शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

बाणेरपाठोपाठ कोथरूडमधील भूखंडाचे उठविले आरक्षण, शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:34 AM

महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून शहराच्या मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील नागरी हितासाठी राखीव भूखंडांवरचे आरक्षण उठवण्याचा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला.

पुणे - महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून शहराच्या मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील नागरी हितासाठी राखीव भूखंडांवरचे आरक्षण उठवण्याचा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला. बाणेरपाठोपाठ कोथरूड येथील तीन भूखंडांवरचे आरक्षण उठविण्यात आले असून, या भूखंडांची किंमत शेकडो कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही यात सहभागी असल्याची टीका श्याम देशपांडे यांनी केली.राज्य सरकारनेच नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने तयार केलेल्या विकास आराखड्याला यापूर्वीच सरकारने मंजुरी दिली आहे. आता ऐनवेळी त्यातल्या काही भूखंडांवरील आरक्षण कोणाच्या तरी फायद्यासाठी, कोणाच्या तरी सांगण्यावरून उठवले जात आहे, असा आरोप देशपांडे यांनी केला. बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३५ या भूखंडाचे आरक्षण उठवण्याबरोबरच आता कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक १५९, १६० व १६७ या भूखंडांवरचेही आरक्षण उठवले जात आहे. शिवसेना याला तीव्र विरोध करणार असून, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले जाईल, अशा इशारा त्यांनी दिला. या वेळी गजानन थरकुडे, संदीप मोरे, उत्तम भेलके आदी उपस्थित होते.देशपांडे म्हणाले, ‘आरक्षण बदलायचे असेल तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे, तीडावलून सरकारने थेट नगररचना संचालकांना या भूखडांवरचे आरक्षण बदलण्याची प्रक्रिया सुरू करायला सांगितले आहे, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.कोथरूड हे आता वाढत्या पुणे शहराचे केंद्रस्थान झाले आहे. तिथे शाळा, मैदाने, दवाखाने, उद्याने यांची आत्यंतिक गरज आहे. ती लक्षात घेऊनच उद्यान, अग्निशमन केंद्र व प्राथमिक शाळा यासाठी आरक्षण ठेवण्यात आले होते. ही सगळी आरक्षणे रद्द करण्याचा सरकारचा डाव असून शिवसेना त्याला तीव्र विरोध करणार आहे.उद्याने, मैदानासाठीचे आरक्षण केले रद्दउद्याने व मैदानांसाठीचे आरक्षण रद्द करू नये, असाधारण परिस्थितीत तसा निर्णय घेणे भागच पडल्यास त्यासाठी कॅबिनेटची मंजुरी घ्यावी, असा सरकारचाच निर्णय आहे.सरकारनेच मंजूर केलेल्या विकास आराखड्यातील या आरक्षित भूखंडांमध्ये वर्षभरात असा कोणता बदल झाला, की सरकारला त्या भूखंडांवरचे आरक्षण रद्द करणे भाग पडले आहे, असा प्रश्न श्याम देशपांडे यांनी केला.रद्द करण्यात येत असलेल्या भूखंडाचा सातबारा उतारा फक्त कोआॅपरेटिव्ह सोसायटीच्या नावे आहे, ही सोसायटी कोणाच्या नावे आहे ते सरकारने जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.आरक्षण आहे तसेच ठेवून हवे असेल तर तिथे पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधावीत म्हणजे विकासकामांसाठी बाधित कुटुंबांचे तिथे पुनर्वसन करता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका