शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दोन्ही समाजांनी बंधूभाव जपावा - संदीप पखाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:30 IST

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सामाजिक सलोखा बिघडवून गावातील वातावरण जाणिवपूर्वक दूषित करण्याचा बाहेरची शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये परस्परसंवाद आवश्यक आहे. दोन्ही घटकांनी सकारात्मक भूमिका घेत बंधूभाव जपण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सामाजिक सलोखा बिघडवून गावातील वातावरण जाणिवपूर्वक दूषित करण्याचा बाहेरची शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये परस्परसंवाद आवश्यक आहे. दोन्ही घटकांनी सकारात्मक भूमिका घेत बंधूभाव जपण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.येथे पखाले यांच्या उपस्थितीत शांतता बैठक घेण्यात आली होती. या वेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, ‘घोडगंगा’चे माजी संचालक कैलासराव सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, सरपंच संगीता गव्हाणे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, केशव फडतरे, ज्ञानेश्वर शिंदे, जितेंद्र गव्हाणे, योगेश गव्हाणे, सुरेंद्र भांडवलकर, संपत गव्हाणे, काँग्रेसचे दिलीपराव सकट, राजेंद्र गवदे, बाळासाहेब भालेराव, वसंत सकट, सचिन कडलक, संतोष शिंदे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीनंतर मृत पूजा सकट हीस आदरांजली वाहण्यात आली.पोलीस निरीक्षक संदीप गिरीगोसावी यांनी सांगितले, की सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसरवीत असल्याने दोन समाजांत तेढ मिटण्यास अडसर येत आहे. यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. शक्य तो सोशल मीडियावर आपण आपलाच प्रतिबंध घालावा. विघ्नसंतोषी लोकांची माहिती पोलिसांना दिली तर पुढील अनर्थ टळण्यास मदत होईल.कैलासराव सोनवणे व अनिल काशीद यांनी सांगितले, की कोरेगाव भीमा तालुक्याला दिशा देणारे गाव असून गावात सामाजिक सलोखा आहे.गावातील वातावरण बिघडू नये, यासाठी जाणिवपूर्वक सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. तर संगीता कांबळे, वृषाली गव्हाणे व जितेंद्र गव्हाणे यांनी सर्व बेघर दलित बांधवांना घरे बांधून देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न असल्याचे सांगितले.या वेळी मृत पूजा सकट यांचे चुलते वसंतराव सकट यांनी सांगितले, की परिसरात जातीय सलोखा जपण्याचा आमचा आग्रह आहे. समाजात विष पेरणाऱ्यांना शोधले तरच परिसरात शांतता नांदू शकेल. अहमदनगर काँग्रेसचे दिलीप सकट यांनी अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस तपासून घेण्याबाबत आम्ही नगर जिल्ह्यात आग्रही भूमिका घेतली असून या ठिकाणी दोन्ही समाजाने सलोखा राखण्याचे आवाहन केले, तर राजेंद्र गवदे यांनी परिसरातील कोणत्याही घटनेचा संबंध कोरेगाव दंगलीशी जोडू नये, असे आवाहन पोलिसांना केले.कोरेगाव भीमा दंगलीची दाहकता चार महिन्यांनंतरही कायम आहे. सोशल मीडियावर मेसेज पाठविताना काळजी घेण्याचे आवाहन करतानाच दोन समाजांमध्ये अविश्वासाची उभी राहिलेली भिंत बाजूला करण्यासाठीही पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.- डॉ. संदीप पखाले, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणेnewsबातम्या