शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

साहित्यिकांची भूमिका ठाम हवी : योगेश सोमण : विद्यार्थी साहित्य संमेलनाचा पुण्यात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:46 IST

विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेल्या सृजन उत्सवाची रविवारी सांगता‘प्रतिभासंगम’ या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे रंगले कथाकथन

पुणे : ‘साहित्यिकाच्या मनात हट्ट, जिद्द, ठाम भूमिका आणि आत्मविश्वास असायला हवा. साहित्याचा जो दिवा, जी मशाल मनात साहित्य संमेलनामुळे लागलेली आहे, ती तशीच धगधगत राहायला हवी. विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश आयोजित ‘प्रतिभासंगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेल्या सृजन उत्सवाची रविवारी सांगता झाली. समारोपप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते व कलाकार योगेश सोमण, स्वागत समितीचे अध्यक्ष एस. के. जैन, अभाविप राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, अभाविप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत साठे, अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री अभिजित पाटील, अभाविप पुणे महानगर अध्यक्ष शरद गोस्वामी व राघवेंद्र रिसालदार उपस्थित होते.  या वेळी विद्यार्थी साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. शरद गोस्वामी यांनी आभार मानले. पुण्यनगरीतील कविवर्य विंदा करंदीकर साहित्य नगरीतील या विद्यार्थी साहित्य संमेलनाची सांगता ‘वंदे मातरम’ने करण्यात आली.

मिरासदार यांचे कथाकथन रंगलेअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभासंगम’ या विद्यार्थी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे कथाकथन रंगले. त्यांनी जीवनातील विविध अनुभव सादर करून विद्यार्थी साहित्यिकांना मार्गदर्शन केले. मिरासदार यांनी प्रवासवर्णनामध्ये ‘दौंड ते नगर’ या प्रवासकथेचे वर्णन करून त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली.  या वेळी पायाल घुसाळकर हिने ‘घे भरारी’, विकास वाघ याने ‘माणुसकी हरवत चाललीये’ आणि ‘दंगा’, आकाश शिंदे याने ‘मी दगडू बोलतोय’, प्रज्वल पारडे ‘एकटा’ या निवडक विद्यार्थी साहित्यिकांना त्यांच्या कथा मांडण्यास व्यासपीठ दिले. 

टॅग्स :Puneपुणे