शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अराजपत्रित पदांची पद भरती अखेर 'महाआयटी'कडेच; मनसे विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 19:47 IST

महापरीक्षा पोर्टल च्या गोंधळानंतर, सरळ सेवा भरती प्रक्रिया बराच काळ रखडलेली होती.

ठळक मुद्देअर्जपत्रित पदांच्या भरतीबाबत निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा मनविसेकडून प्रयत्न

पुणे : महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळानंतर, सरळ सेवा भरती प्रक्रिया बराच काळ रखडलेली होती. यामुळे राज्यातील तरुण अस्वस्थ होते. म्हणूनच याबाबत राज्यसरकारकडे वारंवार पाठपुरावा मनविसेकडून करण्यात येत होता. अराजपत्रित पदांमध्ये, पोलीस भरती, शिक्षक सेवक भरती, अंगणवाडी सेवक, तलाठी, कनिष्ठ लिपिक इत्यादी पदांच्या भरतीबाबत गेल्या पाच महिन्यात निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मनविसेकडून करण्यात आला.अखेर राज्यातील तरुणांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या सरळ सेवा पद भरतीबाबत सोमवारी(दि. १७) राज्य सरकारने शासन निर्णय करून स्पष्टता दिली.    राज्यातील तरुणांच्या प्रचंड प्रतिक्षित असणारी सरळ सेवा पद भरतीबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण आयुक्त, महा आयटीचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. सोमवारी राज्य सरकारने  ही भरती 'महाआयटी' कडून कंपनी निवड करून, निवड समितीच्या नियंत्रणात होणार असल्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.      याबाबत कल्पेश यादव यांनी सांगितले, सरळ सेवा पदभरतीसाठी चालू असणारी कंपनी नेमणूक प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणार आहे व याच पद्धतीने तिथे ही यश येईल अशी आशा आहे. विद्यार्थी हितासाठी आंदोलन करणे किंवा याचिका दाखल करणे यामुळे फक्त प्रशासन वेठीस धरले जाते आणि प्रश्न तसेच राहतात, त्यामुळे असे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य पद्धतीने पाठपुरावा केला तरच विद्यार्थ्यांचे हित जोपासता येईल, सामान्य प्रशासन विभागाच्या आजच्या शासन निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारMNSमनसे