शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत समाविष्ट गावातील शासननियुक्त सदस्यांच्या नियमित बैठका घेणार

By राजू हिंगे | Updated: December 24, 2024 18:15 IST

ही गावे चार ते पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असल्याने १५ जानेवारीपर्यंत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या बैठका घेण्यात येणार आहेत.

पुणे :पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावांमधील राज्य सरकारनियुक्त सदस्यांनी गावातील कचरा, ड्रेनेज, पाणीपुरवठा, पथदिवे, आरोग्य सुविधा, आदी समस्या मांडल्या. त्यावर या गावांतील सर्वसामान्य नागरी प्रश्नांबाबत संबंधित गावांच्या लगतच्या क्षेत्रीय कार्यालयात शासननियुक्त समितीच्या त्या गावांतील सदस्यांच्या नियमित बैठका घेतल्या जाणार आहेत. या गावांसाठीच्या समितीचे सदस्य आणि महापालिका यांच्यात समन्वय राहावा, यासाठी सांडपाणी व्यवस्थापन विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेत सन २०१७ नंतर टप्प्याटप्प्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २७ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला; तर महापालिकेतून वगळलेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांतील कामांबाबत मंजूर झालेल्या निविदांवर पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

प्रामुख्याने समाविष्ट गावांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. या बैठकीमध्ये क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सोडवता येण्यासारख्या समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी या गावांच्या सदस्यांची क्षेत्रीय कार्यालय स्तरावर बैठका घेण्यावर एकमत झाले; तर धोरणात्मक निर्णय आणि आगामी अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबींबाबत चर्चा करण्यासाठी २६ जानेवारीपर्यंत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गावे चार ते पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असल्याने १५ जानेवारीपर्यंत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या बैठका घेण्यात येणार आहेत.

वाढीव कोट्याअभावी पाण्याचा प्रश्न गंभीर

समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३२३ एमएलडी पाण्याची गरज भासते. सद्य:स्थितीत पूर्वीच्या योजना आणि टँकरद्वारे १०० एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाकडून वाढीव कोट्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. सुरुवातीला समाविष्ट झालेल्या ११ गावांपैकी नऊ गावांमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे ५३ टक्के काम पूर्ण झाले आहे; तर उर्वरित २३ गावांतील सांडपाणी वाहिन्यांसाठी शासनाकडे अमृत योजनेअंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या