शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राखीपोर्णिमेचे आयाम बदलाहेत! नवा दृष्टीकोन : रक्षा बहिणी-बहिणींची..स्वत:चीही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 21:29 IST

कोणताही सण ही पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही...

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : भावाने बहिणीचे रक्षण करावे, तिला जपावे या भावनेतून भारतीय संस्कृतीमध्ये राखीपोर्णिमेचा सण साजरा केला जातो. कालानुरुप सणांमागील संकल्पना बदलत आहेत. बदलत्या काळात स्त्री सक्षम झाली, स्वत:चे रक्षण करण्याची ताकद तिच्यात निर्माण झाली. त्यामुळेच आता राखीपोर्णिमा अनोख्या पध्दतीने साजरी केली जात आहे. बहिणीने बहिणीला राखी बांधण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जोर धरु लागला आहे. अनेक शाळांमध्येही मुलांमध्ये हा नवा दृष्टीकोन विकसित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.राखीचा धागा हा भाऊ-बहिणीच्या स्नेहबंधाचे प्रतीक मानला जातो. पूर्वीच्या काळी स्त्रियांवर अनेक सामाजिक बंधने होती. राखीपोर्णिमेच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या घरी जायचा. त्याच्याशी मनमोकळया गप्पा मारत तिला माहेरची ख्यालीखुशाली कळायची. हळूहळू समाजाची मानसिकता बदलली, स्त्री घराबाहेर पडू लागली. आकांक्षेच्या पंखांवर स्वार होत तिने गरुडझेप घेतली आणि कर्तृत्व सिध्द केले. सणांच्या पारंपरिक महत्वाची चिकित्सा होऊ लागली. सण-समारंभांना आधुनिक आयाम मिळू लागले. यातूनच नवा दृष्टीकोन विकसित होत गेला.अनेक कुटुंबांमध्ये मुलींचे मुलाप्रमाणे संगोपन करत समानतेचा धडा गिरवला जातो. कोणताही सण ही पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही. त्याचप्रमाणे राखीपोर्णिमेलाही केवळ बहिणीने भावाला राखी बांधावी, हा पूर्वापार चालत आलेला समज मोडीत निघाला आहे. आम्ही चार बहिणी; भाऊ नाही याचे कधीही दु:ख वाटले नाही. आम्ही बहिणी लहानपणापासून एकमेकींना राखी बांधत राखीपोर्णिमेचा सण साजरा करतो, अशी भावना अमृता देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.-------------कोणत्याही बदलाची सुरुवात ही घरापासून होत असते. बदलत्या आयामांचे संस्कार शाळेतूनही होत असतात. माझा मुलगा पहिलीत आहे. परवाच त्यांच्या शाळेत राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक पार पाडले. तेव्हाच राखीपोर्णिमेला भाऊ-भाऊ एकमेकांना किंवा बहिणी एकमेकींना राखी बांधू शकतात, असे शिक्षकांनी सांगितल्याचे त्याने घरी येऊन सांगितले. शाळेने दिलेली ही नवी शिकवण मुलांच्या घडवण्याच्या दृष्टीने मला अत्यंत कौतुकास्पद वाटते.- सानिका जोशी, पालक--------------राखीपोर्णिमेचा असाही आयाम!अनेक घरांमध्ये मुलगी वडिलांना, भाऊ बहिणीला आणि आईला राखी बांधण्याची पध्दत प्रचलित आहे. कोणतेही नाते दृढ होणे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यामुळे राखीपोर्णिमेच्या निमित्ताने हे बंध घट्ट करण्यावर भर दिला जात आहे.---------स्वत:लाच राखी बांधते!राखी म्हणजे सुरक्षिततेचा बंध असे म्हटले जाते. मी लहानपणापासून भावाला राखी बांधते. मोठी झाल्यावर मी शिक्षण, नोकरीनिमित्त एकटी घराबाहेर पडू लागले. बाहेर वावरत असताना स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावरच असते. मग राखीचा मान मीच मला का देऊ नये? हा विचार मनात आला. त्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून मी स्वत:लाच राखी बांधते.- पूजा मनीष 

टॅग्स :PuneपुणेRaksha Bandhanरक्षाबंधन