शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

साहित्यिकांची भूमिका ठाम हवी : योगेश सोमण : विद्यार्थी साहित्य संमेलनाचा पुण्यात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:46 IST

विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेल्या सृजन उत्सवाची रविवारी सांगता‘प्रतिभासंगम’ या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे रंगले कथाकथन

पुणे : ‘साहित्यिकाच्या मनात हट्ट, जिद्द, ठाम भूमिका आणि आत्मविश्वास असायला हवा. साहित्याचा जो दिवा, जी मशाल मनात साहित्य संमेलनामुळे लागलेली आहे, ती तशीच धगधगत राहायला हवी. विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश आयोजित ‘प्रतिभासंगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेल्या सृजन उत्सवाची रविवारी सांगता झाली. समारोपप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते व कलाकार योगेश सोमण, स्वागत समितीचे अध्यक्ष एस. के. जैन, अभाविप राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, अभाविप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत साठे, अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री अभिजित पाटील, अभाविप पुणे महानगर अध्यक्ष शरद गोस्वामी व राघवेंद्र रिसालदार उपस्थित होते.  या वेळी विद्यार्थी साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. शरद गोस्वामी यांनी आभार मानले. पुण्यनगरीतील कविवर्य विंदा करंदीकर साहित्य नगरीतील या विद्यार्थी साहित्य संमेलनाची सांगता ‘वंदे मातरम’ने करण्यात आली.

मिरासदार यांचे कथाकथन रंगलेअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभासंगम’ या विद्यार्थी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे कथाकथन रंगले. त्यांनी जीवनातील विविध अनुभव सादर करून विद्यार्थी साहित्यिकांना मार्गदर्शन केले. मिरासदार यांनी प्रवासवर्णनामध्ये ‘दौंड ते नगर’ या प्रवासकथेचे वर्णन करून त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली.  या वेळी पायाल घुसाळकर हिने ‘घे भरारी’, विकास वाघ याने ‘माणुसकी हरवत चाललीये’ आणि ‘दंगा’, आकाश शिंदे याने ‘मी दगडू बोलतोय’, प्रज्वल पारडे ‘एकटा’ या निवडक विद्यार्थी साहित्यिकांना त्यांच्या कथा मांडण्यास व्यासपीठ दिले. 

टॅग्स :Puneपुणे