शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक, डी. वाय. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:46 IST

भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल तर करतो आहे. तंत्रज्ञानानेसुद्धा नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या वाटचालीत मात्र आपल्या दळणवळण आणि पाण्याच्या विविध स्रोतांची निर्मिती ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळात या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे; पण तरी विकासाच्या दृष्टीने हा नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे : भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल तर करतो आहे. तंत्रज्ञानानेसुद्धा नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या वाटचालीत मात्र आपल्या दळणवळण आणि पाण्याच्या विविध स्रोतांची निर्मिती ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळात या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे; पण तरी विकासाच्या दृष्टीने हा नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आदिशक्ती गप्पा कट्टा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बी. जे. खताळ, डॉ. शरद हर्डीकर, माजी कर्णधार चंदू बोर्डे, उद्योजक वालचंद संचेती, अभिनेते मोहन आगाशे, माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस, शेती व हवामान तज्ज्ञ डॉ. आर. एन. साबळे, एअर मार्शल भूषण गोखले, कृषिशास्त्रज्ञ डॉ. नारायण हेगडे, बी. यू. भंडारी उद्योग समूहाचे शैलेश भंडारी, अ‍ॅड. एन. डी. पवार, पत्रकार तुळशीराम भोईटे, पी. के. बेलसरे, आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष व आयोजक दत्ता पवार आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही महापालिकेपासून केली. शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांच्या निर्मितीत माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील, माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, रामराव आदिक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.’’पूर्वीचे खेळाडू देशासाठी खेळायचे, पण हल्ली पैशांचा प्रचंड प्रमाणात विचार होतो आहे, ही खंत व्यक्त केली.अभिनेते आगाशे म्हणाले, ‘‘आपले व्यक्तिमत्त्व आणि आवाज यांतून संस्कार व्यक्त होतात. आजच्या पिढीला झटपट यशस्वी होण्याची सवय लागली आहे. यामुळे मनोरंजन क्षेत्रही जंकफूडप्रमाणे तयार होत आहे.’’आपण राजकारणात योगायोगाने आलो. इंग्रजांच्या काळातही राज्यकर्त्यांची ज्या प्रमाणात दहशत होती, त्याचीच पुनरावृत्ती आज पाहायला मिळते आहे. मात्र, दहशतीने काही मिळत नाही. आपण जरी न्यायाधीशपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला, तरी राजकारणात राजकारण मिसळू दिले नाही. सत्ता कुणाचीही असली, तरी केंद्रस्थानी जनहिताचा विचार असावा.’’ बोेर्डे म्हणाले, ‘‘भारतात क्रिकेटला चांगले दिवस आले असून खेळाडू ही प्रचंड मेहनत घेताना दिसतात. अर्थात, खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने संघनिवड समितीची जबाबदारी वाढते आहे.’’ त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचेही कौतुक केले.- बी. जे. खताळ, माजी मंत्री

टॅग्स :PuneपुणेIndiaभारत