शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
4
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
5
नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
6
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
7
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
8
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
9
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
10
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
11
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
12
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
13
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
14
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
15
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
16
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
17
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
18
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
19
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
20
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांची भूमिका ठाम हवी : योगेश सोमण : विद्यार्थी साहित्य संमेलनाचा पुण्यात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:46 IST

विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेल्या सृजन उत्सवाची रविवारी सांगता‘प्रतिभासंगम’ या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे रंगले कथाकथन

पुणे : ‘साहित्यिकाच्या मनात हट्ट, जिद्द, ठाम भूमिका आणि आत्मविश्वास असायला हवा. साहित्याचा जो दिवा, जी मशाल मनात साहित्य संमेलनामुळे लागलेली आहे, ती तशीच धगधगत राहायला हवी. विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश आयोजित ‘प्रतिभासंगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेल्या सृजन उत्सवाची रविवारी सांगता झाली. समारोपप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते व कलाकार योगेश सोमण, स्वागत समितीचे अध्यक्ष एस. के. जैन, अभाविप राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, अभाविप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत साठे, अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री अभिजित पाटील, अभाविप पुणे महानगर अध्यक्ष शरद गोस्वामी व राघवेंद्र रिसालदार उपस्थित होते.  या वेळी विद्यार्थी साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. शरद गोस्वामी यांनी आभार मानले. पुण्यनगरीतील कविवर्य विंदा करंदीकर साहित्य नगरीतील या विद्यार्थी साहित्य संमेलनाची सांगता ‘वंदे मातरम’ने करण्यात आली.

मिरासदार यांचे कथाकथन रंगलेअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभासंगम’ या विद्यार्थी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे कथाकथन रंगले. त्यांनी जीवनातील विविध अनुभव सादर करून विद्यार्थी साहित्यिकांना मार्गदर्शन केले. मिरासदार यांनी प्रवासवर्णनामध्ये ‘दौंड ते नगर’ या प्रवासकथेचे वर्णन करून त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली.  या वेळी पायाल घुसाळकर हिने ‘घे भरारी’, विकास वाघ याने ‘माणुसकी हरवत चाललीये’ आणि ‘दंगा’, आकाश शिंदे याने ‘मी दगडू बोलतोय’, प्रज्वल पारडे ‘एकटा’ या निवडक विद्यार्थी साहित्यिकांना त्यांच्या कथा मांडण्यास व्यासपीठ दिले. 

टॅग्स :Puneपुणे