शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रामदास आठवलेंनी स्वतःच्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरले; दिलीप मोहिते पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 20:05 IST

केंद्राचा सध्याचा कारभार पहाता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल अशी भीती

राजगुरुनगर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरले, असा टोला आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रामदास आठवलेंना लगावला आहे. खेडमध्ये राजगुरुनगर येथे एसटी बसस्थानकासमोर भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

मोहिते पाटील म्हणाले, गेल्या सात वर्षांत आपल्या समाजाच्या वाट्याला काय आलं हे एकदा सांगा. फक्त रामदास आठवलेंचे कल्याण झालं. त्यामुळे एका माणसाच्या फायद्यासाठी संपुर्ण समाजाला वेठीस धरत असेल तर त्यांच्या मागे जाण्याची गरज नाही. असं म्हणत रामदास आठवले साहेब तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरु नका असा टोला राष्ट्रवादी कॉग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना भाषणात लगावला.

केंद्राचा सध्याचा कारभार पहाता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल

केंद्र सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पाठिंबा आहे. मात्र केंद्राचा सध्याचा कारभार पहाता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल. त्यामुळे रामदास आठवले तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी संपुर्ण समाजाला वेठीस धरु नका, समाजाचा बळी देऊ नका असं म्हणत यातून समाजाचा फायदा होणार नाही, झाला तर फक्त रामदास आठवलेंचाच फायदा होईल. केंद्र सरकारकडूनभाजपाच्या लोकांना एक न्याय आणि राज्यातील इतरांना वेगळ्या प्रकारची वागणुक दिली जाते, असा प्रकार राज्यात सुरु आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांनी तयार केलेली घटना सुद्धा बदलायला किंवा दुरुस्त करायला मागे-पुढे पाहणार नाही याची आम्हाला भीती वाटत असल्याचेत्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती