शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
2
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
3
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
4
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
5
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
6
आता काय बॉउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
7
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
8
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
9
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
10
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
11
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
12
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
13
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
14
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
15
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
16
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
17
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
18
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
19
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
20
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!

उद्यानाला 'साध्वी सावित्रीबाई फुले' नाव देेणाऱ्यांचा हेतू चांगला होता- प्रा. हरी नरके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 15:24 IST

महापालिकेकडे पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला असता व जर मनपा नाव बदलत नाही असे लक्षात आले तर समाजमाध्यमावर दाद मागणे अधिक योग्य ठरले असते- प्रा. हरी नरके

ठळक मुद्दे'ज्यांनी १९९१ साली नाव दिले त्यांना त्यागी, निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या सावित्रीबाई अभिप्रेत होत्या'

पुणे: साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान हे नाव ३० वर्षांपूर्वी दिले गेले. ते बदलण्याची मागणी करणे चुकीचे नाही, मात्र त्याची एक पद्धत आहे. महापालिकेकडे पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला असता व जर मनपा नाव बदलत नाही असे लक्षात आले तर समाजमाध्यमावर दाद मागणे अधिक योग्य ठरले असते, असं मत फुले साहित्याचे जेष्ठ अभ्यासक हरि नरके (hari narke) यांनी मांडले आहे. यापूर्वी अॅड असिम सरोदेंनी फेसबूकवर पोस्ट करून उद्यानाच्या नावातील साध्वी हा शब्द काढण्याची मागणी केली होती.

प्रा. हरी नरके यांनी समाजमाध्यमांवर उद्यानाचे नाव बदलण्याच्या होत असलेल्या मागणीला फेसबूकवर पोस्ट करत उत्तर दिले आहे. ज्यांनी १९९१ साली नाव दिले त्यांना त्यागी, निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या सावित्रीबाई अभिप्रेत होत्या. त्याकाळात  क्रांतीज्योती वा ज्ञानज्योती हे शब्द फारसे प्रचलित नव्हते. ज्यांनी हे नाव दिले त्यांचा हेतू चांगला होता. त्यावेळचा सांस्कृतिक संदर्भ तुम्हाला आवडो अगर न आवडो, पण हा ठराव देणारे लोक भले आहेत, त्यांना ज्यांनी प्रवृत्त केले त्यांनीच (जेव्हा सावित्रीबाईंना सगळे विसरले होते) तेव्हा त्यांचे स्मरण कायम ठेवले, हे विसरून कसे चालेल?

आज साध्वी शब्दाला विपरीत अर्थ प्राप्त झालेला असला तरी तेव्हा तो तसा नव्हता. शिवाय पारंपरिक शब्द टाळण्याइतके बहुजन काटेकोर नव्हते. दक्ष नव्हते. त्यांचे सांस्कृतिक भान तेव्हाही आजागृत होते नी आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. विरोध करणारे सापसाप म्हणत भुई धोपटत सुटले. दुसरी बाजू समजून न घेता हेत्वारोप करणे, जजमेंटल होणे टाळता येणार नाही काय? असाही प्रा. हरी नरके यांनी फेसबूकच्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.

टॅग्स :PuneपुणेSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले