शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक, डी. वाय. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:46 IST

भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल तर करतो आहे. तंत्रज्ञानानेसुद्धा नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या वाटचालीत मात्र आपल्या दळणवळण आणि पाण्याच्या विविध स्रोतांची निर्मिती ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळात या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे; पण तरी विकासाच्या दृष्टीने हा नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे : भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल तर करतो आहे. तंत्रज्ञानानेसुद्धा नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या वाटचालीत मात्र आपल्या दळणवळण आणि पाण्याच्या विविध स्रोतांची निर्मिती ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळात या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे; पण तरी विकासाच्या दृष्टीने हा नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आदिशक्ती गप्पा कट्टा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बी. जे. खताळ, डॉ. शरद हर्डीकर, माजी कर्णधार चंदू बोर्डे, उद्योजक वालचंद संचेती, अभिनेते मोहन आगाशे, माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस, शेती व हवामान तज्ज्ञ डॉ. आर. एन. साबळे, एअर मार्शल भूषण गोखले, कृषिशास्त्रज्ञ डॉ. नारायण हेगडे, बी. यू. भंडारी उद्योग समूहाचे शैलेश भंडारी, अ‍ॅड. एन. डी. पवार, पत्रकार तुळशीराम भोईटे, पी. के. बेलसरे, आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष व आयोजक दत्ता पवार आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही महापालिकेपासून केली. शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांच्या निर्मितीत माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील, माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, रामराव आदिक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.’’पूर्वीचे खेळाडू देशासाठी खेळायचे, पण हल्ली पैशांचा प्रचंड प्रमाणात विचार होतो आहे, ही खंत व्यक्त केली.अभिनेते आगाशे म्हणाले, ‘‘आपले व्यक्तिमत्त्व आणि आवाज यांतून संस्कार व्यक्त होतात. आजच्या पिढीला झटपट यशस्वी होण्याची सवय लागली आहे. यामुळे मनोरंजन क्षेत्रही जंकफूडप्रमाणे तयार होत आहे.’’आपण राजकारणात योगायोगाने आलो. इंग्रजांच्या काळातही राज्यकर्त्यांची ज्या प्रमाणात दहशत होती, त्याचीच पुनरावृत्ती आज पाहायला मिळते आहे. मात्र, दहशतीने काही मिळत नाही. आपण जरी न्यायाधीशपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला, तरी राजकारणात राजकारण मिसळू दिले नाही. सत्ता कुणाचीही असली, तरी केंद्रस्थानी जनहिताचा विचार असावा.’’ बोेर्डे म्हणाले, ‘‘भारतात क्रिकेटला चांगले दिवस आले असून खेळाडू ही प्रचंड मेहनत घेताना दिसतात. अर्थात, खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने संघनिवड समितीची जबाबदारी वाढते आहे.’’ त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचेही कौतुक केले.- बी. जे. खताळ, माजी मंत्री

टॅग्स :PuneपुणेIndiaभारत