शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Positive Story: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 'रिव्हर्सल ऑपरेशन'ने पुन्हा मातृत्व, माहितीसाठी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 09:13 IST

अनेक दाम्पत्ये एका मुलावर कुटुंच नियोजन शस्त्रक्रिया करतात. मात्र काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी मुलाचा मृत्यू होतो....

- प्रकाश गायकर

पिंपरी : 'छोटे कुटुंब, सुखी कुटुंब' याकडे अनेकांचा ओढा आहे. त्यामुळे दोन किंवा एक मूल झाल्यानंतर अनेकजण कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करतात. अशा सुखी कुटुंबातील मूल काही कारणांनी मृत झाल्यास कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मात्र, महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली असतानाही 'फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी ने पुन्हा मुलाला जन्माला घालता येते, या सर्जरीकडे महिलांचा कल वाढला आहे.

अनेक दाम्पत्ये एका मुलावर कुटुंच नियोजन शस्त्रक्रिया करतात. मात्र काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी मुलाचा मृत्यू होतो. त्यात आजारपण, अपघात, सर्पदंश अशा कारणांचा समावेश असतो. एकुलता एक मुलगा गेल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात होतो. मात्र, आता अशा घटनानंतर फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी करून मुलाला जन्म देण्याकडे दाम्पत्यांचा कल वाढला आहे.

शस्त्रक्रियेविषयी अनेकजण अनभिज्ञ

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला पुन्हा अपत्य हवे असेल तर 'ट्यूबल रिकॅनलायजेशन किंवा फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी केली जाते. मात्र, अनेकांना याविषयी माहिती नसते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये फैलोपियन ट्यूब कापली जाते. मात्र या प्रक्रियेत ती पुन्हा जोडली जाते. त्यामुळे पुन्हा गर्भधारणा होते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातही अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते.

'सक्सेस रेट' चांगला

शहरामध्ये वर्षभरात १५ ते २० या शस्त्रक्रिया होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अपत्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेकजण या शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारतात. त्याचा सक्सेस रेट' ही चांगला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

'रिव्हर्सल ऑपरेशन' कधी?

- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याने मूल गमावल्यानंतर त्यांना पुन्हा मूल हवे असल्यास.

- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेच्या पतीचा मृत्यू अथवा घटस्फोट झाल्यावर त्या महिलेला पुन्हा विवाह करायचा असल्यास.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर अपत्याचा मृत्यू झाल्यास फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरीचा पर्याय आहे. अद्याप याबाबत समाजामध्ये जनजागृती झालेली नाही. अनेकांना ही अशी शस्त्रक्रिया करून पुन्हा मुलाला जन्म देता येतो, याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपत्य गमावल्यानंतर अनेकजण शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, मुलाला काळाने हिरावून घेतलेल्या महिलांना यामुळे पुन्हा मातृत्व मिळते.

- डॉ. शिवाजी ढगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय,

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे