शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Chitra Wagh: वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 14:34 IST

जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे वीज जोड तोडण्यात आले आहेत

पुणे : पुण्यात ज्ञानमंदिरात विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया रचून त्यांचे भविष्य हे तेजोमय आणि उज्ज्वल केले जाते. अशा जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे वीज जोड तोडण्यात आले आहेत. यामुळे या शाळा अंधारात आहेत. विद्येच्या माहेघरातच असं घडल्याने राजकीय पक्षांकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याबरोबरच सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. 

''नितीन राऊतांनीवीज पुरवठा पूर्ववत करावा. अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वाघ यांनी यावेळी दिला आहे.'' 

वाघ म्हणाल्या, पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांची वीज तोडली गेली. तर इतर शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.  कोट्यावधी खर्चून ‘लॅवीश’ घर बनवणा-या ऊर्जा मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अंधार आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तर ऊर्जामंत्रींचे घर रोषणाईच्या झगमगाटात आहे पण पुणे हे विद्येचे माहेरघर अंधारात असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. 

महावितरणकडून बिल न भरल्यामुळे ८०० शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्याबाबत स्थायी समितीमध्ये सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत, बिलाची रक्कम राज्य शासनाने भरावी, असा ठराव करण्याची मागणी केली होती. या आधीही शाळांचे थकीत बिल माफ करण्याबाबत राज्य शासनाने सध्या महावितरण विभागावर कर्जाचा बोजा अधिक असून, थकीत बिलांची रक्कम ग्रामपंचायतीमधील स्वनिधी किंवा १५ व्या वित्त आयोगातून द्यावी, अशा सूचना केल्या होत्या. याला सदस्यांनी विरोध केला होता. ग्रामपंचायतींकडे निधी नसल्याने शाळांची बिले भरायची कशी हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, आज मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीच ग्रामपंचायतींना पत्र काढत ही बिले ग्रामपंचायत निधीमधून भरावीत अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे एकीकडे ग्रामपंचायतीचे आणि दुसरीकडे शाळांच्या वीज बिलांचा बोजा ग्रामपंचायतींवर पडणार आहे.

ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी मधून ही बिले भरण्याचे सुचवले 

जिल्ह्यात एकूण ३ हजार ६३९ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील २ हजार ८४७ शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे, तर १२८ शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे मीटर काढून नेण्यात आले आहे आणि ६६४ शाळांमधील मीटर जाग्यावर असले तरी वीजजोड तोडण्यात आले आहे. या शाळांमध्ये इ लर्निंग तसेच संगणक वापरता येत नसल्याने अध्ययनात अडचणी येत आहेत. यावर तातडीने कारवाई म्हणून स्थायी सभेत ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी मधून ही बिले भरण्याचे सुचवले आहे.

तालुकानिहाय परिस्थिती वीजपुरवठा सुरू आणि कशात वीजपुरवठा बंद आकडेवारी

आंबेगाव - २०० (३४), बारामती - २४३ (३५), भोर - २०० (७४), दौंड - २३८ (५२), हवेली - २१२ (१४), इंदापूर - १८३ (१९४), जुन्नर - ३१० (४१), खेड - ३५६ (४६), मावळ - २४३ (३१), मुळशी - १४६ (५०), पुरंदर - १७५ (४३), शिरूर - २१२ (१४६), वेल्हा - १११ (३२)

टॅग्स :PuneपुणेChitra Waghचित्रा वाघNitin Rautनितीन राऊतelectricityवीजMahavikas Aghadiमहाविकास आघाडी