शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

पुणे-मुंबई रेल्वे प्रवासासाठी सज्ज, आता प्रतीक्षा राज्य शासनाच्या हिरव्या कंदिलाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 15:55 IST

एसटी सुरू झाल्याने रेल्वेसाठी प्रवासी आग्रही

ठळक मुद्देराज्यामध्ये एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरू

पुणे : लॉकडाऊनमुळे मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस तसेच अन्य मार्गांवरील लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या गाड्या सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाची पुर्ण तयारी आहे. मात्र, राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरू करता येणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यामध्ये एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली आहे. या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये गुरूवारपासून पीएमपीची बससेवाही सुरू झाली आहे. तसेच राज्य शासनाने सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना राज्यातील सर्व थांबे घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना सध्या सुरू असलेल्या गाड्यांमधून आंतरजिल्हा प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र, दुसरीकडे राज्यांतील विविध शहरांना जोडणाºया एक्सप्रेस, लोकल व पॅसेंजर गाड्यांना राज्य शासनाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.लॉकडाऊनपुर्वी पुणे व मुंबईदरम्यान दररोज हजारो प्रवासी रेल्वेने ये-जा करत होते. पण गाड्या बंद असल्याने बहुतेकांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी सेवा सुरू झाली असली तरी या गाड्यांच्या वेळा आणि तिकीट दरही परवडणारा नाही. त्यामुळे किमान सकाळी व सायंकाळी एक एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत आहे. आहे. तसेच पुणे व पिंपरी चिंचवडलगतच्या परिसरातून दोन्ही शहरांमध्ये येणाºया कामगारांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. त्यांच्यासाठी पुणे-लोणावळा लोकल, पुणे-दौंड डेमु सेवा सुरू करण्याची मागणीही होत आहे. रेल्वे प्रशासनाची या गाड्या सुरू करण्याची तयारी आहे. पुणे राज्य शासनाने अद्याप कोणतीही मागणी केलेली नाही.----------------पुणे-मुंबई किंवा इतर मार्गांवर गाड्या सुरू करण्याची आमची पुर्ण तयारी आहे. पण हे राज्य शासनावर अवलंबून आहे. त्यांच्याकडून मागणी केल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन निर्णय घेईल.- रेणु शर्मा, पुणे विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे-----------------मागील तीन महिन्यांपासून १४ ते १५ जण पुणे-मुबंईदरम्यान खासगी बसने ये-जा करत आहोत. दररोज ७०० रुपये मोजावे लागतात. खुप गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने सकाळी आणि सायंकाळी किमान एक रेल्वेगाडी सुरू करणे आवश्यक आहे.- अंकिता देशपांडे, प्रवासी

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार