शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

राम आमचाही, पण त्याचे राजकारण करणे अयोग्य; रमेश चेन्नीथलांची भाजपवर टीका

By राजू इनामदार | Updated: January 23, 2024 16:57 IST

राम आमचाही आहे, मात्र राम मंदिर व राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकारण करणे अयोग्य आहे असे ते म्हणाले....

पुणे :काँग्रेसकडे महात्मा गांधी यांची सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची विचारधारा आहे, ज्यांच्याकडे कसली विचारधारा नाही असे लोक मथूरा आणि काशी असेच बोलणार अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. राम आमचाही आहे, मात्र राम मंदिर व राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकारण करणे अयोग्य आहे असे ते म्हणाले.

पक्षाच्या लोकसभा निवडणूकपूर्व विभागीय बैठकीसाठी चेन्नीथला मंगळवारी पुण्यात आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सोनल पटेल व काँग्रेसचे अन्य राज्य पदाधिकारी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी उपस्थित होते. चेन्नीथला यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, सोमवारी राम मंदिर उदघाटनाच्या कार्यक्रमाचे राजकीय भांडवल केले गेले जे अतीशय चुकीचे होते. त्यांच्याकडे कोणताही विचार नाही, नेते नाहीत. त्यामुळेच ते विकासाच्या मुद्द्यावर, बेरोजगारीच्या मुद्द्यावर राजकारण करू शकत नाहीत. त्यातूनच ते अयोध्येनंतर आता काशी, मधूरा असेच बोलत राहणार. काँग्रेसला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचे असते. तशा प्रकारच्या राजकारणावरच आम्ही काम करत आलो आहोत.काँग्रेसचे अनेक नेते भाजपची वाट धरत आहेत याकडे लक्ष वेधल्यानंतर चेन्नीथला म्हणाले, जे पदाच्या मागे धावतात तेच असा बदल करतात. भाजपकडे नेतेही नाहीत, त्यामुळे ते कधी इडीची धमकी देऊन तर कधी पदांची लालूच दाखवून अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेतात. कोणी असे जात असेल तर त्याचे आम्हाला काही वाटत नाही, याचे कारण असे लोक कुठेही जात असतात.

काँग्रेस आता देशातील भाजप विरोधकांमध्ये ऐक्य करण्याच्या प्रयत्नात आहे. तो एकोपा आम्हाला वाढवायचा आहे. इंडिया आघाडीत अनेक पक्ष आहेत, जागा वाटप आम्ही एकमेकांना समजून घेऊन करू, प्रकाश आंबेडकर आमच्या बरोबर यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते येतील. अजूनही बरेच जाण आहेत. इंडिया आघाडी भक्कम होईल असा दावा चेन्नीथला यांनी केला.

राहूल गांधी यांची भारत न्याय यात्रा उधळून लावण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप चेन्नीथला यांनी केला. यात्रेत अडथळा निर्माण केला जात आहे. पोलिसांची परवानगी नाकारणे, प्रवेश बंदी करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. राहूल गांधी यांची ही यात्रा न्याय मागण्यासाठीची यात्रा आहे, नागरिकांचा यात्रेला मिळणारा प्रतिसादच त्यांना त्रासदायक होतो आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे