शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

नदी शुद्धतेचा संकल्प, १३ ते १५ एप्रिलला पसायदान संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:26 IST

पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनात जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्काराने गौरवले जाणार आहे. या वेळी लोकसहभागातून नदी शुद्धीकरणाचा संकल्प हाती घेतला जाणार आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे फ्रूटवाले धर्मशाळेच्या परिसरात होणार असून, ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत.

पुणे - पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनात जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्काराने गौरवले जाणार आहे. या वेळी लोकसहभागातून नदी शुद्धीकरणाचा संकल्प हाती घेतला जाणार आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे फ्रूटवाले धर्मशाळेच्या परिसरात होणार असून, ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत.श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पसायदान विचार साहित्य संमेलनात विश्वात्मकता, मानवतावाद, सामाजिक आयाम आदींवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त आणि साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी संस्थानच्या वतीने देहू ते आळंदी लोकसहभागातून जलशुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी नदी शुद्धतेला प्राधान्य दिले जाणार आहे.नदीची स्वच्छता, जलपर्णींची वाढ रोखण्यासाठी प्रयत्न, निर्माल्याची व्यवस्था आदींवर भर दिला जाणार आहे. यासाठी नागरिकांसह वारकरी, स्थानिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, एनसीएस पथक आदींना या प्रकल्पांमध्ये सामावून घेतले जाणार आहे.‘तरंग’ स्मरणिकेचे प्रकाशनपसायदान विचार साहित्य संमेलनात ‘तरंग’ या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. सचिन परब आणि अभिजित सोनावणे यांनी या स्मरणिकेचे काम केले असून, यामध्ये पसायदानामागील विश्वकल्याणाची संकल्पना, आताच्या काळातील उपयुक्तता, विश्वात्मकतेची कल्पना आदींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.१ शुक्रवारी, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संमेलानध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्यासह खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे, नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर आदी मान्यवरांच्याउपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. रात्री ९ ते ११ या वेळेत निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडणार आहे. मनोहर जाधव कविसंमेलमनाच्या अध्यक्षस्थानी असतील.२ शनिवारी, १४ एप्रिल रोजी डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत, ‘पसायदानाची वैश्विकता’, ‘माझा धर्म आणि पसायदान’ या विषयांवर चर्चासत्र, सर्वधर्म प्रार्थना, एकांकिका, हरिपाठ, औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांचे कीर्तन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.३ रविवारी, १५ एप्रिल रोजी ‘मला उमगलेले पसायदान’, ‘माझे राजकारण, माझे अध्यात्म’, ‘संतवाणी’ या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ४.३० वाजता कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार असून, या वेळी डॉ. राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे