शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
4
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
5
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
6
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
7
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
8
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
9
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
10
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
11
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
12
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
13
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
14
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
15
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
16
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
17
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
18
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
19
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
20
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या बालसाहित्यिकाराला  ‘प्रकाशक’च मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 20:01 IST

पुण्यात झालेल्या २५ व्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे.त्यांच्या संपूर्ण बालसाहित्यातील योगदानाबददल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात इतके उत्तुंग कार्य असतानाही त्यांना पुस्तकांसाठी प्रकाशकच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्दे ’गंमतशाळा’ या अभिनव संकल्पनेची निर्मितीआत्तापर्यंत ८९ पुस्तके प्रकाशित

पुणे :बालसाहित्य लिहिणा-या लेखकांची संख्या कमी आहे. कुमार वयांच्या मुलांसाठी साहित्य निर्माण केले जात नाही अशी एकीकडे ओरड केली जाते. मात्र, दुसरीकडे सातत्याने मुलांसाठी विविध विषयांवर लेखन करणा-या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या एका बालसाहित्यकाराला मात्र ‘प्रकाशक’च मिळेना अशा दयनीय अवस्थेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यांच्या ३५ पुस्तकांची मूळ हस्तलिखिते लिहून तयार आहेत.परंतु, त्यांच्यासाठी चांगला प्रकाशक मिळणे ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे.     कुणी प्रकाशक देता का प्रकाशक? अशी आर्त विनवणी या बालसाहित्यकाराला करावी लागत आहे. यातूनच बालसाहित्याबाबतची प्रकाशकांची उदासीनता आणि बालसाहित्याला दिले जाणारे दुय्यम स्थान दिसून येत आहे.राजीव तांबे हे त्या सर्जनशील बालसाहित्यकाराचे नाव! त्यांची आत्तापर्यंत ८९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाडमयात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. बालसाहित्याव्यतिरिक्त एकपात्रिका, कथा,कादंबरी,विज्ञान प्रयोग, गणित कथा, पालक आणि शिक्षकांसाठी लेखन असे विविध प्रकार त्यांनी हाताळले आहेत. ’गंमतशाळा’ या अभिनव संकल्पनेची निर्मिती त्यांनी केली आहे. राज्य आणि केंद्र स्तरावरच्या पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले आहेत. पुण्यात झालेल्या २५ व्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या संपूर्ण बालसाहित्यातील योगदानाबददल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात इतके उत्तुंग कार्य असतानाही त्यांना पुस्तकांसाठी प्रकाशकच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे म्हणाले, माझी ३५  पुस्तकांची हस्तलिखिते संगणकावर लिहून तयार आहेत. मात्र पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रकाशक आणि चित्रकारच मिळत नाही अशी स्थिती आहे. ‘पुस्तक काढली तरी वाचणार कोण? अशी उत्तर प्रकाशकांकडून मिळत असल्याने चांगला प्रकाशक मिळणे ही दुर्मिळ बाब झाली आहे. पण तरीही माझे लेखन थांबलेले नाही. रोज सहा तास मी लेखन करतो. प्रकाशक मिळाला नाही तरी आपले काम थांबता कामा नये या मतांचा मी आहे. सध्या तीन ते सहा वर्षे वयोगटासाठी लिहित असल्याचे त्यांनी सांगितले.

..................

 बालसाहित्याला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले आहे. खरेतर मुलांचे भावविश्व उलगडत मुलांना समजेल उमजेलअशा भाषेत लेखन करणे खूप अवघड आहे. तरीही बालसाहित्याकडे उपेक्षित नजरेने पाहाण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही, याचे वाईट वाटते- राजीव तांबे, प्रसिद्ध बालसाहित्यकार

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य