शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

धरणांतील साठय़ात वेगाने घट

By admin | Updated: November 26, 2014 23:23 IST

शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे.

पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे. पाणीवाटपासाठी कालवा समितीची रखडलेली बैठक आणि पाणीवाटपाबाबत पाटबंधारे विभागात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे ही स्थिती उद्भवली असून मार्चपासून पुणोकरांना पुन्हा एकदा एक वेळ पाणीकपातीचा सामना करावा लागेल. या प्रकल्पांमध्ये सध्या सुमारे 24.16  टीएमसी पाणी आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात या प्रकल्पात सुमारे 28 टीएमसी पाणी होते. त्यामुळे यंदा कपात अटळ असल्याची भिती महापालिकेच्या एका वरिष्ट अधिका-याने व्यक्त केली आहे. 
शहरात मार्च 2क्12  पासून एकवेळ पाणी देण्यात येत होते. यावर्षी  राज्यात वेळेवर हजेरी लावणा-या मान्सूने मात्र दडी मारली होती. त्यामुळे जून  2क्14 च्या अखेरीस  प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे 2 टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे 28 जून पासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात 12 टक्के कपात करून पाणी पुरवठा एकवेळ सुरू केला होता.
 
4 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात ही धरणो 1क्क् टक्के भरली होती. त्यानंतही अधून मधून पाऊस सुरूच असल्याने ऑक्टोबर अखेरीस या धरणात 27.3क् र्पयत या धरणात 1क्क् टक्के पाणीसाठा होता. 
4मात्र, याच कालावधीत सरकार बदल झाल्याने तसेच विधानसभेची आचारसंहिता असल्याने धरणातील पाणीवाटपासाठी होणारी कालवा समितीची बैठक झाली नाही. 
4दरम्यानच्या कालावधीत पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठीचे आर्वतन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने घटू लागला आहे. 
4त्यातच समितीची बैठक केव्हा होईल याबाबत शास्वती नाही. त्यामुळे महापालिकेस ऑगस्ट 2क्15 र्पयतचे नियोजन करावयाचे झाल्यास उपलब्ध पाण्यातील सुमारे 12 ते 13  टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. 
 
पाणीकपात अटळ
या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने ऑगस्ट 2क्14 पासून शहरात महापालिकेकडून दोन वेळ पाणी पुरवठा  करण्यात येत आहे. त्यासाठी दरमहा पालिकेस 1.25 टीएमसी पाणी लागते. कालवा समितीच्या बैठकीत शहरासाठी जुलै अखेर र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्यात येतो. मात्र, गेल्या काही वर्षात दरवर्षीच पाऊस उशीरा सुरू होत असल्याने या वर्षी 15 ऑगस्ट 2क्15 र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्याची महापालिकेची भूमिका आहे. त्यानुसार, पालिकेस पुढील नऊ महिन्यांसाठी 12 ते 13 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाकडून पालिकेस वर्षभरासाठी एवढा साठा दिला जातो.