शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Nana Patekar: ‘भारत माता की जय’ म्हणून जबाबदारी संपत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 21:32 IST

आमचे खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. आम्ही फक्त कचकडयाचे असतो. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्या कार्याला ख-या अर्थाने ‘सलाम’...अशा शब्दांत जवानांविषयीची कृतार्थ भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देशहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली तरी खूप होईल

पुणे : आमचे खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. आम्ही फक्त कचकडयाचे असतो. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्या कार्याला ख-या अर्थाने ‘सलाम’...अशा शब्दांत जवानांविषयीची कृतार्थ भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. परंतु, अशाच प्रसंगांच्या वेळी आम्ही तुमची आठवण काढतो. खरंतर सामान्य माणसांनी दैनंदिन जीवनातही जवानांचे स्मरण ठेवले पाहिजे. केवळ ‘भारत माता की जय’ म्हटलं म्हणजे जबाबदारी संपत नाही, असे सांगत त्यांनी सामान्यांचे कान टोचले.

1971 च्या भारत-पाक युद्धाच्या विजयी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे  ‘विजयी मशाल’ फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये आणण्यात आली होती. नाना पाटेकर यांच्यासह लहान मुलांनी फुगे हवेत उडवून या विजयाचा जल्लोष केला. त्यानिमित्त एफटीआयआयच्या मुख्य थिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमात पाटेकर बोलत होते. यावेळी 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये सहभागी झालेल्या शहीद बबन रामचंद्र चव्हाण यांची वीरपत्नी सुनीता तसेच विंग कमांडर सुरेश दामोदर कर्णिक (निवृत्त), लेफ्टनंट कमांडर रवींद्रकुमार नारद(निवृत्त), मेजर उदय परशुराम साठे(निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त) यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे मेजर जनरल संदीप भार्गव एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला उपस्थित होते. पाटेकर म्हणाले,  ''प्रहार चित्रपटाच्या निमित्ताने वयाच्या 40 व्या वर्षी कमांडो चा कोर्स पूर्ण केला. तो अत्यंत विलक्षण अनुभव होता. कारगिल युद्धाच्या वेळी मी कुपवाड्याला होतो. एक सैनिक म्हणून ते त्यांचे आयुष्य कसे समर्पित करतात हे मी जवळून पाहिले आहे. पण दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की आम्ही अशाच प्रसंगांच्या वेळी तुमची आठवण काढतो. तुमच्यामुळे आम्ही आहोत हे आम्ही विसरून जातो. केवळ ‘भारत माता की जय’ म्हटलं की जबाबदारी संपत नाही. आपण ठरविले तर खूप काही करू शकतो. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलू शकतो. इतके जरी केले तरी खूप काही केल्यासारखे आहे.''

एफटीआयआयविषयी बोलताना पाटेकर पुढे म्हणाले, एफटीआयआय आणि माझ्या इमारतीची भिंत कॉमन आहे. पण ती भिंत ओलांडून कधी मला या संस्थेत येता आले नाही. कधी कधी वाटतं की आलो नाही ते चांगलेच झाले. कलाकार या नात्याने सुख-दु;खाची अनुभूती घेतली नाही तर मला कलाकार म्हणवण्याचा काही अधिकार नाही. मी आयुष्यभर माझी भूमिका निभावत राहाणार आहे. पुस्तके वाचण्यापेक्षा रोज नवीन लोकांना भेटणे, त्यांची सुखदु;ख जाणून घेणे मला जास्त गरजेचे वाटते. त्यांच्यापेक्षा आपली सुखदु:ख खूप वेगळी आहेत. कलाकारांची लढाई वेगळी आहे. काल त्यांनी केलेलं काम लोक  विसरून जातात. त्यामुळे ज्यांच्या हातात खूप काही आहे. ते किमान मूठभर देऊ शकतात. त्यांनी ते द्यायला हवं. संदीप भार्गव म्हणाले, 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या विजयी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे ही ‘विजयी मशाल’ पुण्यातील ऐतिहासिक स्थळांसह युद्धाच्या ठिकाणच्या आसपासच्या गावांंमध्ये नेली जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयNana Patekarनाना पाटेकरartकला