शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात प्रतिगामी शक्ती वाढत आहेत : विश्वंभर चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:59 IST

सध्या मराठवाड्यात सिमी आणि त्याचबरोबर सनातन यांचा प्रभाव वाढत आहे..

ठळक मुद्दे'मराठवाडा रत्न पुरस्कार' प्रदान समारंभ जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव मराठवाड्यात

पुणे : मराठवाडा मुक्ती संग्राम हा लढा निजामाच्या हुकूमशाही विरोधातला लढा होता.त्याला हिंदु, मुस्लिम हा रंग देता कामा नये. सध्या मराठवाड्यात सिमी आणि त्याचबरोबर सनातन यांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे येथे प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. हे मराठवड्यासाठी फार धोका दायक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी वक्त केले. मराठवाडा सेवक प्रतिष्ठान'तर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी  माजी खासदार रवी गायकवाड, धमार्दाय सह-आयुक्त दिलीप देशमुख, माजी पोलिस महानिरीक्षक (कारागृह) विठ्ठल जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समनव्यक यशवंत मानखेडकर आणि योगीराज वेणीमाधव गोसावी (पैठणकर), प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी  उपस्थित होते.मराठवाडा सेवक प्रतिष्ठान'तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'मराठवाडा रत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.  नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले (कला), प्रल्हाद गुरव (वैद्यकीय), दीपक नागरगोजे (सामाजिक), प्रभाकर निलेगावकर (नाट्य), श्रीकांत जाधव (बँकिंग), अमित माने (कृषी), राजेंद्र हुंजे (पत्रकारिता) आणि स्वराज सरकटे (गायन) यांचा गौरव केला. चौधरी म्हणाले की, मराठवाडा स्वतंत्र झाला, त्यामध्ये सरदार पटेल यांचे जेवढे श्रेय आहे तेवढेच श्रेय पंडित नेहरू यांचे देखील आहे, कारण हा समूहिक मंत्रिमंडळाचा निर्णय होता.   मराठवाड्यातील लोक रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत. मराठवाड्यात माती आणि माणुस दुभंगल्या जात आहे. जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव मराठवाड्यात दिसून येत आहे. मराठवाड्यातील अनेक मंडळी आज उत्तम प्रकारे सर्वच क्षेत्रात काम करुन  समाज सेवा देखील करत आहेत. दिलीप देशमुख म्हणाले, मराठवाड़ा मुक्ति संग्राम हा हैदराबाद मुक्ति संग्राम नावाने ओळखला जातो. संघर्ष हाच मराठवाडयाच्या पाचविला पूजलेला आहे. ह्या संघषार्तूनच मराठवाड्यातील माणूस तयार प प्रत्येक क्षेत्रात त्याने उत्तम कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील परिस्तिथी सवार्ना माहिती असून अतिशय प्रतिकूल परिस्तिथीमुळे इथला तरुण वर्ग प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झेप घेत आहे. त्यामुळे हा संघर्ष इथेच थांबवू नका आज मराठवाड्याची जी परिस्तिथि आहे, जे प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी आणखी संघर्ष करायचा आहे. त्यामुळे आपल्या नोकरी, व्यवसायात स्थिर राहून मराठवाड्यासाठी काही करता येईल का ? याबाबतीत विचार करणे गरजेचे आहे. आपले गाव, तालुका, जिल्ह्यासाठी काही करता येईल का याचा विचार देखील केला पाहिजे..............मुक्त झाल्याचे काही लोकांना आवडले नाहीयोगीराज महाराज गोसावी म्हणाले, मराठवाडा निजामाच्या हुकूमशाहीतुन मुक्त झाला, हे काही लोकांना आवडल नाही. म्हणून काही लोक मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमाला अनुपस्थित राहतात. मराठवाड्यातील नागरिकांची भारतात राहण्याची इच्छा होती. त्यासाठी सर्वांची लढा दिला.

टॅग्स :PuneपुणेMarathwadaमराठवाडाSanatan Sansthaसनातन संस्था