शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Rupee Bank : 'आरबीआयमुळेच थांबले ‘रुपी बँके'चे विलीनीकरण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 11:04 IST

पुणे : रिझर्व्ह बँकेमुळेच (RBI) रुपी बँकेचे ( Rupee Co-operative Bank) सारस्वत बँकेत (Saraswat Co-operative Bank) होणारे विलीनीकरण थांबले, असा ...

पुणे : रिझर्व्ह बँकेमुळेच (RBI) रुपी बँकेचे ( Rupee Co-operative Bank) सारस्वत बँकेत (Saraswat Co-operative Bank) होणारे विलीनीकरण थांबले, असा आरोप रुपीमधील ठेवीदारांच्या संघटनेने केले. सन २०१३ पासून पाच लाख जणांचे १३०० कोटी रुपये रुपी बँकेत अडकले आहेत.

पीएमसी बँकेचे (PMC Bank) रिझर्व्ह बँकेनेच स्मॉल फायनान्स बँकेत रुपांतर केले, त्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. रुपीच्या संदर्भात मात्र रिझर्व्ह बँकेनेच काहीच हालचाल केली नाही, असे ठेवीदार संघटनेचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या या दिरंगाईची चौकशी व्हावी, अशी मागणी श्रीरंग परसपाटकी, भालचंद्र कुलकर्णी, समीर महाजन, मिहीर थत्ते, संभाजी जगताप, सुनील गोळे, राजेंद्र कर्वे व संदीप वाघिरे यांनी केली.

पीएमसी बँकेला लावला तोच न्याय रुपी बँकेलाही लावण्याची गरज आहे. शतकमहोत्सवी रुपी बँकेवर २०१३ पासून आरबीआयचे निर्बंध आहेत. प्रशासकीय मंडळ चांगले काम करत आहे. मात्र, ठेवीदारांना त्याचे पूर्ण पैसे हवे आहेत. कितीही मोठ्या रकमेची ठेव असली तरी फक्त पाच लाख रुपये मिळतात, त्याचे स्वागतच आहे. मात्र, रुपीचे विलीनीकरण झाले तर ठेवींची हमी राहील; पण अनेक ठेवीदार, सभासद बँकेतून निघून जात आहेत, त्यामुळे विलीनीकरणानंतर सारस्वत बँकेला मिळणारे सदस्य आधीच निघून जात असल्याने सारस्वत बँक त्यांचा प्रस्ताव मागे घेण्याची शक्यता आहे, असे भालचंद्र कुलकर्णी म्हणाले.

केंद्रीय अर्थमंत्री स्तरावर रुपी बँकेचे सारस्वत बँकेत विलीनीकरण व्हावे, यासाठी पाठपुरावा होत होता. मात्र, रिझर्व्ह बँकेने त्याचाही विचार केला नाही. तब्बल दीड महिना बँकेच्या प्रशासनाने या प्रस्तावावर काहीच आवश्यक कार्यवाही केली नाही, असा आरोप ठेवीदार संघटनेने केला. केंद्र सरकारनेच यात लक्ष घालावे व विलंबाला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती भालचंद्र कुलकर्णी व अन्य सदस्यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकRupee Bankरुपी बँक