शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक गावांचे पुनर्वसन रखडले, ग्रामस्थ दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:30 IST

भूस्खलन व दरडी कोसळण्यामुळे धोकादायक झालेल्या आंबेगाव तालुक्यातील ५ गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय रखडला आहे. सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करा, आमचे माळीण होऊ देऊ नका, या मागणीसाठी ग्रामस्थांचे हेलपाटे सुरू असले, तरी प्रशासनाकडून हालचालींना वेग येत नसल्याने यंदाचा पावसाळाही या गावांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे.

डिंभे  - भूस्खलन व दरडी कोसळण्यामुळे धोकादायक झालेल्या आंबेगाव तालुक्यातील ५ गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय रखडला आहे. सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करा, आमचे माळीण होऊ देऊ नका, या मागणीसाठी ग्रामस्थांचे हेलपाटे सुरू असले, तरी प्रशासनाकडून हालचालींना वेग येत नसल्याने यंदाचा पावसाळाही या गावांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे. काही ठिकाणी जागेची अडचण तर जिथे जागा उपलब्ध आहे, तिथे प्रशासनाचे दुर्लक्ष या स्थितीत पुनर्वसनाचे घोंगडे भिजत पडले आहे.आंबेगाव तालुक्यातील भगतवाडी, पसारवाडी, असाणे, बेंढारवाडी व काळवाडी ही गावे धोकादायक झाली आहेत. येथे भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या गावांमध्येही दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचण्याच्या घटना घडत आहेत. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बेंढारवाडी येथे जमिनीला भेगा पडून दरडी कोसळल्या होत्या. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी पाहणी करून या घटनेचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला होता.काळवाडी या गावावर कोणत्याही क्षणी अवजड दगड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी साधा आवाज झाला, तरी भीतीपोटी आम्ही घराबाहेर धाव घेत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. पुनर्वसनासाठी ३० आॅगस्ट २०१७ रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. बैठकीस या गावांचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन पुनर्वसनासाठीच्या दिशा निश्चित करण्यात आल्या होत्या. कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, वनपरीक्षेत्र अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपअभियंता सां.बा. विभाग, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता म. रा. वि. वि. मंडळ, तालुका आरोग्य अधिकारी, मंडल अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, तलाठी, प्रकल्पाधिकारी एकात्मिक बालविकास व धोकादायक गावचे ग्रामसेवक व सरपंच यांना सविस्तर माहितीसह पाचारण करण्यात आले होते.यावेळी पुनर्वसणासाठी येणाºया अडचणींवर चर्चा करण्यात आली. पसारवाडी व बेंढारवाडी येथील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध असल्याचे सांगितल्याने डिंभे धरणामुळे बाधित झालेली ३९ घरे व भूस्खलनामुळे संवेदनशील झालेल्या १६ घरांची मदत व पुनर्वसनाखाली पुनर्वसन करावे. पसारवाडी येथील २७ घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. भगतवाडी येथील १३ कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. असाणे येथील १०० ते १२५ घरे आहेत. काळवाडी येथील नं.१ मधील ३४ घरे व नं. २ मधील १७ घरांचे पुनर्वसन करावे लागणार, यावर चर्चा झाली होती.नियोजनाची बैठक होऊन सहा महिने होत आले, तरी एकाही गावच्या पुनर्वसनाचे काम मार्गी लागले नाही. यामुळे अतिसंवेदनशील गावांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पुढील दोन महिन्यांत काहीच काम मार्गी लागले नाही, तर या पावसाळाही गावकºयांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे.धोकादायक परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढा, या मागणीसाठी गावकरी रोज हेलपाटे मारत आहेत; मात्र गावकºयांच्या या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या गावांचे तातडीने पुनर्वसन झाले नाही, तर आंबेगाव तालुक्यात दुसरे माळीण होण्याची भीती निर्माण झाली आहे.आंबेगाव तालुक्यातील पाच गावे अतिसंवेदनशील झाली असून, मानवीवस्तीसाठी धोकादायक झाली आहेत. पावसाळ्यात येथे जमिनीला भेगा पडून भूस्खलनामुळे कोणत्याही क्षणी घरे गाडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील पावसाळ्यात काळवाडी (ता. आंबेगाव) येथे दरडी कोसळल्याने परिस्थितीची माहिती देताना भयभीत झालेले ग्रामस्थ. या धोकादाय स्थितीतून आम्हाला बाहेर काढा, आमचे माळीण होऊ देऊ नका. एवढीच मागणी या पाचही गावच्या ग्रामस्थांची आहे.

टॅग्स :Puneपुणे