शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ऋणानुबंध कधी दूर जात नसतात - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 00:41 IST

प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे.

बारामती - प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे. यापुर्वी काही झालं असेल ते स्थानिक पातळीवरील संघर्षातून झालं. प्रवेश हा अन्य ठिकाणी विचारांनी वेगळे असलेल्यांचा प्रवेश असतो. संजय शिंदे यांचा प्रवेश का म्हणायचा असा सवाल राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.बारामती येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांच्यासह सोलापुर, सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी पवार म्हणाले, सोलापूर जिल्ह्याशी आपले पूर्वीपासून संबंध आहेत. यामध्ये नामदेवराव जगताप,विठ्ठलराव शिंदे,गणपतराव देशमुख अशी अनेक नावे आहेत.माढा तालुक्यात खट्ट वाजल तरी विठ्ठलराव हक्काने सांगायचे,तो प्रश्न आम्ही निकाली लावायचो.संजय शिंदे म्हणाले, ‘‘ राष्ट्रवादीपासून आपण फार लांब ही गेलो नव्हतो. अन्य कोणत्याही पक्षात सहभागीही झालेलो नव्हतो. शरद पवार व आमच्या कुटुंबियांचे पिढ्यानपिढ्या ऋणानुबंध आहेत. अनेकवेळा विविध अडचणी आल्यानंतर शरद पवार यांनी सहकार्य केलेले आहे,त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या विचारांचाच होतो.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात काही घडामोडी झाल्या.जिल्ह्याचे नेतृत्व दिलेल्या लोकांनी चुकीचे काम केले. त्या मंडळींनी सहकारी संस्था,पतसंस्था बँका यामध्ये चुकीची कामे केल्याने जिल्ह्यातील शरद पवार यांच्या विचारांवर प्रेम करणारा मतदार काही प्रमाणात बाजूला गेला.याबाबत आपण २०१४ च्या निवडणुकीपुर्वी पत्रही दिले होते. त्याचे परिणाम आज पहायला मिळतात.’’विरोधी पक्षात जाणाऱ्यांची कारणे अनेक आहेत. कोणाच्या अडचणी आहेत. कोणाचे देणे आहेत, हे सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे., असा टोला यावेळी शिंदे यांनी मोहिते-पाटील यांचे नाव न घेता लगावला. मी कोणत्याही अडचणीसाठी आलो नसून शरद पवार यांच्या प्रेमापोटी आलो असल्याचे शिंदे यांनी म्हणाले. यावेळी विधानपरीषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बबन शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दीपक साळुंखे, रश्मी बागल, सुनिल माने यांची भाषणे झाली. माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुणे जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते,बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.कागदाचे विमान बनविले नाही, त्यांना विमान बनविण्याचे काम दिलेराफेलप्रकरणी टीका करताना पवार म्हणाले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना फ्रान्सच्या राफेल कंपनीबरोबर चर्चा झाली. एका विमानाची किंमत ३५० कोटी सांगितली होती.निवडणुकीमुळे तो निकाल राहिला. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर यावर निर्णय झाला.३५० कोटीच्या विमानाची २०१५ मध्ये ७५० कोटी रुपये किंमत झाली.आज तेच १६६० कोटींना गेले. आपण विमाने घेतो,त्यावेळी काही विमान घेउन त्याचे तंत्र घेतो.बाकीची विमान आपण तयार करतो. देशात सरकारचा लखनौ, नाशिकला विमान बनविण्याचा कारखाना आहे.मात्र, या सरकारने विमान बनविण्याचा अधिकार सरकारी कंपनीला दिले नाही. रिलायन्स कंपनीला दिले.त्या कंपनीने आता जमीन घेतली. इमारत बांधली नाही. यंत्रणा बसविलेली नाही. ज्यांना काम दिले त्यांनी कागदाच विमान सुध्दा बनविले नाही अशांना विमान बनविण्याचे काम दिले.याचा अर्थ हा व्यवहार स्वच्छ नाही. .आम्ही चौकशीची मागणी केली.ती देखील केंद्र सरकारने मान्य केली न्नाही. राजीव गांधी प्रधानमंत्री होते.त्यावेळी बोफोर्सची तोफ घेतली होती.त्यांच्यावर आरोप करण्यात आले. राजीव गांधी यांनी चौकशीचे आदेश दिले, त्यामध्ये काही निघाले नाही. त्यावेळी त्यांच्यावर आरोप करणारे आज सत्ताधारी आहेत. या प्रकारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक