पाणी कमी; तक्रारीच जास्त
By Admin | Updated: July 23, 2014 23:37 IST2014-07-23T23:37:58+5:302014-07-23T23:37:58+5:30
शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्यापेक्षा हे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीच जास्त असल्याचे समोर आले आहे.

पाणी कमी; तक्रारीच जास्त
पुणो : शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्यापेक्षा हे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीच जास्त असल्याचे समोर आले आहे. गेल्या दीड वर्षात शहरातील नागरिकांकडून पाणीपुरवठय़ाबावत तब्बल 53 हजार तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यातील जवळपास 49 हजार तक्रारींचे निवारण केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा असून, अद्यापही तीन हजार तक्रारींचे निवारण करण्यात महापालिका प्रशासनास यश आलेले नाही.
गेल्या दशकभरात शहराची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. या लोकसंख्येला महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या वितरण व्यवस्थेत गेल्या चाळीस वर्षात फारसा बदल झालेला नाही. त्यातच शहराचा आकार बशीसारखा असल्याने अनेक बहुतांश उपनगरे उंचवटय़ावर असल्याने सर्व ठिकाणी पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करणो प्रशासनास शक्य होत नाही. तसेच, त्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटण्याचे प्रमाणही मोठे आहे. परिणामी, नागरिकांकडून महापालिकेवर तक्रारींचा पाऊसच गेल्या दीड वर्षात करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने कमी दाबाने पाणी येणो, पाणीच न येणो, जलवाहिनी फुटणो, पाणीगळती, गळकी नळकोंडाळी, टँकर न येणो, नियोजित वेळेपेक्षा कमी पाणी येणो अशा तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)
दररोज 125 ते 13क् तक्रारी
च्पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारी पाहता शहरात गेल्या एप्रिल 2क्13 ते जुलै 17 र्पयत पाणी पुरवठय़ाबाबत 52 हजार 963 तक्रारी आल्या आहेत. म्हणजे दरमहा सरासरी 3 हजार 783, तर दररोज 125 ते 13क् तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात.
च्या तक्रारी प्रामुख्याने स्वारगेट, लष्कर, तसेच एसएनडीटी जलकेंद्रांकडे, थेट अधिका:यांकडे, तसेच पालिकेस लेखी स्वरूपात करण्यात आलेल्या आहेत. या सर्व तक्रारीमध्ये प्रमुख तक्रार कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
शहरात दर वर्षी उन्हाळयात पाणीकपात लागू करण्यात येते. या तक्रारींची संख्याही भरमसाट असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते 17 जुलै 2क्14 या कालावधीत सुमारे 7 हजार 9क्8 तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. त्यातील 7 हजार 581 तक्रारींचे निवारण करण्यात आलेले असून, अद्यापही 327 तक्रारी पालिकेस सोडविता आलेल्या नाहीत. त्यात तक्रारीही प्रामुख्याने स्वारगेट आणि एसएनडीटी जलकेंद्राच्या बाबतीतच आहेत.
सर्वाधिक
27 हजार 38
तक्रारी पेठांमधून
च्पाणीपुरवठय़ांबाबत सर्वाधिक तक्रारी पर्वती जलकेंद्रावर पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या शहरातील मध्यवर्ती भागांमधील पेठांमधून करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारी स्वारगेट जलकेंद्राकडे करण्यात आलेल्या आहेत.
च्त्यात पाणी कमी दाबाने येत असल्याच्याच सर्वाधिक तक्रारी आहेत. गेल्या 14 महिन्यांत सुमारे 27 हजार 38 तक्रारी या परिसरातून आलेल्या असून, 26 हजार तक्रारींचे निवारण केल्याची पालिका प्रशासनाची नोंद आहे.