शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानाला 'साध्वी सावित्रीबाई फुले' नाव देेणाऱ्यांचा हेतू चांगला होता- प्रा. हरी नरके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 15:24 IST

महापालिकेकडे पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला असता व जर मनपा नाव बदलत नाही असे लक्षात आले तर समाजमाध्यमावर दाद मागणे अधिक योग्य ठरले असते- प्रा. हरी नरके

ठळक मुद्दे'ज्यांनी १९९१ साली नाव दिले त्यांना त्यागी, निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या सावित्रीबाई अभिप्रेत होत्या'

पुणे: साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान हे नाव ३० वर्षांपूर्वी दिले गेले. ते बदलण्याची मागणी करणे चुकीचे नाही, मात्र त्याची एक पद्धत आहे. महापालिकेकडे पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला असता व जर मनपा नाव बदलत नाही असे लक्षात आले तर समाजमाध्यमावर दाद मागणे अधिक योग्य ठरले असते, असं मत फुले साहित्याचे जेष्ठ अभ्यासक हरि नरके (hari narke) यांनी मांडले आहे. यापूर्वी अॅड असिम सरोदेंनी फेसबूकवर पोस्ट करून उद्यानाच्या नावातील साध्वी हा शब्द काढण्याची मागणी केली होती.

प्रा. हरी नरके यांनी समाजमाध्यमांवर उद्यानाचे नाव बदलण्याच्या होत असलेल्या मागणीला फेसबूकवर पोस्ट करत उत्तर दिले आहे. ज्यांनी १९९१ साली नाव दिले त्यांना त्यागी, निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या सावित्रीबाई अभिप्रेत होत्या. त्याकाळात  क्रांतीज्योती वा ज्ञानज्योती हे शब्द फारसे प्रचलित नव्हते. ज्यांनी हे नाव दिले त्यांचा हेतू चांगला होता. त्यावेळचा सांस्कृतिक संदर्भ तुम्हाला आवडो अगर न आवडो, पण हा ठराव देणारे लोक भले आहेत, त्यांना ज्यांनी प्रवृत्त केले त्यांनीच (जेव्हा सावित्रीबाईंना सगळे विसरले होते) तेव्हा त्यांचे स्मरण कायम ठेवले, हे विसरून कसे चालेल?

आज साध्वी शब्दाला विपरीत अर्थ प्राप्त झालेला असला तरी तेव्हा तो तसा नव्हता. शिवाय पारंपरिक शब्द टाळण्याइतके बहुजन काटेकोर नव्हते. दक्ष नव्हते. त्यांचे सांस्कृतिक भान तेव्हाही आजागृत होते नी आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. विरोध करणारे सापसाप म्हणत भुई धोपटत सुटले. दुसरी बाजू समजून न घेता हेत्वारोप करणे, जजमेंटल होणे टाळता येणार नाही काय? असाही प्रा. हरी नरके यांनी फेसबूकच्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.

टॅग्स :PuneपुणेSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले