शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

"आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 13:09 IST

नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचे आहे, असा गंभीर आरोपही गांधी यांनी यावेळी केला....

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशात आरक्षणासाठी असलेली ५० टक्के मर्यादा हटविण्यात येईल. दलित १५ टक्के, आदिवासी ८ टक्के आणि मराठा, धनगर यांसह मागासलेला वर्ग ५० टक्के असे एकूण ७३ टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली.

नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचे आहे, असा गंभीर आरोपही गांधी यांनी यावेळी केला. संविधान संपवण्याचा प्रयत्न म्हणजे या देशाची ओळख संपविण्याचा प्रयत्न आहे. आम्ही महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान कधीही संपवू देणार नाही, असेही ते म्हणाले.

पुणे लाेकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची शुक्रवारी जाहीर सभा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उल्हास पवार, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ॲड. वंदना चव्हाण , दिप्ती चौधरी, उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस आणि महाविकास आघाडी लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहे. ज्या भारतीय लोकांनी लढाई करून संविधान बनविले त्याला भाजपकडून मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधानाने दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि गरिबांना आधार मिळाला आहे. मात्र तोच आधार काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधान नसेल तर केवळ २५ लोकांच्या हातात देश जाईल. मोदींनी २२ लोकांचे १६ लाख करोड रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार केला जात नाही. देशातील ९० टक्के लोक मनरेगातून आणि इतर साधी कामे करीत आहे. दलित आदिवासी यांना शोधायचे असेल तर कामगाराच्या यादीत शोधावे लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे.

जातीवर आधारित जणगणना केली जाणार :

आमचे सरकार आल्यावर जातीवर आधारित जनगणना केली जाईल. त्या-त्या जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी दिली जाणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर देशात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल. त्याचबरोबर अग्निवीर योजनेसह जीएसटी कर बंद केला जाईल. सध्या पेपरफुटीचे प्रमाण वाढले आहे. पेपर लिक करणाऱ्यांनाही कडक शिक्षा दिली जाईल. सर्व पेपर सरकारी आयोगामार्फत घेतले जातील.

ज्येष्ठ नेत्याचा अपमान करणे पंतप्रधान पदाला शोभते का?

चारशे महिलांवर बलात्कार करणाऱ्या रेवण्णासाठी नरेंद्र मोदी कर्नाटकात मते मागत आहेत. ज्या व्यक्तीने एवढे अत्याचार केले. त्यांच्यासाठी मोदी प्रचार करत आहेत. सध्या मोदी कधी पाकिस्तानचा मुद्दा आणत आहेत तर कधी समुद्राच्या खाली जाऊन स्टंट करतायत. ज्येष्ठ नेत्यांचा (शरद पवार) अपमान करण्यात नरेंद्र मोदी व्यस्त आहेत. असे वागणे देशाच्या पंतप्रधान पदाला शोभत नाही, म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर प्रहार केला.

माध्यमांनाही खडेबोल :

बड्या माध्यमांमध्ये गरीब किंवा दलित व्यक्ती कधीच दिसणार नाही. केवळ अंबानीची लग्नं दाखवण्यात माध्यमे व्यस्त आहेत. हे पत्रकार सामान्यांचे नसून, अदानींचे आहेत. शेतकरी मरतोय, महागाई वाढली आहे. सीबीआय ईडीचा दबाव टाकला जातोय पण माध्यमे काहीच बोलणार नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी माध्यमांनाही खडेबोल सुनावले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीreservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीpune-pcपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४