शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

Positive Story: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 'रिव्हर्सल ऑपरेशन'ने पुन्हा मातृत्व, माहितीसाठी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 09:13 IST

अनेक दाम्पत्ये एका मुलावर कुटुंच नियोजन शस्त्रक्रिया करतात. मात्र काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी मुलाचा मृत्यू होतो....

- प्रकाश गायकर

पिंपरी : 'छोटे कुटुंब, सुखी कुटुंब' याकडे अनेकांचा ओढा आहे. त्यामुळे दोन किंवा एक मूल झाल्यानंतर अनेकजण कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करतात. अशा सुखी कुटुंबातील मूल काही कारणांनी मृत झाल्यास कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मात्र, महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली असतानाही 'फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी ने पुन्हा मुलाला जन्माला घालता येते, या सर्जरीकडे महिलांचा कल वाढला आहे.

अनेक दाम्पत्ये एका मुलावर कुटुंच नियोजन शस्त्रक्रिया करतात. मात्र काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी मुलाचा मृत्यू होतो. त्यात आजारपण, अपघात, सर्पदंश अशा कारणांचा समावेश असतो. एकुलता एक मुलगा गेल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात होतो. मात्र, आता अशा घटनानंतर फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी करून मुलाला जन्म देण्याकडे दाम्पत्यांचा कल वाढला आहे.

शस्त्रक्रियेविषयी अनेकजण अनभिज्ञ

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला पुन्हा अपत्य हवे असेल तर 'ट्यूबल रिकॅनलायजेशन किंवा फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी केली जाते. मात्र, अनेकांना याविषयी माहिती नसते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये फैलोपियन ट्यूब कापली जाते. मात्र या प्रक्रियेत ती पुन्हा जोडली जाते. त्यामुळे पुन्हा गर्भधारणा होते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातही अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते.

'सक्सेस रेट' चांगला

शहरामध्ये वर्षभरात १५ ते २० या शस्त्रक्रिया होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अपत्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेकजण या शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारतात. त्याचा सक्सेस रेट' ही चांगला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

'रिव्हर्सल ऑपरेशन' कधी?

- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याने मूल गमावल्यानंतर त्यांना पुन्हा मूल हवे असल्यास.

- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेच्या पतीचा मृत्यू अथवा घटस्फोट झाल्यावर त्या महिलेला पुन्हा विवाह करायचा असल्यास.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर अपत्याचा मृत्यू झाल्यास फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरीचा पर्याय आहे. अद्याप याबाबत समाजामध्ये जनजागृती झालेली नाही. अनेकांना ही अशी शस्त्रक्रिया करून पुन्हा मुलाला जन्म देता येतो, याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपत्य गमावल्यानंतर अनेकजण शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, मुलाला काळाने हिरावून घेतलेल्या महिलांना यामुळे पुन्हा मातृत्व मिळते.

- डॉ. शिवाजी ढगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय,

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे