शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दोन्ही समाजांनी बंधूभाव जपावा - संदीप पखाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:30 IST

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सामाजिक सलोखा बिघडवून गावातील वातावरण जाणिवपूर्वक दूषित करण्याचा बाहेरची शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये परस्परसंवाद आवश्यक आहे. दोन्ही घटकांनी सकारात्मक भूमिका घेत बंधूभाव जपण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सामाजिक सलोखा बिघडवून गावातील वातावरण जाणिवपूर्वक दूषित करण्याचा बाहेरची शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये परस्परसंवाद आवश्यक आहे. दोन्ही घटकांनी सकारात्मक भूमिका घेत बंधूभाव जपण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.येथे पखाले यांच्या उपस्थितीत शांतता बैठक घेण्यात आली होती. या वेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, ‘घोडगंगा’चे माजी संचालक कैलासराव सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, सरपंच संगीता गव्हाणे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, केशव फडतरे, ज्ञानेश्वर शिंदे, जितेंद्र गव्हाणे, योगेश गव्हाणे, सुरेंद्र भांडवलकर, संपत गव्हाणे, काँग्रेसचे दिलीपराव सकट, राजेंद्र गवदे, बाळासाहेब भालेराव, वसंत सकट, सचिन कडलक, संतोष शिंदे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीनंतर मृत पूजा सकट हीस आदरांजली वाहण्यात आली.पोलीस निरीक्षक संदीप गिरीगोसावी यांनी सांगितले, की सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसरवीत असल्याने दोन समाजांत तेढ मिटण्यास अडसर येत आहे. यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. शक्य तो सोशल मीडियावर आपण आपलाच प्रतिबंध घालावा. विघ्नसंतोषी लोकांची माहिती पोलिसांना दिली तर पुढील अनर्थ टळण्यास मदत होईल.कैलासराव सोनवणे व अनिल काशीद यांनी सांगितले, की कोरेगाव भीमा तालुक्याला दिशा देणारे गाव असून गावात सामाजिक सलोखा आहे.गावातील वातावरण बिघडू नये, यासाठी जाणिवपूर्वक सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. तर संगीता कांबळे, वृषाली गव्हाणे व जितेंद्र गव्हाणे यांनी सर्व बेघर दलित बांधवांना घरे बांधून देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न असल्याचे सांगितले.या वेळी मृत पूजा सकट यांचे चुलते वसंतराव सकट यांनी सांगितले, की परिसरात जातीय सलोखा जपण्याचा आमचा आग्रह आहे. समाजात विष पेरणाऱ्यांना शोधले तरच परिसरात शांतता नांदू शकेल. अहमदनगर काँग्रेसचे दिलीप सकट यांनी अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस तपासून घेण्याबाबत आम्ही नगर जिल्ह्यात आग्रही भूमिका घेतली असून या ठिकाणी दोन्ही समाजाने सलोखा राखण्याचे आवाहन केले, तर राजेंद्र गवदे यांनी परिसरातील कोणत्याही घटनेचा संबंध कोरेगाव दंगलीशी जोडू नये, असे आवाहन पोलिसांना केले.कोरेगाव भीमा दंगलीची दाहकता चार महिन्यांनंतरही कायम आहे. सोशल मीडियावर मेसेज पाठविताना काळजी घेण्याचे आवाहन करतानाच दोन समाजांमध्ये अविश्वासाची उभी राहिलेली भिंत बाजूला करण्यासाठीही पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.- डॉ. संदीप पखाले, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणेnewsबातम्या