शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऋणानुबंध कधी दूर जात नसतात - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 00:41 IST

प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे.

बारामती - प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे. यापुर्वी काही झालं असेल ते स्थानिक पातळीवरील संघर्षातून झालं. प्रवेश हा अन्य ठिकाणी विचारांनी वेगळे असलेल्यांचा प्रवेश असतो. संजय शिंदे यांचा प्रवेश का म्हणायचा असा सवाल राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.बारामती येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांच्यासह सोलापुर, सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी पवार म्हणाले, सोलापूर जिल्ह्याशी आपले पूर्वीपासून संबंध आहेत. यामध्ये नामदेवराव जगताप,विठ्ठलराव शिंदे,गणपतराव देशमुख अशी अनेक नावे आहेत.माढा तालुक्यात खट्ट वाजल तरी विठ्ठलराव हक्काने सांगायचे,तो प्रश्न आम्ही निकाली लावायचो.संजय शिंदे म्हणाले, ‘‘ राष्ट्रवादीपासून आपण फार लांब ही गेलो नव्हतो. अन्य कोणत्याही पक्षात सहभागीही झालेलो नव्हतो. शरद पवार व आमच्या कुटुंबियांचे पिढ्यानपिढ्या ऋणानुबंध आहेत. अनेकवेळा विविध अडचणी आल्यानंतर शरद पवार यांनी सहकार्य केलेले आहे,त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या विचारांचाच होतो.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात काही घडामोडी झाल्या.जिल्ह्याचे नेतृत्व दिलेल्या लोकांनी चुकीचे काम केले. त्या मंडळींनी सहकारी संस्था,पतसंस्था बँका यामध्ये चुकीची कामे केल्याने जिल्ह्यातील शरद पवार यांच्या विचारांवर प्रेम करणारा मतदार काही प्रमाणात बाजूला गेला.याबाबत आपण २०१४ च्या निवडणुकीपुर्वी पत्रही दिले होते. त्याचे परिणाम आज पहायला मिळतात.’’विरोधी पक्षात जाणाऱ्यांची कारणे अनेक आहेत. कोणाच्या अडचणी आहेत. कोणाचे देणे आहेत, हे सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे., असा टोला यावेळी शिंदे यांनी मोहिते-पाटील यांचे नाव न घेता लगावला. मी कोणत्याही अडचणीसाठी आलो नसून शरद पवार यांच्या प्रेमापोटी आलो असल्याचे शिंदे यांनी म्हणाले. यावेळी विधानपरीषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बबन शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दीपक साळुंखे, रश्मी बागल, सुनिल माने यांची भाषणे झाली. माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुणे जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते,बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.कागदाचे विमान बनविले नाही, त्यांना विमान बनविण्याचे काम दिलेराफेलप्रकरणी टीका करताना पवार म्हणाले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना फ्रान्सच्या राफेल कंपनीबरोबर चर्चा झाली. एका विमानाची किंमत ३५० कोटी सांगितली होती.निवडणुकीमुळे तो निकाल राहिला. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर यावर निर्णय झाला.३५० कोटीच्या विमानाची २०१५ मध्ये ७५० कोटी रुपये किंमत झाली.आज तेच १६६० कोटींना गेले. आपण विमाने घेतो,त्यावेळी काही विमान घेउन त्याचे तंत्र घेतो.बाकीची विमान आपण तयार करतो. देशात सरकारचा लखनौ, नाशिकला विमान बनविण्याचा कारखाना आहे.मात्र, या सरकारने विमान बनविण्याचा अधिकार सरकारी कंपनीला दिले नाही. रिलायन्स कंपनीला दिले.त्या कंपनीने आता जमीन घेतली. इमारत बांधली नाही. यंत्रणा बसविलेली नाही. ज्यांना काम दिले त्यांनी कागदाच विमान सुध्दा बनविले नाही अशांना विमान बनविण्याचे काम दिले.याचा अर्थ हा व्यवहार स्वच्छ नाही. .आम्ही चौकशीची मागणी केली.ती देखील केंद्र सरकारने मान्य केली न्नाही. राजीव गांधी प्रधानमंत्री होते.त्यावेळी बोफोर्सची तोफ घेतली होती.त्यांच्यावर आरोप करण्यात आले. राजीव गांधी यांनी चौकशीचे आदेश दिले, त्यामध्ये काही निघाले नाही. त्यावेळी त्यांच्यावर आरोप करणारे आज सत्ताधारी आहेत. या प्रकारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक