शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Raju Shetty : आडवा येईल त्याला तुडवायचा, राजू शेट्टींनी सांगितली आगामी वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 22:47 IST

पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषेदत राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या

ठळक मुद्देराज्यातील शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात तीन हजार तीनशे एवढी एफआरपीची रक्कम द्यावी आणि राहिलेली रक्कम जानेवारीपर्यत द्यावी

पुणे - जो शेतकरीहिताच्या आडवा येईल, त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच, मी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज अन् भाजप सरकारवर खूश आहे, असं नाही, माझी वाटचाल शेतकऱ्यांच्या हितासाठीचीच असणार आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. 

पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषेदत राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांची एफआरपीबाबत बैठक झाली. जयसिंगपूर येथे ता. १९ ऑक्टोबर रोजी ऊस परिषद झाली, त्यात काही ठराव झाले होते, त्याची प्रत आयुक्त गायकवाड यांना देण्यात आली आहे. साखर कारखान्यांनी गाळप झालेल्या उसाची एकरक्कमी एफआरपी दिली पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

राज्यातील शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात तीन हजार तीनशे एवढी एफआरपीची रक्कम द्यावी आणि राहिलेली रक्कम जानेवारीपर्यत द्यावी. सध्या, ती तुकड्या तुकड्यात दिला जात आहे, शेतकऱ्यांचे पैसे कारखानदारांकडे ३२ महिने राहतात, त्याच्या व्याजाचं काय, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच, साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे झाल्याचेही म्हटले. दरम्यान, राज्यात ९ लाख ऊसतोडणी कामगार आहेत. उसतोडणी मजुरांच्या गोपीनाथ मुंडे महामंडळला केंद्र सरकारने मदत करावी. ऊसतोडणी मजुरांची नावनोंदणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणेFarmerशेतकरी