शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

एसटीतील राखीव आसने नियमांच्या जोखडात    

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 07:00 IST

एसटी म्हणते, बसस्थानकातून बस सुटल्यानंतर ‘राखीव’ नाही

ठळक मुद्दे‘एसटी’ बसमध्ये अपंग, महिला, ज्येष्ठ नागरीक, आमदार, खासदार यांच्यासाठी काही आसने राखीव ‘एसटी’नेच असा नियम केलेला असल्याने संबंधित प्रवाशांची कोंडी

पुणे : एसटी महामंडळाच्या बसमधील अपंगांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेली आसने नियमांच्या जोखडात अडकली आहेत. गाडी बसस्थानकात असेपर्यंतच संबंधित आसनांवर अपंग, महिला व इतर आपला हक्क सांगू शकतात. बस सुटण्याच्या ठिकाणी संबंधित आसनांवर इतर प्रवासी बसलेले असल्यास पुढे मार्गात कुठेही त्यांना उठविता येणार नाही, असा अजब नियम एसटीने केलेला आहे. याचा फटका संबंधित घटकांना बसत आहे.

‘एसटी’ बसमध्ये अपंग, महिला, ज्येष्ठ नागरीक, आमदार, खासदार यांच्यासाठी काही आसने राखीव ठेवलेली असतात. आमदार, खासदार वगळता इतर घटक एसटीने नेहमी प्रवास करतात. पण त्यांना अनेकदा या राखीव आसनांचा काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या बसस्थानकावरून बस सुटण्यापुर्वी राखीव आसनांवर इतर प्रवासी बसलेला असल्यास काही वेळ आधी तिथे वाहकांकडून आसने रिकामे करून दिले जाऊ शकते. पण एकदा ही बस मार्गस्थ झाल्यानंतर मधल्या कोणत्याही स्थानकात अपंग, महिला किंवा इतर घटकांना त्यांच्या राखीव आसनांवर हक्क सांगता येत नाही. ‘एसटी’नेच असा नियम केलेला असल्याने संबंधित प्रवाशांची कोंडी झाली आहे. अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाचे अध्यक्ष दिपक ढोबळे यांनाही नुकताच असा अनुभव आला. ढोबळे हे पारगावमध्ये जांबूनतकडून परळ कडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये अपंगांच्या राखीव आसनावर बसले. त्यांना मंचरपर्यंत जायचे होते. पिंपळगाव येथे इतर प्रवासी गाडीमध्ये  बसल्यावर ४ क्रमांकाचे आसनावर आरक्षणाचे तिकीट असल्याचे सांगत त्यांना उठण्यास सांगितले. हे राखीव आसन असल्याने सुरूवातीला त्यांनी उठण्यास नकार दिला. पण एसटीने हे आसन आरक्षित तिकीट दिल्याने उठावे लागले. असा अनुभव संबंधितांना वारंवार येत असल्याची नाराजी ढोबळे यांनी व्यक्त केली. ‘अपंग व्यक्तीला राखीव ठेवलेली आसने इतर लोकांना आरक्षित करून दिली जात असेल आणि अपंग व्यक्तींच्या वाट्याला अन्यायच येत असेल तर अपंग संघाला रस्त्यावर उतरावे लागेल. अपंग किंवा इतर घटकांसाठीची राखीव आसने त्यांना मिळायला हवीत. एसटीने हा नियम बदलण्याची गरज आहे, असे ढोबळे यांनी सांगितले.----------एसटी म्हणते, बसस्थानकातून बस सुटल्यानंतर ‘राखीव’ नाहीएसटी मधील अपंगांसाठी राखीव असलेल्या आसनांचे आरक्षण दिल्यानंतर अपंगांनी कुठे बसायचे. वाहकांच्या म्हणण्यानुसार अपंगांच्या राखीव जागेवर बसण्यासाठी गाडी सुटते त्या स्थानकावरुन बसने गरजेचे आहे. पण एखाद्याला शिरुरवरुन पुण्याला यायचे असेल व गाडी बीड -पुणे असेल तर त्याने बसायला बीडला जायचे का? अपंगांना जिथे बसेल तिथेच राखीव आसनांवर जागा दिली पाहिजे.- हरिदास शिंदे, दिव्यांग चळवळीतील कार्यकर्ते...........जादा गाड्यांना राखीव आसनांचा नियम लागु होत नाही. तसेच इतर गाड्यांमध्ये पहिल्या बसस्थानकातच राखीव आसनांवर संबंधित बसू शकतात. ही गाडी पुढे गेल्यानंतर इतर ठिकाणी राखीव आसनांवर हक्क सांगता येत नाही. या आसनांवर इतर प्रवासी बसलेले असल्यास त्यांना उठविता येत नाही. हा एसटीचा पुर्वीपासूनच नियम आहे. एसटीचा प्रवास लांबपल्याचा असल्याने हा नियम करण्यात आलेला आहे. - यामिनी जोशी, वाहतुक नियंत्रक, पुणे विभागएसटी महामंडळ

टॅग्स :Puneपुणेpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सDivyangदिव्यांग