शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पुणे-मुंबई रेल्वे प्रवासासाठी सज्ज, आता प्रतीक्षा राज्य शासनाच्या हिरव्या कंदिलाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 15:55 IST

एसटी सुरू झाल्याने रेल्वेसाठी प्रवासी आग्रही

ठळक मुद्देराज्यामध्ये एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरू

पुणे : लॉकडाऊनमुळे मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस तसेच अन्य मार्गांवरील लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या गाड्या सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाची पुर्ण तयारी आहे. मात्र, राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरू करता येणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यामध्ये एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली आहे. या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये गुरूवारपासून पीएमपीची बससेवाही सुरू झाली आहे. तसेच राज्य शासनाने सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना राज्यातील सर्व थांबे घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना सध्या सुरू असलेल्या गाड्यांमधून आंतरजिल्हा प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र, दुसरीकडे राज्यांतील विविध शहरांना जोडणाºया एक्सप्रेस, लोकल व पॅसेंजर गाड्यांना राज्य शासनाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.लॉकडाऊनपुर्वी पुणे व मुंबईदरम्यान दररोज हजारो प्रवासी रेल्वेने ये-जा करत होते. पण गाड्या बंद असल्याने बहुतेकांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी सेवा सुरू झाली असली तरी या गाड्यांच्या वेळा आणि तिकीट दरही परवडणारा नाही. त्यामुळे किमान सकाळी व सायंकाळी एक एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत आहे. आहे. तसेच पुणे व पिंपरी चिंचवडलगतच्या परिसरातून दोन्ही शहरांमध्ये येणाºया कामगारांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. त्यांच्यासाठी पुणे-लोणावळा लोकल, पुणे-दौंड डेमु सेवा सुरू करण्याची मागणीही होत आहे. रेल्वे प्रशासनाची या गाड्या सुरू करण्याची तयारी आहे. पुणे राज्य शासनाने अद्याप कोणतीही मागणी केलेली नाही.----------------पुणे-मुंबई किंवा इतर मार्गांवर गाड्या सुरू करण्याची आमची पुर्ण तयारी आहे. पण हे राज्य शासनावर अवलंबून आहे. त्यांच्याकडून मागणी केल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन निर्णय घेईल.- रेणु शर्मा, पुणे विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे-----------------मागील तीन महिन्यांपासून १४ ते १५ जण पुणे-मुबंईदरम्यान खासगी बसने ये-जा करत आहोत. दररोज ७०० रुपये मोजावे लागतात. खुप गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने सकाळी आणि सायंकाळी किमान एक रेल्वेगाडी सुरू करणे आवश्यक आहे.- अंकिता देशपांडे, प्रवासी

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार