्र गव्हाणे, योगेश गव्हाणे, सुरेंद्र भांडवलकर, संपत गव्हाणे, काँग्रेसचे दिलीपराव सकट, राजेंद्र गवदे, बाळासाहेब भालेराव, वसंत सकट, सचिन कडलक, संतोष शिंदे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीनंतर मृत पूजा सकट हीस आदरांजली वाहण्यात आली.पोलीस निरीक्षक संदीप गिरीगोसावी यांनी सांगितले, की सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसरवीत असल्याने दोन समाजांत तेढ मिटण्यास अडसर येत आहे. यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. शक्य तो सोशल मीडियावर आपण आपलाच प्रतिबंध घालावा. विघ्नसंतोषी लोकांची माहिती पोलिसांना दिली तर पुढील अनर्थ टळण्यास मदत होईल.कैलासराव सोनवणे व अनिल काशीद यांनी सांगितले, की कोरेगाव भीमा तालुक्याला दिशा देणारे गाव असून गावात सामाजिक सलोखा आहे.गावातील वातावरण बिघडू नये, यासाठी जाणिवपूर्वक सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. तर संगीता कांबळे, वृषाली गव्हाणे व जितेंद्र गव्हाणे यांनी सर्व बेघर दलित बांधवांना घरे बांधून देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न असल्याचे सांगितले.या वेळी मृत पूजा सकट यांचे चुलते वसंतराव सकट यांनी सांगितले, की परिसरात जातीय सलोखा जपण्याचा आमचा आग्रह आहे. समाजात विष पेरणाऱ्यांना शोधले तरच परिसरात शांतता नांदू शकेल. अहमदनगर काँग्रेसचे दिलीप सकट यांनी अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस तपासून घेण्याबाबत आम्ही नगर जिल्ह्यात आग्रही भूमिका घेतली असून या ठिकाणी दोन्ही समाजाने सलोखा राखण्याचे आवाहन केले, तर राजेंद्र गवदे यांनी परिसरातील कोणत्याही घटनेचा संबंध कोरेगाव दंगलीशी जोडू नये, असे आवाहन पोलिसांना केले.कोरेगाव भीमा दंगलीची दाहकता चार महिन्यांनंतरही कायम आहे. सोशल मीडियावर मेसेज पाठविताना काळजी घेण्याचे आवाहन करतानाच दोन समाजांमध्ये अविश्वासाची उभी राहिलेली भिंत बाजूला करण्यासाठीही पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.- डॉ. संदीप पखाले, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणेnewsबातम्या