शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

धोकादायक गावांचे पुनर्वसन रखडले, ग्रामस्थ दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:30 IST

भूस्खलन व दरडी कोसळण्यामुळे धोकादायक झालेल्या आंबेगाव तालुक्यातील ५ गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय रखडला आहे. सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करा, आमचे माळीण होऊ देऊ नका, या मागणीसाठी ग्रामस्थांचे हेलपाटे सुरू असले, तरी प्रशासनाकडून हालचालींना वेग येत नसल्याने यंदाचा पावसाळाही या गावांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे.

डिंभे  - भूस्खलन व दरडी कोसळण्यामुळे धोकादायक झालेल्या आंबेगाव तालुक्यातील ५ गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय रखडला आहे. सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करा, आमचे माळीण होऊ देऊ नका, या मागणीसाठी ग्रामस्थांचे हेलपाटे सुरू असले, तरी प्रशासनाकडून हालचालींना वेग येत नसल्याने यंदाचा पावसाळाही या गावांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे. काही ठिकाणी जागेची अडचण तर जिथे जागा उपलब्ध आहे, तिथे प्रशासनाचे दुर्लक्ष या स्थितीत पुनर्वसनाचे घोंगडे भिजत पडले आहे.आंबेगाव तालुक्यातील भगतवाडी, पसारवाडी, असाणे, बेंढारवाडी व काळवाडी ही गावे धोकादायक झाली आहेत. येथे भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या गावांमध्येही दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचण्याच्या घटना घडत आहेत. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बेंढारवाडी येथे जमिनीला भेगा पडून दरडी कोसळल्या होत्या. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी पाहणी करून या घटनेचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला होता.काळवाडी या गावावर कोणत्याही क्षणी अवजड दगड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी साधा आवाज झाला, तरी भीतीपोटी आम्ही घराबाहेर धाव घेत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. पुनर्वसनासाठी ३० आॅगस्ट २०१७ रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. बैठकीस या गावांचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन पुनर्वसनासाठीच्या दिशा निश्चित करण्यात आल्या होत्या. कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, वनपरीक्षेत्र अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपअभियंता सां.बा. विभाग, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता म. रा. वि. वि. मंडळ, तालुका आरोग्य अधिकारी, मंडल अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, तलाठी, प्रकल्पाधिकारी एकात्मिक बालविकास व धोकादायक गावचे ग्रामसेवक व सरपंच यांना सविस्तर माहितीसह पाचारण करण्यात आले होते.यावेळी पुनर्वसणासाठी येणाºया अडचणींवर चर्चा करण्यात आली. पसारवाडी व बेंढारवाडी येथील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध असल्याचे सांगितल्याने डिंभे धरणामुळे बाधित झालेली ३९ घरे व भूस्खलनामुळे संवेदनशील झालेल्या १६ घरांची मदत व पुनर्वसनाखाली पुनर्वसन करावे. पसारवाडी येथील २७ घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. भगतवाडी येथील १३ कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. असाणे येथील १०० ते १२५ घरे आहेत. काळवाडी येथील नं.१ मधील ३४ घरे व नं. २ मधील १७ घरांचे पुनर्वसन करावे लागणार, यावर चर्चा झाली होती.नियोजनाची बैठक होऊन सहा महिने होत आले, तरी एकाही गावच्या पुनर्वसनाचे काम मार्गी लागले नाही. यामुळे अतिसंवेदनशील गावांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पुढील दोन महिन्यांत काहीच काम मार्गी लागले नाही, तर या पावसाळाही गावकºयांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे.धोकादायक परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढा, या मागणीसाठी गावकरी रोज हेलपाटे मारत आहेत; मात्र गावकºयांच्या या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या गावांचे तातडीने पुनर्वसन झाले नाही, तर आंबेगाव तालुक्यात दुसरे माळीण होण्याची भीती निर्माण झाली आहे.आंबेगाव तालुक्यातील पाच गावे अतिसंवेदनशील झाली असून, मानवीवस्तीसाठी धोकादायक झाली आहेत. पावसाळ्यात येथे जमिनीला भेगा पडून भूस्खलनामुळे कोणत्याही क्षणी घरे गाडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील पावसाळ्यात काळवाडी (ता. आंबेगाव) येथे दरडी कोसळल्याने परिस्थितीची माहिती देताना भयभीत झालेले ग्रामस्थ. या धोकादाय स्थितीतून आम्हाला बाहेर काढा, आमचे माळीण होऊ देऊ नका. एवढीच मागणी या पाचही गावच्या ग्रामस्थांची आहे.

टॅग्स :Puneपुणे