शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक, डी. वाय. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:46 IST

भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल तर करतो आहे. तंत्रज्ञानानेसुद्धा नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या वाटचालीत मात्र आपल्या दळणवळण आणि पाण्याच्या विविध स्रोतांची निर्मिती ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळात या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे; पण तरी विकासाच्या दृष्टीने हा नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे : भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल तर करतो आहे. तंत्रज्ञानानेसुद्धा नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या वाटचालीत मात्र आपल्या दळणवळण आणि पाण्याच्या विविध स्रोतांची निर्मिती ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळात या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे; पण तरी विकासाच्या दृष्टीने हा नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आदिशक्ती गप्पा कट्टा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बी. जे. खताळ, डॉ. शरद हर्डीकर, माजी कर्णधार चंदू बोर्डे, उद्योजक वालचंद संचेती, अभिनेते मोहन आगाशे, माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस, शेती व हवामान तज्ज्ञ डॉ. आर. एन. साबळे, एअर मार्शल भूषण गोखले, कृषिशास्त्रज्ञ डॉ. नारायण हेगडे, बी. यू. भंडारी उद्योग समूहाचे शैलेश भंडारी, अ‍ॅड. एन. डी. पवार, पत्रकार तुळशीराम भोईटे, पी. के. बेलसरे, आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष व आयोजक दत्ता पवार आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही महापालिकेपासून केली. शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांच्या निर्मितीत माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील, माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, रामराव आदिक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.’’पूर्वीचे खेळाडू देशासाठी खेळायचे, पण हल्ली पैशांचा प्रचंड प्रमाणात विचार होतो आहे, ही खंत व्यक्त केली.अभिनेते आगाशे म्हणाले, ‘‘आपले व्यक्तिमत्त्व आणि आवाज यांतून संस्कार व्यक्त होतात. आजच्या पिढीला झटपट यशस्वी होण्याची सवय लागली आहे. यामुळे मनोरंजन क्षेत्रही जंकफूडप्रमाणे तयार होत आहे.’’आपण राजकारणात योगायोगाने आलो. इंग्रजांच्या काळातही राज्यकर्त्यांची ज्या प्रमाणात दहशत होती, त्याचीच पुनरावृत्ती आज पाहायला मिळते आहे. मात्र, दहशतीने काही मिळत नाही. आपण जरी न्यायाधीशपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला, तरी राजकारणात राजकारण मिसळू दिले नाही. सत्ता कुणाचीही असली, तरी केंद्रस्थानी जनहिताचा विचार असावा.’’ बोेर्डे म्हणाले, ‘‘भारतात क्रिकेटला चांगले दिवस आले असून खेळाडू ही प्रचंड मेहनत घेताना दिसतात. अर्थात, खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने संघनिवड समितीची जबाबदारी वाढते आहे.’’ त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचेही कौतुक केले.- बी. जे. खताळ, माजी मंत्री

टॅग्स :PuneपुणेIndiaभारत