शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उजव्या विचारसरणीच्या हिंसाचाराचा धोका कायम : एस़. एस़. विर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 16:49 IST

डॉ़. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या करुन तो विचार संपणार नाही़.त्यांचे मारेकरी सापडले तरी उजव्या विचारसरणीचा हिंसाचार संपणार नाही तर तो वाढेल़ : निवृत्त पोलीस महासंचालक एस़. एस़. विर्क

ठळक मुद्देअतिरेकी, नक्षलवादावर राजकीय तोडगाच आवश्यक 

पुणे : आपली विचारधारा मान्य नसलेल्या डॉ़. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या करुन तो विचार संपणार नाही़, बंदुकीने प्रश्न सुटणार नाही. कारण ही विचारधारा चुकीची असून त्यांचे मारेकरी सापडले तरी उजव्या विचारसरणीचा हिंसाचार संपणार नाही तर तो वाढेल़. त्यामुळे यापुढेही सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे मत निवृत्त पोलीस महासंचालक एस़. एस़. विर्क यांनी व्यक्त केले़. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वातार्लाप कार्यक्रमात ते बोलत होते़.विर्क म्हणाले, अल कायदासारख्या दहशतवादी संघटना भारताबरोबरच अनेक देशात कार्यरत आहेत, ही चिंतेची बाब आहे़. काश्मीरमध्ये शेजारील राष्ट्र जेव्हा तेथील तरुणाईला हाताशी धरुन प्रॉक्सी वॉर खेळत आहे़. त्यात निष्पाप नागरिक, जवानांचा मृत्यु होत आहे़. तेथे काश्मिरी मुले त्यांच्या राज्यातील सुरक्षा रक्षकांबरोबर लढू लागले आहेत़. माणसाविरुद्ध माणूस अशी लढाई तेथे सुरु झाली आहे़.लष्कर किंवा सुरक्षा दले परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतात़.  त्यावर राजकीय तोडगाच आवश्यक आहे़. लोकप्रिय सरकार जे करु शकते, ते राज्यपाल करु शकत नाही. आपल्या संविधानातही तसे स्पष्ट केले आहे़. पंजाबविषयी बोलताना ते म्हणाले, दहशवादाशी लढताना एक संपूर्ण पिढी बरबाद झाली़. त्यामुळे उद्योग आले नाही़. शेतीतील उत्पन्न कमी होत चालले़. त्यामुळे पुढच्या पिढीला नैराश्याने ग्रासले़. बेरोजगारी वाढली असून त्याचा परिणाम तरुणाई ड्रग्सच्या आहारी गेली आहे़. शाळा, कॉलेजमध्ये ड्रग्ज हा सवयीचा भाग झाला आहे़.  हे वातावरण दहशतवादाला पोषक बनत आहे़. त्याचा पंजाबबरोबरच हरियाना, हिमाचल प्रदेशालाही धोका आहे़.बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड येथील नक्षलवादावर उपाय योजना करण्यासाठी आदिवासींच्या सहकारी संस्था स्थापन करुन त्यांच्यापर्यंत विकास पोहचविला पाहिजे़.  कॉपोर्रेट गुन्हेगारी हा अर्थ व्यवस्थेला मोठा धोका असे सांगून विर्क म्हणाले, दाऊद एखाद्याला धमकी देऊन १० कोटी हिसकावून घेतो़ त्याचवेळी  कॉर्पोरेट गुन्हेगार हजारो कोटी रुपये घेऊन पलायन करतात़. पण त्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई होत नाही़ अशा प्रकरणात त्यांचा सहभाग तपासण्याची गरज आहे़. त्याविरुद्ध सामुहिक मोहीम हाती घेण्याची गरज आहे़ कॉसमॉस बँकेवरील सायबर दरोडा हा आपल्यासाठी अलर्ट आहे़. भविष्यात एखाद्याची छोटीशी चूक हजारोंना महाग पडण्याची शक्यता आहे़. हॉकर्सचा धोका मोठा असल्याचे त्यांनी सांगितले़.पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी विर्क यांचे स्वागत केले़. पांडुरंग सांडभोर यांनी प्रास्ताविक केले तर ब्रिजमोहन पाटील यांनी आभार मानले़. ...................सुधा भारद्वाज यांना शहरी नक्षलवादी म्हणणे चुकबंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले, सुधा भारद्वाज यांना मी ओळखतो़. सहानभुतीदार असणे वेगळे आणि सहभाग असणे वेगळे़ त्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत़. त्यांना शहरी नक्षलवादी म्हणणे चुक आहे़. मात्र, महाराष्ट्र पोलीस चांगले होम वर्क करतात़. त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावा असेल. त्यामुळेच त्यांनी ही कारवाई केली असावी, अशी पुस्तीही त्यांनी जोडली़.

................................

सर्जिकल स्टाईक खरंच यशस्वी झाला का?भारताने केलेले सर्जिकल स्टाईक खरंच यशस्वी झाला का याचा मी विचार करतो तेव्हा त्यानंतरच्या काळात दहशतवाद कमी झाला का ? लष्कराचे जवान, सुरक्षा रक्षक शहीद होत आहे़. सुरक्षा एजन्सींचे मनोबल कमी होताना दिसत आहे़. ही दीर्घकालीन लढाई आहे़. त्यामुळे ही चांगली परिस्थिती नाही़ त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक खरंच यशस्वी झाला का असा प्रश्न पडतो़.

...............

 परवानगी घेऊन प्रेस नोट देता आली असतीडाव्या विचारसरणीच्या नेत्यांविषयी पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेविषयी ते म्हणाले, जर एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर त्यावर जाहीर मत व्यक्त करु नये़ पण जर पोलिसांच्या कारवाई विषयी लोकांचा गैरसमज होत असेल तर हा गैरसमज दूर करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली तर ते कधीच नाही म्हणणार नाहीत़ त्यामुळ न्यायालयाची परवानगी घेऊन पोलिसांना प्रेसनोट देता आली असती, असे त्यांनी सांगितले़ ......................कोणाकडूनही गिफ्ट घेतले नाहीआपल्या पोलीस सेवा काळात दिवाळीला कोणाकडूनही गिफ्ट घेतले नाही़ पोलीस सेवेत दाखल झालो, त्याअगोदरपासून मित्र आहेत व आताही आहेत, अशाच लोकांकडून आपण भेटवस्तू स्वीकारल्या़ बदलीसाठी आपण कधीही कोणाला फोनाफोनी केली नाही़ बदलीचे पाकिट आल्यावर ते उघडून जेथे असेल तेथे गेलो़ पद तेच, काम तेच, गाडी, कर्मचारी तेच असताना केवळ रुम बदलणार असेल तर त्यासाठी का प्रयत्न करायचे असे त्यांनी सांगितले़ .......................* प्रसाद शुद्ध असेल तर देवतेकडून न्यायही शुद्ध मिळणार* गुन्हेगारी विषयक अभ्यास आवश्यक 

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसnaxaliteनक्षलवादी