शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रामोशी समाज एसटी आरक्षणासाठी पुकारणार एल्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 20:27 IST

राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर,रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी आंदोलने व मोर्चा काढले.

ठळक मुद्देप्रमुख मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून सप्टेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन

बारामती : मराठा, धनगर समाजापाठोपाठ रामोशी समाज एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी रामोशी समाज गुरुवारी (दि. २३) एल्गार मोर्चा काढणार आहे. यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने कारभारी सर्कल, गुणवडी चौक, बसस्टँड, रिंग रोडमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत जय मल्हार क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते बबन खोमणे यांनी माहिती दिली. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत खोमणे बोलत होते. या वेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील आरक्षणाबाबत भूमिका मांडण्यात आली.राज्यात रामोशी, बेरड, बेडर समाजाची लोकसंख्या ७० ते ८० लाख आहे. बेरड, बेडर रामोशी समाज हा क्रांतीकारी समाज आहे. आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध पहिले बंड केले. ब्रिटिशांना सळो की पळो करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांचेही स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मोलाचे योगदान आहे.राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर,रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी आंदोलने केली, मोर्चा काढले. त्याचबरोबर शासनाच्या विविध पातळीवर निवेदने दिली. महाराष्ट्र स्तरावर रामोशी समाजाच्या आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, असे यावेळी सांगण्यात आले.कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चातील प्रमुख मागणीही रामोशी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी होती. या मोर्चादरम्यान आम्हाला आश्वासन दिले होते. रामोशी समाजाच्या आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.परंतु, आजतागायत निर्णय झाला नाही. त्यामुळे जय मल्हार संघटनेच्या माध्यमातून १६ आॅगस्ट पासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू आहे.आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आमच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून सप्टेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.या वेळी जय मल्हार क्रांती सेनेचे ज्येष्ठ नेते बबनराव खोमणे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, संभाजी चव्हाण, मनोज पाटोळे, नाना जाधव, आबासो जाधव, सोमनाथ जाधव, सोमनाथ मदने, सागर खोमणे, गणेश जाधव, दादा चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Baramatiबारामतीreservationआरक्षणGovernmentसरकार