शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन केंद्र उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती, प्रशासन, आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती, प्रशासन, आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा आढावा घेणारा एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर संशोधन करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीमध्ये संशोधन केंद्र आणि जगभरातील सर्वोत्तम ग्रंथालयाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पुण्यात केली.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखित ‘माती पंख आणि आकाश’ या पुस्तकाला गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्त डॉ. मुळे यांचा सत्कार सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी सामंत यांनी रत्नागिरीत शिवाजी महाराज यांच्यावर संशोधन करता येईल, असे केंद्र उभारणार असल्याचे सांगितले. संवाद पुणे तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन ईटकर आदी या वेळी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, रत्नागिरीतील संशोधन केंद्राच्या ठिकाणी जागतिक दर्जाचे भव्य ग्रंथालय उभारण्यात येणार असून शिवाजी महाराजांसह महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासाची पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध होणार आहेत,

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, डॉ. मुळे यांनी यशाच्या माध्यमातून आकाशात अनेक भराऱ्या घेतल्या तरीही त्यांनी मातीशी नाळ तुटू दिली नाही. संधी मागून मिळत नाही ती खेचून आणावी लागते असे काम त्यांनी केले आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून लवकरच प्रबोधनकार ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रबोधन या नियतकालिकाच्या शंभर अंकांच्या संचाचे प्रकाशन करण्यात येणार

सत्काराला उत्तर देताना डॉ. मुळे म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्र झळकला पाहिजे, ही आपली अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. यशासाठी शंभर पावले टाकण्याची प्रतिज्ञा केली जाते पण शंभरावे पाऊल टाकताना मराठी तरुण अडखळतो. यामुळेच मराठी माणूस मागे राहिला ही बोचरी जाणीव आहे. महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाय हवी, राजकारण वाईट नाही, सगळ्या चांगल्या व्यक्तींनी राजकारणात जरूर यावे. समाजपरिवर्तन झाले पाहिजे, निवृत्ती ही प्रवृत्ती व्हावी आणि रिटायरमेंट ही रि-अटायरमेंट असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सावनी विनिता यांनी सूत्रसंचालन केले तर निकिता मोघे यांनी आभार मानले.

----------------------