शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

‘आयटी’नगरीतील रस्ते अवघ्या ४० मिनिटांत पाण्याखाली; पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 22:29 IST

हिंजवडीतील चित्र, प्रशासन हतबल; पावसाचे पाणी बांधकामे, सीमा भिंत, तसेच मेट्रोच्या कामांमुळे अडते

हिंजवडी : आयटीनगरी परिसराला शनिवारी (दि.७) दुपारी बाराच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले. ढगांच्या कडकडाटासह सुमारे चाळीस मिनिटे आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने, परिसरातील वाहतूक काहीकाळ ठप्प होऊन, वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

मोठ्या पावसात हिंजवडी येथील मुख्य रस्त्यांवर वारंवार मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. यावर उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडत असून, परिसरातील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवत असल्याची चर्चा आहे.

प्रामुख्याने आयटीपार्क फेज तीन हद्दीतील कॉड्रन कंपनी परिसरात नेहमीच रस्त्यावर पाणी साचत असते. येथील मारुंजी आणि माणच्या वेशीवर असलेल्या डोंगरपठारावरील वाहून आलेले पावसाचे पाणी येथे झालेली बांधकामे, सीमा भिंत, तसेच मेट्रोच्या कामामुळे अडून राहत आहे. पाणी वाहून नेणारा नैसर्गिक प्रवाह थांबल्याने मुख्य रस्त्यावर सुमारे चार फूट पाणी साठते. चारशे मीटरपर्यंत रस्ता पाण्याखाली जात असतो.

अशीच परिस्थिती फेज दोन येथील पद्मभूषण चौकाजवळील आणि घोटावडे-माण रस्त्यावरील गवारे मळा येथेसुद्धा आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती असते. याला आयटीयन्ससह स्थानिक ग्रामस्थ पुरते वैतागले असून, ‘एमआयडीसी’ तसेच ‘पीएमआरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

या ठिकाणी साचते रस्त्यांवर पाणी

आयटीपार्कमधील फेज तीन ते फेज दोनपर्यंत मुख्य रस्ता, फेज दोनजवळील पद्मभूषण चौक परिसर, घोटावडे-माण रस्तावरील गवारे मळा, माणदेवी चौक, राक्षेवस्ती, बोडकेवाडी फाटा, शिवचा ओढा, वडजाईनगर, तसेच, बोडकेवाडी फाटा ते जॉय व्हीला सोसायटी रस्ता, धुमाळ वस्ती पाणंद रस्ता, हिंजवडी हद्दीतील भटेवरानगर, विनोदे वस्ती, तसेच भूमकर चौक अंडरपास.

फेज तीन आणि दोन परिसरात डोंगरउतार आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. नैसर्गिक प्रवाह खुले ठेवले पाहिजेत.- अतुल भिंगेल रहिवासी, फेज दोन, हिंजवडी.

फेज तीन आणि दोन हद्दीत सुरू असलेली विकासकामे डोकेदुखी ठरत आहेत. आडमुठ्या ठेकेदारांमुळे नैसर्गिक प्रवाह बंद झाले आहेत. निसर्गाचा समतोल ढासळला आहे. - गणेश परदेशी, व्यावसायिक, माण.

टॅग्स :Rainपाऊस