शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

मराठवाड्यात प्रतिगामी शक्ती वाढत आहेत : विश्वंभर चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:59 IST

सध्या मराठवाड्यात सिमी आणि त्याचबरोबर सनातन यांचा प्रभाव वाढत आहे..

ठळक मुद्दे'मराठवाडा रत्न पुरस्कार' प्रदान समारंभ जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव मराठवाड्यात

पुणे : मराठवाडा मुक्ती संग्राम हा लढा निजामाच्या हुकूमशाही विरोधातला लढा होता.त्याला हिंदु, मुस्लिम हा रंग देता कामा नये. सध्या मराठवाड्यात सिमी आणि त्याचबरोबर सनातन यांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे येथे प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. हे मराठवड्यासाठी फार धोका दायक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी वक्त केले. मराठवाडा सेवक प्रतिष्ठान'तर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी  माजी खासदार रवी गायकवाड, धमार्दाय सह-आयुक्त दिलीप देशमुख, माजी पोलिस महानिरीक्षक (कारागृह) विठ्ठल जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समनव्यक यशवंत मानखेडकर आणि योगीराज वेणीमाधव गोसावी (पैठणकर), प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी  उपस्थित होते.मराठवाडा सेवक प्रतिष्ठान'तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'मराठवाडा रत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.  नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले (कला), प्रल्हाद गुरव (वैद्यकीय), दीपक नागरगोजे (सामाजिक), प्रभाकर निलेगावकर (नाट्य), श्रीकांत जाधव (बँकिंग), अमित माने (कृषी), राजेंद्र हुंजे (पत्रकारिता) आणि स्वराज सरकटे (गायन) यांचा गौरव केला. चौधरी म्हणाले की, मराठवाडा स्वतंत्र झाला, त्यामध्ये सरदार पटेल यांचे जेवढे श्रेय आहे तेवढेच श्रेय पंडित नेहरू यांचे देखील आहे, कारण हा समूहिक मंत्रिमंडळाचा निर्णय होता.   मराठवाड्यातील लोक रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत. मराठवाड्यात माती आणि माणुस दुभंगल्या जात आहे. जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव मराठवाड्यात दिसून येत आहे. मराठवाड्यातील अनेक मंडळी आज उत्तम प्रकारे सर्वच क्षेत्रात काम करुन  समाज सेवा देखील करत आहेत. दिलीप देशमुख म्हणाले, मराठवाड़ा मुक्ति संग्राम हा हैदराबाद मुक्ति संग्राम नावाने ओळखला जातो. संघर्ष हाच मराठवाडयाच्या पाचविला पूजलेला आहे. ह्या संघषार्तूनच मराठवाड्यातील माणूस तयार प प्रत्येक क्षेत्रात त्याने उत्तम कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील परिस्तिथी सवार्ना माहिती असून अतिशय प्रतिकूल परिस्तिथीमुळे इथला तरुण वर्ग प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झेप घेत आहे. त्यामुळे हा संघर्ष इथेच थांबवू नका आज मराठवाड्याची जी परिस्तिथि आहे, जे प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी आणखी संघर्ष करायचा आहे. त्यामुळे आपल्या नोकरी, व्यवसायात स्थिर राहून मराठवाड्यासाठी काही करता येईल का ? याबाबतीत विचार करणे गरजेचे आहे. आपले गाव, तालुका, जिल्ह्यासाठी काही करता येईल का याचा विचार देखील केला पाहिजे..............मुक्त झाल्याचे काही लोकांना आवडले नाहीयोगीराज महाराज गोसावी म्हणाले, मराठवाडा निजामाच्या हुकूमशाहीतुन मुक्त झाला, हे काही लोकांना आवडल नाही. म्हणून काही लोक मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमाला अनुपस्थित राहतात. मराठवाड्यातील नागरिकांची भारतात राहण्याची इच्छा होती. त्यासाठी सर्वांची लढा दिला.

टॅग्स :PuneपुणेMarathwadaमराठवाडाSanatan Sansthaसनातन संस्था