शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

पुण्याच्या नामांतराची मागणी : राजकीय पक्षांच्या सावध तर पुणेकरांच्या पुणेरी प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 08:10 IST

संभाजी ब्रिगेड संघटनेने पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करावे या मागणीवर पुण्यात विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यात विशेषतः राजकीय पक्षांनी सावध भूमिका स्वीकारली असून सत्ताधारी भाजपने तर प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला आहे.

पुणे : संभाजी ब्रिगेड संघटनेने पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करावे या मागणीवर पुण्यात विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यात विशेषतः राजकीय पक्षांनी सावध भूमिका स्वीकारली असून सत्ताधारी भाजपने तर प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे पुणेकरांनी मात्र खास 'पुणेरी' शैलीत आपली मते नोंदवली आहेत. 

       संभाजी ब्रिगेडने पुणे शहराचे नाव बदलून ते जिजापूर करावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही  निवेदनाची प्रत पाठवली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले की, हे नाव कोणत्याही धार्मिक आकसापोटी नाही तर जिजामातांच्या आदराप्रती बदलावे अशी आमची मागणी आहे. ही मागणी सध्या देशात सुरु असलेल्या कोणत्याही घटनेशी संबंधित नसून गेली पंधरा वर्षे मराठा सेवा महासंघ ही मागणी करत आहे. 

            पुण्यातील सध्याचे सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी या विषयावर लगेच प्रतिक्रिया देऊ नये असे वाटत असल्याचे सांगितले. सध्या भूमिका घेणे योग्य नसून माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो असेही ते म्हणाले. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनीही या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी मात्र ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत सरकारनेच निर्णय घ्यावा असे मत व्यक्त करत पुन्हा भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला आहे.ब्राहमण महासंघाचे आनंद दवे यांनी नाव बदलण्यापेक्षा जिजाऊंचे योगदान बघून त्यांचे स्मारक करण्यात यावे असे मत व्यक्त केले. 

              राजकीय पक्षांची भूमिका अद्यापतरी स्पष्ट नसताना आमदार अनंत गाडगीळ यांनी मात्र नामांतराला विरोध केला आहे. ते म्हणाले की, पुण्याचे नाव बदलून इतिहास बदलला जाणार आहे का? त्यापेक्षा जिजाऊंच्या नावाने एखादी संस्था सुरु करावी. नाव बदलण्याचा उद्देश चांगला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला न्याय मिळणार असेल तर हरकत नाही.मात्र, समाजात जाती, धर्माचे विभाजन होत असेल तर नाव बदलण्यात येऊ नये. डॉ सतीश देसाई म्हणाले की, पुण्याचे पुणेरीपण टिकले पाहिजे. या शहराने जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे.निवडणुका आल्या की अशा गोष्टी सुचतात. पुणेकरांच्या श्वासात पुणे आहे ते बदलता येणार नाही.

              लेखक मिलिंद शिंत्रे म्हणाले की, जिजाऊ माँसाहेबांविषयी आदर आहेच. त्यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यात असून तिथे नामांतर करणे अधिक संयुक्तिक ठरेल. परकीय शत्रूंनी आक्रमण केलेली नावे बदलणे समजू शकतो मात्र पुणे या परिघात बसत नाही. सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ म्हणाले की, पुणे या नावाला शौर्याचा, त्यागाचा, क्रांतिकारकांचा इतिहास आहे. त्यामुळे हे नाव बदलण्याची  आवश्यकता वाटत नाही. ढोल ताशा संघटनेचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले की, नाव बदलून इतिहास बदलत नाही. डेक्कनचे नाव संभाजीनगर केले आहे. मात्र तरीही त्याला डेक्कन म्हणूनच ओळखले आणि संबोधले जाते. पुणे या नावाला जाज्वल्य इतिहास आहे. तो बदलण्याचा अट्टाहास करणे चुकीचे आहे.  

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडBJPभाजपा