शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

धरणांतील साठय़ात वेगाने घट

By admin | Updated: November 26, 2014 23:23 IST

शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे.

पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे. पाणीवाटपासाठी कालवा समितीची रखडलेली बैठक आणि पाणीवाटपाबाबत पाटबंधारे विभागात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे ही स्थिती उद्भवली असून मार्चपासून पुणोकरांना पुन्हा एकदा एक वेळ पाणीकपातीचा सामना करावा लागेल. या प्रकल्पांमध्ये सध्या सुमारे 24.16  टीएमसी पाणी आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात या प्रकल्पात सुमारे 28 टीएमसी पाणी होते. त्यामुळे यंदा कपात अटळ असल्याची भिती महापालिकेच्या एका वरिष्ट अधिका-याने व्यक्त केली आहे. 
शहरात मार्च 2क्12  पासून एकवेळ पाणी देण्यात येत होते. यावर्षी  राज्यात वेळेवर हजेरी लावणा-या मान्सूने मात्र दडी मारली होती. त्यामुळे जून  2क्14 च्या अखेरीस  प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे 2 टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे 28 जून पासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात 12 टक्के कपात करून पाणी पुरवठा एकवेळ सुरू केला होता.
 
4 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात ही धरणो 1क्क् टक्के भरली होती. त्यानंतही अधून मधून पाऊस सुरूच असल्याने ऑक्टोबर अखेरीस या धरणात 27.3क् र्पयत या धरणात 1क्क् टक्के पाणीसाठा होता. 
4मात्र, याच कालावधीत सरकार बदल झाल्याने तसेच विधानसभेची आचारसंहिता असल्याने धरणातील पाणीवाटपासाठी होणारी कालवा समितीची बैठक झाली नाही. 
4दरम्यानच्या कालावधीत पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठीचे आर्वतन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने घटू लागला आहे. 
4त्यातच समितीची बैठक केव्हा होईल याबाबत शास्वती नाही. त्यामुळे महापालिकेस ऑगस्ट 2क्15 र्पयतचे नियोजन करावयाचे झाल्यास उपलब्ध पाण्यातील सुमारे 12 ते 13  टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. 
 
पाणीकपात अटळ
या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने ऑगस्ट 2क्14 पासून शहरात महापालिकेकडून दोन वेळ पाणी पुरवठा  करण्यात येत आहे. त्यासाठी दरमहा पालिकेस 1.25 टीएमसी पाणी लागते. कालवा समितीच्या बैठकीत शहरासाठी जुलै अखेर र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्यात येतो. मात्र, गेल्या काही वर्षात दरवर्षीच पाऊस उशीरा सुरू होत असल्याने या वर्षी 15 ऑगस्ट 2क्15 र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्याची महापालिकेची भूमिका आहे. त्यानुसार, पालिकेस पुढील नऊ महिन्यांसाठी 12 ते 13 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाकडून पालिकेस वर्षभरासाठी एवढा साठा दिला जातो.