शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डॉ. सलिम अली जयंती विशेष : पक्षी म्हणताहेत, आमच्या हक्काच्या घरावर आरक्षण टाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:18 IST

वनविभाग, महापालिका, महसूल विभाग यांच्यामध्ये अभयारण्याकडे लक्ष कोणी द्यायचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही...

पुणे : येरवडा येथील डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्य गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत पक्ष्यांसाठी नंदनवन ठरत आलेले आहे. परंतु, या पक्ष्यांच्या घराचा मालकी हक्क नक्की कोणाकडे आहे, त्याच्यावरच वाद सुरू आहे. वनविभाग, महापालिका, महसूल विभाग यांच्यामध्ये अभयारण्याकडे लक्ष कोणी द्यायचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथील पक्षीदेखील आता म्हणत असतील, आमचा अधिवास असलेल्या अभयारण्यावर कोणीतरी आरक्षण टाका हो! कारण त्या अभयारण्याला कोणीच वाली राहिलेला नाही.

या पक्षी अभयारण्यात शंभरहून अधिक विविध प्रजातींचे पक्षी पहायला मिळतात. या ठिकाणी जलाशय, दलदल आणि झाडे यामधील पक्षी आहेत. हिवाळ्यात येथील पक्ष्यांची संख्या वाढते. हा पक्ष्यांचा अतिशय चांगला अधिवास आहे. हा अधिवास टिकावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पक्षी संशोधक धर्मराज पाटील प्रयत्न करत होते; पण काही महिन्यांपूर्वी त्यांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यांच्या पुढाकाराने फेब्रुवारीमध्ये तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभयारण्याला भेट दिली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना अभयारण्य संरक्षित करण्यासाठी आदेश दिले होते. तसेच वनविभागाने अभयारण्याची जागा ताब्यात घेऊन ते संरक्षित करावे, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. परंतु, त्यानंतर महापालिकेकडून त्यावर काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

पक्ष्यांची संख्या होतेय कमी

अभयारण्याला लागून मुठा नदी वाहते. त्यात वर्षभर घाण पाणी असते. त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. पाण्यात ऑक्सिजन नाहीच. त्यामुळे स्वच्छ पाण्यावर जगणाऱ्या पक्ष्यांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे. अभयारण्याला कोणीच वाली नसल्याने तिथे अनेक गैरप्रकारही सुरू असतात. तिथे कचरा टाकला जातो.

सुरक्षा रक्षकही नाही नेमले

अभयारण्यात कचरा टाकणे, दारू पार्ट्या होणे आदींना आळा बसावा म्हणून तिथे महापालिकेने सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यावरही महापालिकेने काहीच केले नाही.

पक्षी अभयारण्याची जागेवरून वाद आहेत. महसूल विभाग, वनविभाग, महापालिका आणि वाडिया म्हणून एक गृहस्थ आहेत. यांच्यात चर्चा सुरू असल्याने वाद काही मिटलेला नाही.

- अशाेक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbirds sanctuaryपक्षी अभयारण्य