शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत, अनेक गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:36 IST

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे चासकमान धरणातून पाणलोट क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

डेहणे - खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे चासकमान धरणातून पाणलोट क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर या तालुक्यातील अनेक बंधारे भरून वाहत आहेत, तर अनेक खासगी तळी भरून ठेवण्यात आली आहेत. चासकमान धरणावर शिरूर व दौंड तालुक्यातील शेती समृद्ध होत असताना ज्या लोकांनी या धरणासाठी जमीन दिली, त्या पश्चिम भागातील गावं मात्र तहानलेली आहेत. नदीची पाणीपातळी तळाला गेली असून, कृषिपंप नदीच्या मध्यावर असूनही नदी कोरडी ठणठणीत पडल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नदीच्या खोलगट भागात (डोह) आणि झरे यामधून शेतकरी पाणी नेऊन पिके जगवण्याची धडपड करत आहेत. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकामागोमाग एक आवर्तन चालू असल्याने नदीपात्रातील तळ उघडा पडला आहे. मागील काही दिवसांपूर्र्वी धरणातून आवर्तन सोडताना या भागातील शेतकऱ्यांचाही विचार करावा, अशी मागणी होत होती. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यापुढे तरी धरणातून पाणी सोडू नये, अशी मागणी येथील शेतकरी तसेच ग्रामस्थ करीत आहेत.आदिवासी भागातील गावांमधील पशुधन जगवणे यामुळे कठीण झाले आहे. पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकºयांना सतावत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या गावांतील रब्बी हंगाम पाण्या अभावी वाया गेला आहे. दरवर्षी या भागात मुबलक प्रमाणात पाऊस पडत असतो. परंतु, पाणी अडवण्याचे नियोजन नसल्याने शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न त्यांना पडला आहे.बंधारे कागदावरच....-पश्चिम भागातील आदिवासी भागात भीमा नदीवर किमान नऊ ठिकाणी बंधारे बांधता येऊ शकतात. कृष्णा खोरे लवादाच्या नियमांतर्गत हे काम होऊ शकते. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव दिला असल्याचे अनेक वर्षे सांगितले जात आहे.-हक्काचे पाणी व पाणीटंचाईपासून मुक्तता हवी असेल तर बंधाºयांसाठी जनमताचा रेटा हवा. अशा प्रकारच्या बंधाºयांना जमीन लागणार नाही, धरणांतर्गत काम होणार असल्याने त्यामुळे कुणीही विस्थापित होण्याची शक्यता नाही. बंधारे केल्याचे फायदे मात्र अनेक आहेत. पावसाळा संपला की अवघ्या दोनेक महिन्यातच नदीचे पात्र कोरडे होते. ठिकठिकाणी बंधारे असतील तर सहा महिन्यांपर्यंत पाणी थोपवले जाऊ शकते.गावे तहानलेलीभीमा नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. तसेच, विहिरी, कूपनलिका इत्यादी पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत. या परिसरातील गावे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निकषात बसत नसल्याने अनेक गावे व वाड्या-वस्त्या तहानलेल्या असल्याचे या परिसरात पाहायला मिळत आहे. माणसालाच वेळेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तर जनावरांचे काय? अशी दुर्दैवी वेळ दुग्धउत्पादकांवर आली आहे.

टॅग्स :riverनदीPuneपुणेwater scarcityपाणी टंचाई