शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

राष्ट्र सेवा दल पर्यायी माध्यमं बनू शकेल : डॉ. गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 7:00 AM

ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांची राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबददल लोकमत ने त्यांच्याशी संवाद साधला.

- नम्रता फडणीस * राष्ट्र सेवा दलाची निर्मिती झाली तो काळ आणि आजचा काळ यात फरक जाणवतोय का?-  तो काळ असा होता की खेड्यापाड्यातील मुलं नुकतीच शाळेत जायला लागली होती. आधुनिकतेबद्दलची भारतातील लोकांची कल्पना ही विशिष्ट प्रकारची होती. आज संपूर्ण सामाजिक उलथापालथ होऊन शहर व खेड्यांचे स्वरूप बदलले आहे. सामाजिक तज्ञ म्हणतात की दर बारा वर्षांनी तरूणपिढी बदलते. त्यांची अभिरूची बदलते त्याप्रमाणे राष्ट्र सेवा दलात 100 वर्षात 6 वेळा बदल व्हायला हवे होते ते आता ह्यओव्हरड़्यूह्ण आहेत. * राष्ट्र सेवा दलासमोरची आव्हाने कोणती?-ज्या माध्यमात राष्ट्र सेवा दल काम करीत आले ती एकेक माध्यमं एकेकाळी उपयोगी मानली जात. आज ती बदलली आहेत. 1950-60 च्या दशकात माध्यमं बहुतांशी स्वतंत्र होती. जी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जात होती.  परंतु आज माध्यमांना सत्ताकेंद्राने मारून टाकले आहे. अशा वेळी एक पयार्यी माध्यम शोधायला हवं. ही गरज पूर्ण करणारी राष्ट्र सेवा दलासारखी दुसरी संस्था डोळ्यासमोर दिसत नाही. ह्यराष्ट्र सेवा दलह्ण हे  पयार्यी माध्यमं बनू शकतं.  * तुम्ही कोणत्या मुद्यांवर भर देऊन काम करणार आहात?- भारतात इतक्या वर्षातही एका गोष्टीचं महत्व घटलेले नाही ते म्हणजे  ह्यअस्पृश्यताह्ण. अक्कलकोट जवळच्या गावांमध्ये आजही अस्पृश्यता बघायला मिळते. हॉटेलमध्ये पिण्याची भांडी वेगळी ठेवलेली असतात. जातीनुसार जेवण्याच्या थाळ्या वेगळ्या असतात. महाराष्ट्राचा अस्पृश्यतेचा रिपोर्ट वाचला की ती वाढतच चालल्याचे दिसते. इतके कायदे होऊन, महान व्यक्तींनी आंदोलनं करूनही ही स्थिती आहे. साने गुरूजी, छत्रपती शाहू, महात्मा फुले यांचे अर्धवट राहिलेले काम राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. * राष्ट्र सेवा दलाची पुढची वाटचाल कशी राहिल?- राष्ट्र सेवा दलाचे काम हे राजकीय पक्षाचे नाही. दलाचे काम ज्या समाजातून पक्ष निर्माण होतात तिला ठीक करण्याचे आहे. आजही जुन्या विकृतींची नवी रूपं समोर आलेली दिसतात. धार्मिक, जातीय भेदभाव या सर्व विषयांवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. लोकशाहीला मानणारा सुदृढ समाज कसा निर्मित होईल, या दृष्टीकोनातून सेवा दल पुढे वाटचाल करेल. राष्ट्र सेवा दल जर प्रतिरोधी भूमिका घेऊन जगत राहिला तर समाजाच्या आणि सेवा दलाच्या दृष्टीने ते हिताचे राहाणार नाही. यासाठी प्रगल्भ विचार निर्मितीसाठी आवश्यक कार्यक्रम हाती घेतले जातील.

------(समाप्त)----- 

टॅग्स :Puneपुणे