शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

Nana Patekar: ‘भारत माता की जय’ म्हणून जबाबदारी संपत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 21:32 IST

आमचे खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. आम्ही फक्त कचकडयाचे असतो. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्या कार्याला ख-या अर्थाने ‘सलाम’...अशा शब्दांत जवानांविषयीची कृतार्थ भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देशहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली तरी खूप होईल

पुणे : आमचे खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. आम्ही फक्त कचकडयाचे असतो. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्या कार्याला ख-या अर्थाने ‘सलाम’...अशा शब्दांत जवानांविषयीची कृतार्थ भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. परंतु, अशाच प्रसंगांच्या वेळी आम्ही तुमची आठवण काढतो. खरंतर सामान्य माणसांनी दैनंदिन जीवनातही जवानांचे स्मरण ठेवले पाहिजे. केवळ ‘भारत माता की जय’ म्हटलं म्हणजे जबाबदारी संपत नाही, असे सांगत त्यांनी सामान्यांचे कान टोचले.

1971 च्या भारत-पाक युद्धाच्या विजयी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे  ‘विजयी मशाल’ फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये आणण्यात आली होती. नाना पाटेकर यांच्यासह लहान मुलांनी फुगे हवेत उडवून या विजयाचा जल्लोष केला. त्यानिमित्त एफटीआयआयच्या मुख्य थिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमात पाटेकर बोलत होते. यावेळी 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये सहभागी झालेल्या शहीद बबन रामचंद्र चव्हाण यांची वीरपत्नी सुनीता तसेच विंग कमांडर सुरेश दामोदर कर्णिक (निवृत्त), लेफ्टनंट कमांडर रवींद्रकुमार नारद(निवृत्त), मेजर उदय परशुराम साठे(निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त) यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे मेजर जनरल संदीप भार्गव एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला उपस्थित होते. पाटेकर म्हणाले,  ''प्रहार चित्रपटाच्या निमित्ताने वयाच्या 40 व्या वर्षी कमांडो चा कोर्स पूर्ण केला. तो अत्यंत विलक्षण अनुभव होता. कारगिल युद्धाच्या वेळी मी कुपवाड्याला होतो. एक सैनिक म्हणून ते त्यांचे आयुष्य कसे समर्पित करतात हे मी जवळून पाहिले आहे. पण दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की आम्ही अशाच प्रसंगांच्या वेळी तुमची आठवण काढतो. तुमच्यामुळे आम्ही आहोत हे आम्ही विसरून जातो. केवळ ‘भारत माता की जय’ म्हटलं की जबाबदारी संपत नाही. आपण ठरविले तर खूप काही करू शकतो. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलू शकतो. इतके जरी केले तरी खूप काही केल्यासारखे आहे.''

एफटीआयआयविषयी बोलताना पाटेकर पुढे म्हणाले, एफटीआयआय आणि माझ्या इमारतीची भिंत कॉमन आहे. पण ती भिंत ओलांडून कधी मला या संस्थेत येता आले नाही. कधी कधी वाटतं की आलो नाही ते चांगलेच झाले. कलाकार या नात्याने सुख-दु;खाची अनुभूती घेतली नाही तर मला कलाकार म्हणवण्याचा काही अधिकार नाही. मी आयुष्यभर माझी भूमिका निभावत राहाणार आहे. पुस्तके वाचण्यापेक्षा रोज नवीन लोकांना भेटणे, त्यांची सुखदु;ख जाणून घेणे मला जास्त गरजेचे वाटते. त्यांच्यापेक्षा आपली सुखदु:ख खूप वेगळी आहेत. कलाकारांची लढाई वेगळी आहे. काल त्यांनी केलेलं काम लोक  विसरून जातात. त्यामुळे ज्यांच्या हातात खूप काही आहे. ते किमान मूठभर देऊ शकतात. त्यांनी ते द्यायला हवं. संदीप भार्गव म्हणाले, 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या विजयी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे ही ‘विजयी मशाल’ पुण्यातील ऐतिहासिक स्थळांसह युद्धाच्या ठिकाणच्या आसपासच्या गावांंमध्ये नेली जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयNana Patekarनाना पाटेकरartकला