शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार, भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 03:04 IST

भामा-आसखेड धरणांमध्ये जमिन गेलेल्या प्रकल्पबांधित शेतकºयांना आपल्या जमिनीचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली १६/२ ची नोटिसा देणे, बाधित गावांमध्ये नागरी सुविधांसाठी अडीच कोटींच्या कामांचा प्रस्ताव तयार करणे, जिल्ह्यातील इतर प्रकल्पात शिल्लक जमिनींची माहिती संकलीत करणे

पुणे - भामा-आसखेड धरणांमध्ये जमिन गेलेल्या प्रकल्पबांधित शेतकºयांना आपल्या जमिनीचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली १६/२ ची नोटिसा देणे, बाधित गावांमध्ये नागरी सुविधांसाठी अडीच कोटींच्या कामांचा प्रस्ताव तयार करणे, जिल्ह्यातील इतर प्रकल्पात शिल्लक जमिनींची माहिती संकलीत करणे, शेतक-यांना पाणी परवान्यांचे वाटप करणे, पाणलोट क्षेत्रातील गावांसाठी अनुदान देणे आदी अनेक सकारात्मक निर्णय गुरुवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे प्रकल्पग्रस्तांना आपला प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाल्या आहेत.खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणासाठी २००० मध्ये एक हजार हेक्टर जमिन संपादित करण्यात आली होती. या धरणामुळे परिसरातील तब्बल १ हजार ३१३ शेतकरी कुटुंबे बाधित झाले आहेत. यापैकी १११ शेतकºयांनी शासनाने जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी यासाठी ६५ टक्के रक्कम भरली होती. परंतु जलसंपदा विभाग आणि पुनर्वसन विभाग यांच्यातील गोंधळामुळे आपल्याला १६/२ च्या नोटीसच देण्यात न आल्याने ३८८ शेतकºयांनी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये न्यायालयाने शेतकºयांच्या बाजूने निर्णय देत भामा-आसखडे प्रकल्पग्रस्तांना त्वरित ६५ टक्के रक्कम भरून घेण्यासाठी १६/२ च्या नोटिसा देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु या नोटिसा दिल्यानंतर शेतकºयांना वाटप करण्यासाठी जमीनच शिल्लक नसल्याने पेच निर्माण झाला आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे यांच्यासोबत गुरुवारी भामा-आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ४०३ खातेदारांना १६/२ च्या नोटिसा देऊन ६५ टक्के रक्कम कपातीचे दाखल देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच ही रक्कम कपात केल्यानंतर ज्या शेतकºयांची सर्वाधिक व संपूर्ण जमीन धरणांमध्ये गेली त्यांना प्राधान्यक्रमाने शिल्लक जमिनीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काळे यांनी सांगितले.तसेच धरणामुळे २३ गावे बाधित झाली असून, या गावांमध्ये रस्ते, पाणी व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २.५० कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव तयार करून तातडीने कामे सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.सध्या धरणामुळे पाणी असतानादेखील लगतच्या शेतकºयांना हे पाणी उचलता येत नाही. जमिनी घेऊनदेखील प्रकल्पग्रस्तांना पाणी न देण्याच्या जलसंपदा विभागाच्या निणर्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी होती.यावर तोडगा काढत बैठकीमध्ये शेतकºयांना तातडीने पाणी परवान्यांचेदेखील वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काळे यांनी सांगितले.

टॅग्स :DamधरणPuneपुणे