शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

तिकीट रद्दने रेल्वे मालामाल : वर्षभरात तब्बल ३२ कोटींचा महसूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 18:49 IST

आरक्षित, तात्काळ, प्रतिक्षा यादीतील तिकीट प्रवाशांनी विविध कारणांमुळे रद्द केल्याने मध्य रेल्वे मालामाल होत आहे.

ठळक मुद्देआरक्षणाची स्थिती व तिकीट रद्दच्या कालावधीनुसार प्रति प्रवासी शुल्क आकारले चार महिने आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करता येते.

पुणे : आरक्षित, तत्काळ, प्रतिक्षा यादीतील तिकीट प्रवाशांनी विविध कारणांमुळे रद्द केल्याने मध्य रेल्वे मालामाल होत आहे. रद्द तिकिटाच्या रकमेतून मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला तब्बल ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत यामध्ये सुमारे तीन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. देशातील लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मागील काही वर्षांत प्रवाशांसाठी विविध सुविधा असलेल्या रेल्वेगाड्या मार्गावर आल्या आहे. तिकीट आरक्षणासह विविध सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिकीट खिडकीवरील गर्दी कमी झाली आहे. चार महिने आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करता येते. तसेच काही तास आधी तत्काळ तिकिटाचीही सुविधा आहे. पण अनेकदा काही कारणांमुळे आरक्षित तिकीट रद्द करावे लागते. त्यासाठी रेल्वेकडून प्रति प्रवासी शुल्क घेतले जाते. रेल्वेची प्रवासी संख्या वाढत चालल्याने तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.मागील वर्ष भरता प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटाच्या माध्यमातून रेल्वेला शुल्करुपाने ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. याचा अर्थ दररोज सुमारे ९ लाख रुपये महसूल मिळत आहे. रेल्वेकडून आरक्षित, तात्काळ, प्रिमियम तत्काळ, अंशत: आरक्षित आणि प्रतिक्षा यादीतील तिकीट रद्द करता येते. वातानुकूलित (एसी) प्रथम श्रेणी/एक्झिक्युटिव्ह, एसी टू टायर प्रथम श्रेणी, एसी थ्री टायर चेअर कार, एसी थ्री एकॉनॉमी, शयनयान श्रेणी आणि द्वितीय श्रेणी यांसह आरक्षणाची स्थिती व तिकीट रद्दच्या कालावधीनुसार प्रति प्रवासी शुल्क आकारले जाते. अनेक प्रतिक्षा यादीतील प्रवाशांचे तिकीट आरक्षित होत नाही. त्यामुळे हे प्रवासी तिकीट रद्द करण्याचे प्रमाण अधिक आहे.  ---------आरक्षित तिकीट गाडी सुटण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी रद्द केल्यास प्रथम श्रेणीसाठी २४० रुपये, टू टायरसाठी २००, थ्री टायरसाठी १८० आणि द्वितीय श्रेणीसाठी ६० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर १२ तास आधी तिकीट रद्द केल्यास तिकीट दराच्या २५ टक्के आणि ४ तास आधी रद्द केल्यास ५० टक्के रक्कम शुल्क म्हणून घेतली जाते. गाडी सुटण्याच्या वेळेत किंवा चार तासांत तिकीट रद्द केल्यास तिकीटाचे पैसे परत मिळत नाहीत. त्याचप्रमाणे तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ तिकीट रद्द केल्यासही पैसे परत केले जात नाहीत. प्रतिक्षा यादीतील तिकीट रद्द करण्यासाठी शुल्क आकारले जाते. गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तिकीट रद्द केल्यास ६० रुपये शुल्क घेतले जाते. त्यानंतर मात्र पैसे परत मिळत नाहीत.

तिकीट रद्दमुळे मिळालेला महसुलवर्ष            महसुल२०१८-१९        ३२ कोटी२०१७-१८        २९ कोटी 

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेreservationआरक्षणpassengerप्रवासी