शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'कीर्तन'परंपरेला नव संजीवनी; वैविध्यपूर्ण कीर्तनांची रसिकांना मिळणार पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 14:12 IST

यु ट्यूब वर 'कीर्तनविश्व' चॅनेलची निर्मिती; राज्यातील दिग्गज कीर्तनकारांचा असणार सहभाग

दीपक कुलकर्णी- पुणे : आपल्याला कीर्तन परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे.पूर्वीच्या काळी समाज प्रबोधनासाठी देखील थोर संत महात्म्यांनी, समाजसुधारकांनी कीर्तन सेवेचा आधार घेतलेला देखील दिसून येते. मात्र काळाच्या ओघात मनोरंजन, प्रबोधनाची साधने बदलत गेली आणि ही कीर्तन परंपरा आज कुठेतरी लुप्तप्राय अवस्थेत आहे. मात्र, आता पुन्हा जय जय राम कृष्ण हरी, नानाविध अभंग, यांचे स्वर कानावर पडणार आहे. कीर्तन परंपंरेला नवी संजीवनी देण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'कीर्तनविश्व' हे यु ट्यूब चॅनेल सुरु होत आहे. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कीर्तन क्षेत्रातील वेगवेगळ्या परंपरा,कीर्तनकारांची ओळख होणार आहे.

विश्व मराठी परिषद आणि भीष्म इंडिक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कीर्तन विश्व हे यु ट्यूब चॅनेल गुढी पाडव्याला सुरू होणार आहे. या चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला तीन कीर्तने सादर केली जाणार आहे. यात नारदीय, रामदासी, एकनाथी,वारकरी, राष्ट्रीय, वैज्ञानिक कीर्तनेतुकडोजींच्या, दासगणू,गाडगे महाराजांच्या पठडीतले कीर्तन असणार आहे. नवीन पिढीसह आपल्या कीर्तन परंपरेची ओळख व्हावी, तसेच जुन्या लोकांना पुन्हा एकदा कीर्तनांचा आनंद मिळणार आहे. या कीर्तनांद्वारे ऐतिहासिक, स्वातंत्र्य संग्रामातील शौर्य कथा, महापुरुषांच्या कथा, शास्रज्ञ, संतांच्या कथांचा खजिना उलगडला जाणार आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले, आपल्याला कीर्तनसेवेची मोठी परंपरा आहे.आणि या कीर्तनांचे वेगळेपण म्हणजे  त्यांनी सातत्याने मनोरंजनातून समाज प्रबोधनाची भूमिका निभावली आहे. आजची जीवनशैली प्रचंड धकाधकीची आहे. आणि त्यात सध्याच्या घडीला कोरोना संकटाने तर अवघ्या विश्वात प्रचंड दुःख, भीती, नैराश्य निर्माण झाले आहेत. मात्र या कीर्तनांच्या माध्यमातृन ती निराशा दूर होऊन आत्मविश्वास प्रेरणा,धारिष्ट्य, शक्ती,सकारात्मकता यांच्या जोरावर कोरोनाविरुद्धची लढाईत बळ मिळेल अशी आशा आहे. तसेच बौद्धिक, भावनिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक सांगीतिक, नैतिक आनंद मिळणार आहे.....कोरोना काळात सांस्कृतिक कार्यक्रमांना अनेक मर्यादा आल्या आहेत. त्यातून ऑनलाईन व्यासपीठाचा पर्याय समोर आला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. म्हणून पुढील वर्षभर ऑनलाईन व्यासपीठावर सुरु राहील असा एखादा उपक्रम राबवयाचा होता. आणि तो एकाच माणसाने सादर करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात कीर्तनाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींना घेऊन करावा असे वाटले. आणि त्याच अनुषंगाने हा उपक्रम सुरु केला आहे. सध्या ५२ आठवड्यांचे १५३ कीर्तने तयार आहे. हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहवचण्याचा मानस आहे. चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकAdhyatmikआध्यात्मिक