शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

आजी-माजी कुलसचिवांकडून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:28 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे, अपिल घेणे यासाठी स्वतंत्र मानधन घेणे हे नियमानुसार नसल्यास ते लगेच थांबविण्यात येईल.

दीपक जाधव पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे, अपिल घेणे यासाठी स्वतंत्र मानधन घेणे हे नियमानुसार नसल्यास ते लगेच थांबविण्यात येईल. आतापर्यंत ज्या आजी-माजी कुलसचिवांनी हे मानधन घेतले आहे, त्यांच्याकडून त्याची वसुली केली जाईल असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर मंगळवारी स्पष्ट केले. त्याचबरोबर प्रत्येक विभागनिहाय जनमाहिती अधिकाºयांच्या नेमणुकाकरण्यात येतील असे करमळकर यांनी स्पष्ट केले.माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी व अपिल घेणे यासाठी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून दरमहा ६ हजार रूपये मानधन घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मानधन घेण्याचा देशातील हा एकमेव प्रकार होता. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पै-पै करून जमा केलेल्या निधीचा हा अपव्यय असल्याने याविरोधात विद्यार्थी संघटना व स्वयंसेवी संस्थांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एकंदरीतच माहिती अधिकार कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याबाबत कुलगुरूंकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, माहिती अधिकार कायद्यानुसार विभागनिहाय जनमाहिती अधिकारी नेमणुका करण्याबाबत विद्यापीठाकडून परिपत्रक काढले जाईल. माहिती अधिकार कायदा अधिकाधिक चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी विद्यापीठाकडून सर्वतोपरी पावले उचलली जातील.’’अधिकाºयांवर येणार जबाबदारीविद्यापीठाच्या अधिकाºयांवर जनमाहिती अधिकारी म्हणून जबाबदारी नसल्याने त्यांच्याकडून सर्रास माहिती नाकारण्याचे प्रकार घडत होते. कुलगुरूंनी ठामभूमिका घेऊन प्रत्येक विभागनिहाय माहिती अधिकारी नेमण्याचानिर्णय घेतल्यामुळे विद्यापीठातील प्रत्येक अधिकाºयाला आता विद्यार्थ्यांच्या प्रति जबाबदारबनावे लागणार आहे. नागरिकांनी माहिती मागितल्यास ती उपलब्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाºयांनीच जनमाहिती अधिकारी म्हणून जबाबदारी पाहणे आवश्यक असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून माहिती अधिकारी या दोन स्वतंत्र पदांची निर्मिती केली आहे. माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने ८६, कोल्हापूर विद्यापीठाने ८९, सोलापूरने ३२, नांदेडने ३०, गोंडवानाने २०, औरंगाबादने ८२, नागपूरने १९२, जळगावने ४६, अमरावतीने ७६ जनमाहिती अधिकाºयांची नेमणूक केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मात्र केवळ २ माहिती अधिकारी कार्यरत आहेत.