शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

मुलांमध्ये वजनवाढीचा वेग १०-१५ टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST

वर्षभरापासून मुलांचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. मोबाईल किंवा टीव्ही पाहत जेवल्याने आपण किती खात आहोत, याचे भान मुलांना ...

वर्षभरापासून मुलांचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. मोबाईल किंवा टीव्ही पाहत जेवल्याने आपण किती खात आहोत, याचे भान मुलांना राहत नाही. त्यामुळे जास्तीचे अन्न पोटात जाते. टीव्हीवर सातत्याने कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर अशाच जाहिराती दाखवल्या जातात. जाहिरातींकडे मुले आकर्षित होतात. मात्र, जाहिरातींमध्ये कशी अतिशयोक्ती असते हे पालकांनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे. हिरव्या भाज्या, कडधान्ये, फळे यांच्या जाहिराती कधीही टीव्हीवर दाखवल्या जात नाहीत. मात्र, तेच पौष्टिक अन्न असते, याकडे मुलांचे लक्ष वेधले पाहिजे. पौष्टिक पदार्थ बनवण्यात मुलांना सहभागी करून घेतल्यास त्यांच्यात सकस आहाराविषयी गोडी निर्माण होऊ शकते, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले.

मुलांचे वजन वाढत नाही, अशा अनेक पालकांच्या तक्रारी असायच्या. मुले सतत आजारी पडल्यानेही वजन वाढण्यात अडचणी यायच्या. अशा तक्रारी आता कमी झाले आहेत. दुसरीकडे, अतिवजन असलेली मुले स्थूलतेकडे झुकली आहेत. स्थूलतेमुळे लहान वयातच मुलांमध्ये अतिरिक्त उष्मांक, कोलेस्ट्रेरोल, रक्तदाब अशा समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः, ८ ते १५ या वयोगटातील मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण जास्त असते.

-----

''मुलांचे वाढते वजन'' या विषयावर मी सध्या संशोधन करत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, इतर वेळी ज्या प्रमाणात मुलांचे वजन दर सहा महिन्यांनी किंवा वर्षाने वाढते, त्या प्रमाणात लॉकडाऊन काळात १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलाचे जन्माच्या वेळचे वजन पाचव्या महिन्यापर्यंत दुप्पट होते. एक वर्षापर्यंत वजन जन्माच्या वेळच्या वजनाच्या तिप्पट, तर दुसऱ्या वर्षापर्यंत जन्माच्या वेळच्या वजनाच्या चौपट होते. त्यानंतर दर वर्षी एक किलो वजन वाढणे अपेक्षित असते. त्यानुसार पालकांनी आपल्या मुलाच्या वजनाच्या वाढीवर लक्ष ठेवावे. वाढीचे हे प्रमाण वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत कायम राहते. त्यानंतरची वाढ ही आहार, व्यायाम आणि अनुवंशिकतेवर अवलंबून असते.

- डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ञ

------

स्थूल मुलांमधील आत्मविश्वसही कमी होतो. इतर मुलांच्या तुलनेत चपळता कमी होते.शाळा, मैदानी खेळ बंद असले तरी पालकांनी मुलांना घरच्या घरी शारीरिक हालचालींमध्ये गुंतवून ठेवावे. पालकांनी स्वतःच्या आहारातून मुलांसमोर आदर्श घालून द्यावा.

- डॉ. शमा खरे, बालरोगतज्ज्ञ

-----

हे करावे !

* निरोगी जीवनशैलीचे महत्व लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवावे.

* पौष्टीक खाद्यपदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेत मुलांना सामावून घ्यावे.

* मुलांच्या दररोजच्या आहारात पालेभाज्या, कडधान्ये, फळे अशा पदार्थांचा समावेश असावा.

------

हे टाळावे!

* कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर अशा जाहिरातींकडे आकर्षित होऊ नये आणि त्याचे तोटे मुलांना समजावून सांगावेत.

* महिन्याच्या वाणसामानात सॉफ्ट ड्रिंक, बिस्कीट, मॅगी, मैद्याचे इतर पदार्थ यांचा समावेश करू नये.

* हॉटेलिंगचे प्रमाण मर्यादित असावे.