शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पुण्यात काँग्रेसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवा; नव्यांना संधी द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 22:30 IST

काँग्रेस पक्षाच्या संघटनेत राज्यात अनेक ठिकाणी मोठी धुसफूस सुरू

ठळक मुद्देपक्ष निरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांची मागणी : थोरातांनी पाठवले निरीक्षक

राजू इनामदार - पुणे : मध्य प्रदेशातील काँग्रेस फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाराज पक्ष पदाधिकाऱ्यांकडे लक्ष देण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना बदला. नव्यांना संधी द्या, अशी मागणी काँग्रेस अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाने पाठवलेल्या निरिक्षकांकडे केली. पुण्यातील नाराजांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांनी गुरुवारी पक्षाचे निरीक्षक म्हणून प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांना पुण्यात पाठविले. अन्य शहरांमध्येही हा प्रयोग राबवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनेत अनेक ठिकाणी मोठी धुसफूस सुरू आहे. वर्षानुवर्षे वेगवेगळ्या पदांवर ठाण मांडून बसलेल्यांच्या विरोधात टीकाटिप्पणी सुरू आहे. मात्र वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली जात नाही. तेच शहराध्यक्ष, तेच प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदांवरही तेच तेच नगरसेवक यामुळे गेली अनेक वर्षे पक्षाचे काम निष्ठापूर्वक करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना बदला, नव्यांना संधी द्या, अशी मागणी पुण्यासह अनेक शहरांमधून होत आहे.पुण्यातल्या काहींनी त्याबाबत प्रदेश शाखेला लेखी पत्र दिले होते. त्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी शर्मा यांना पाठविले. त्यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या आजी-माजी आमदार, नगरसेवक, तसेच प्रमुख पदाधिकाºयांची भेट घेतली. अन्य काही पदाधिकारीही वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. शर्मा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की कार्यकर्ते, पदाधिकारी काम करीत असतात. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी प्रदेशाध्यक्षांची थोरातांची भावना आहे. त्यांच्याच सूचनेवरून हा संवाद साधण्यात आला. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्षांना देऊ. पालिकेतील गटनेतेपद व शहराध्यक्ष याबाबत सर्वांशी बोललो. काय बोलणे झाले, याचा तपशील देण्यास शर्मा यांनी नकार दिला व प्रदेशाध्यक्ष याबाबतीत सांगतील, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर बाळासाहेब थोरात यांची निवड झाली. त्यांनी पाच विभागीय कार्याध्यक्ष नियुक्त केले. विधानसभा निवडणुकीनंतर त्या पाच विभागीय कार्याध्यक्षांपैकी खुद्द प्रदेशाध्यक्ष थोरात हेच मंत्री झाले. त्याशिवाय विश्वजित कदम यांच्यासह अन्य तीनही मंत्री झाले. त्यामुळे या कार्याध्यक्षांचे पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्याची दखल थोरात यांनी घेतल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRahul Gandhiराहुल गांधी