शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या बालसाहित्यिकाराला  ‘प्रकाशक’च मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 20:01 IST

पुण्यात झालेल्या २५ व्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे.त्यांच्या संपूर्ण बालसाहित्यातील योगदानाबददल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात इतके उत्तुंग कार्य असतानाही त्यांना पुस्तकांसाठी प्रकाशकच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्दे ’गंमतशाळा’ या अभिनव संकल्पनेची निर्मितीआत्तापर्यंत ८९ पुस्तके प्रकाशित

पुणे :बालसाहित्य लिहिणा-या लेखकांची संख्या कमी आहे. कुमार वयांच्या मुलांसाठी साहित्य निर्माण केले जात नाही अशी एकीकडे ओरड केली जाते. मात्र, दुसरीकडे सातत्याने मुलांसाठी विविध विषयांवर लेखन करणा-या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या एका बालसाहित्यकाराला मात्र ‘प्रकाशक’च मिळेना अशा दयनीय अवस्थेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यांच्या ३५ पुस्तकांची मूळ हस्तलिखिते लिहून तयार आहेत.परंतु, त्यांच्यासाठी चांगला प्रकाशक मिळणे ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे.     कुणी प्रकाशक देता का प्रकाशक? अशी आर्त विनवणी या बालसाहित्यकाराला करावी लागत आहे. यातूनच बालसाहित्याबाबतची प्रकाशकांची उदासीनता आणि बालसाहित्याला दिले जाणारे दुय्यम स्थान दिसून येत आहे.राजीव तांबे हे त्या सर्जनशील बालसाहित्यकाराचे नाव! त्यांची आत्तापर्यंत ८९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाडमयात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. बालसाहित्याव्यतिरिक्त एकपात्रिका, कथा,कादंबरी,विज्ञान प्रयोग, गणित कथा, पालक आणि शिक्षकांसाठी लेखन असे विविध प्रकार त्यांनी हाताळले आहेत. ’गंमतशाळा’ या अभिनव संकल्पनेची निर्मिती त्यांनी केली आहे. राज्य आणि केंद्र स्तरावरच्या पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले आहेत. पुण्यात झालेल्या २५ व्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या संपूर्ण बालसाहित्यातील योगदानाबददल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात इतके उत्तुंग कार्य असतानाही त्यांना पुस्तकांसाठी प्रकाशकच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे म्हणाले, माझी ३५  पुस्तकांची हस्तलिखिते संगणकावर लिहून तयार आहेत. मात्र पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रकाशक आणि चित्रकारच मिळत नाही अशी स्थिती आहे. ‘पुस्तक काढली तरी वाचणार कोण? अशी उत्तर प्रकाशकांकडून मिळत असल्याने चांगला प्रकाशक मिळणे ही दुर्मिळ बाब झाली आहे. पण तरीही माझे लेखन थांबलेले नाही. रोज सहा तास मी लेखन करतो. प्रकाशक मिळाला नाही तरी आपले काम थांबता कामा नये या मतांचा मी आहे. सध्या तीन ते सहा वर्षे वयोगटासाठी लिहित असल्याचे त्यांनी सांगितले.

..................

 बालसाहित्याला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले आहे. खरेतर मुलांचे भावविश्व उलगडत मुलांना समजेल उमजेलअशा भाषेत लेखन करणे खूप अवघड आहे. तरीही बालसाहित्याकडे उपेक्षित नजरेने पाहाण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही, याचे वाईट वाटते- राजीव तांबे, प्रसिद्ध बालसाहित्यकार

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य