चौक, रस्त्यांवरील जाहीर सभांबाबत मान्यता?
By Admin | Updated: September 14, 2014 00:01 IST2014-09-14T00:01:57+5:302014-09-14T00:01:57+5:30
कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांनी चौकात, रस्त्यांवर जाहीर सभा घेण्यास बंदी घातली

चौक, रस्त्यांवरील जाहीर सभांबाबत मान्यता?
पुणो : कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांनी चौकात, रस्त्यांवर जाहीर सभा घेण्यास बंदी घातली असून, त्याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आज दिल़े
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आचारसंहितेची माहिती देण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती़ तीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेडगे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड़ अभय छाजेड यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता़ मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी पोलीस आयुक्तांनी सरसकट रस्ता, चौकात सभा घेण्यावर बंदी
घातली होती़ याबाबत न्यायालयाने रस्त्याच्या निम्म्या भागात जाहीर सभा घेऊ शकता, असे सांगितले होत़े
अन्य शहरांमध्ये अशी परवानगी दिली जात़े जे रस्ते एकेरी आहेत, अशा ठिकाणी परवानगी द्यावी़ लोकशाहीत लोकप्रबोधनाची ही सर्वात मोठी संधी आह़े त्यामुळे चौकात एका बाजूला सभांसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वानी केली़
यावर राव म्हणाले, ‘‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फरक असतो़ कायदा व सुव्यवस्था, वाहतूक प्रश्न याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करून अशी परवानगी देता येईल का, याचा निर्णय घेतला जाईल़’’
जाहीर सभांसाठी नदीपात्रतील जागा राखीव ठेवा
4मुठा नदीपात्रत स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा होतात़ ही जागा जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येत़े त्या ठिकाणी मंनोरजनाच्या कार्यक्रमांसाठी जागा देण्यात येत़े
4जलसंपदा विभागाला त्यातून महसूल प्राप्त होत असतो़ त्यामुळे ही जागा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांच्या
सभांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राव यांनी
आज दिल़े
परवानगी 11 ऑक्टोबर्पयतच
4निवडणुकीतील प्रचारासाठी जाहीर सभा, पदयात्र, कोपरा सभा यांसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 48 तास अगोदर परवानगीचा अर्ज देणो आवश्यक आह़े
4लोकसभा निवडणुकीत अगदी 3 ते 4 तासांतही परवानगी देण्यात आली होती़ निवडणुकीचा प्रचार 13 ऑक्टोबरला सायंकाळी संपणार आह़े त्यामुळे त्याच्या आधी 11 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजेर्पयत येणा:या अर्जानाच परवानगी देण्यात येईल़ त्यामुळे निवडणुक प्रतिनिधींनीही आपल्या स्टार प्रचारकांचा कार्यक्रम आगाऊ मागवून तशा परवानग्या वेळेत घेण्याची दक्षता घेण्याचे आवाहन राव यांनी केल़े.
मतदार नावनोंदणी 17 सप्टेंबर्पयतच
4उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 1क् दिवस अगोदर्पयत मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू राहणार आह़े
427 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटाचा दिवस आह़े त्याच्या 1क् दिवस अगोदर 17 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजेर्पयत ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना आपले नाव नोंदविता येईल़ या अजर्दारांना नोटीस पाठवून त्यांचे नाव यादीत समाविष्ट करून ती यादी 27 सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल, असे राव यांनी सांगितल़े
काय आहे
आदर्श आचारसंहिता ?
आचरण कसे असावे ?
1) उमेदवार वा राजकीय पक्षाने जातीय तेढ निर्माण होईल किंवा मतभेद होईल, अशा कृत्यात सहभागी होऊ नये.
2) टीका करताना ती खासगी स्वरूपाची असू नये, पक्ष किंवा धोरणावर आधारित असावी.
3) मंदिर, मशीद, चर्च किंवा इतर धार्मिक तसेच प्रार्थनास्थळांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये, मतांसाठी जातीय आवाहन करू नये.
4) मतदारांना लाच देणो, धाक दाखविणो वा इतर गैरप्रकार करणो, मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनांचा वापर करणो आचारसंहितेचा भंग.
5) शांती भंग होईल असे कृत्य टाळावे व इतर पक्षांच्या प्रचारात, मिरवणुका जाहीर सभेत अडथळा आणू नयेत.
जाहीर सभेसाठी
वाहतुकीची अडचण निर्माण करू नये, प्रतिबंधित स्थळी निवडणूक प्रचार सभा टाळावी, सभेसाठी आवश्यक ती परवानगी घेणो आवश्यक, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांची मदत घ्यावी.
मिरवणुकीसाठी
1) मिरवणुकीची वेळ, तिचा मार्ग यांची पोलिसांना सूचना द्यावी व त्यात ऐन वेळी बदल करू नये.
2) दोन विविध पक्षांच्या मिरवणुका एकाच वेळी एकाच मार्गाने काढणो टाळावे, तसेच विरोधी पक्षनेते वा उमेदवाराच्या प्रतिमेचे दहन करू नये.
सत्ताधारी पक्षांसाठी
1) सत्ताधारी पक्षाचे नेते मग ते महापालिकेत असोत, राज्यात किंवा केंद्रात सत्तेत असोत; अशा नेत्यांनी त्यांच्या पदाचा वापर करणो गैर. उदा. मंत्री असेल त्याला सरकारी गाडी किंवा इतर वाहने वापरता येणार नाहीत.
2) शासकीय विश्रमगृह सरकारी यंत्रणा यांचा वापर गैर.
4) आचारसंहितेच्या काळात सरकारी खर्चाने शासनाच्या योजनांची जाहिरात देता येणार नाही.
5) अनुदान, शासकीय मदतीच्या घोषणांवर बंदी.