शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत, अनेक गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:36 IST

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे चासकमान धरणातून पाणलोट क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

डेहणे - खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे चासकमान धरणातून पाणलोट क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर या तालुक्यातील अनेक बंधारे भरून वाहत आहेत, तर अनेक खासगी तळी भरून ठेवण्यात आली आहेत. चासकमान धरणावर शिरूर व दौंड तालुक्यातील शेती समृद्ध होत असताना ज्या लोकांनी या धरणासाठी जमीन दिली, त्या पश्चिम भागातील गावं मात्र तहानलेली आहेत. नदीची पाणीपातळी तळाला गेली असून, कृषिपंप नदीच्या मध्यावर असूनही नदी कोरडी ठणठणीत पडल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नदीच्या खोलगट भागात (डोह) आणि झरे यामधून शेतकरी पाणी नेऊन पिके जगवण्याची धडपड करत आहेत. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकामागोमाग एक आवर्तन चालू असल्याने नदीपात्रातील तळ उघडा पडला आहे. मागील काही दिवसांपूर्र्वी धरणातून आवर्तन सोडताना या भागातील शेतकऱ्यांचाही विचार करावा, अशी मागणी होत होती. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यापुढे तरी धरणातून पाणी सोडू नये, अशी मागणी येथील शेतकरी तसेच ग्रामस्थ करीत आहेत.आदिवासी भागातील गावांमधील पशुधन जगवणे यामुळे कठीण झाले आहे. पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकºयांना सतावत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या गावांतील रब्बी हंगाम पाण्या अभावी वाया गेला आहे. दरवर्षी या भागात मुबलक प्रमाणात पाऊस पडत असतो. परंतु, पाणी अडवण्याचे नियोजन नसल्याने शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न त्यांना पडला आहे.बंधारे कागदावरच....-पश्चिम भागातील आदिवासी भागात भीमा नदीवर किमान नऊ ठिकाणी बंधारे बांधता येऊ शकतात. कृष्णा खोरे लवादाच्या नियमांतर्गत हे काम होऊ शकते. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव दिला असल्याचे अनेक वर्षे सांगितले जात आहे.-हक्काचे पाणी व पाणीटंचाईपासून मुक्तता हवी असेल तर बंधाºयांसाठी जनमताचा रेटा हवा. अशा प्रकारच्या बंधाºयांना जमीन लागणार नाही, धरणांतर्गत काम होणार असल्याने त्यामुळे कुणीही विस्थापित होण्याची शक्यता नाही. बंधारे केल्याचे फायदे मात्र अनेक आहेत. पावसाळा संपला की अवघ्या दोनेक महिन्यातच नदीचे पात्र कोरडे होते. ठिकठिकाणी बंधारे असतील तर सहा महिन्यांपर्यंत पाणी थोपवले जाऊ शकते.गावे तहानलेलीभीमा नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. तसेच, विहिरी, कूपनलिका इत्यादी पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत. या परिसरातील गावे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निकषात बसत नसल्याने अनेक गावे व वाड्या-वस्त्या तहानलेल्या असल्याचे या परिसरात पाहायला मिळत आहे. माणसालाच वेळेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तर जनावरांचे काय? अशी दुर्दैवी वेळ दुग्धउत्पादकांवर आली आहे.

टॅग्स :riverनदीPuneपुणेwater scarcityपाणी टंचाई