शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

ग्रामविकास अधिकारी निलंबित

By admin | Updated: December 1, 2015 03:32 IST

नारायणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांना पुणे जिल्हा परिषदेने सोमवारी निलंबित केले़ हा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी जारी

नारायणगाव : नारायणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांना पुणे जिल्हा परिषदेने सोमवारी निलंबित केले़ हा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी जारी केला आहे़ दरम्यान, सरपंच यांना अपात्र ठरविण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे. खराडे यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार, याचे सर्वांत प्रथम वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी दिले होते. ते खरे ठरले.खराडे हे नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना ग्रामपंचायत सभावृत्तान्त नोंदवही कोरी ठेवणे, जागा असताना परस्पर नवीन सभावृत्तान्त नोंदवही ठेवणे, ठरावाचा संशयास्पद पद्धतीने सभावृत्तान्त नोंदवहीत समाविष्ट करणे, मासिक कार्यवृत्तान्तामध्ये जमाखर्चाचा तपशील न लिहिणे, भाडेवसुलीसाठी विहित पद्धतीचा अवलंब न करणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवमानता करणे, पुणे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन करण्यास कारणीभूत ठरणे, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग करून खराडे यांनी त्यांच्या सचिवपदाच्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आले. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने खराडे यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने शंकर व बाळू जाधव यांच्या ताब्यातील गाळ्यावर केलेल्या कारवाईबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी २३ नोव्हेंबर २०१५ रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग नितीन माने यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती़ या समितीने नारायणगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी अहवाल सादर केला होता़.खराडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणीनंतर गरजेनुसार विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे, असा स्पष्ट उल्लेख समितीने या अहवालात केला होता. यानुसार उमाप यांनी खराडे यांचे निलंबन केले आहे़ तसेच या अहवालात सरपंच जयश्री मेहेत्रे यांच्यावर अपात्र करणेसंदर्भात ठपका ठेवला असल्याने सरपंच मेहेत्रे यांच्यावरसुद्धा अपात्र म्हणून कारवाई होण्याची शक्यता आहे़ त्या संदर्भातचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे उमाप यांनी सांगितले. (वार्ताहर)१० कर्मचाऱ्यांना अटक नारायणगाव : नारायणगाव ग्रामपंचायतीने शंकर व बाळू जाधव यांच्या गाळ्याचा बेकायदेशीररीत्या ताबा घेण्याच्या प्रकरणावरून नारायणगाव पोलिसांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणी आज नारायणगाव पोलिसांनी दहा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे फरार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.