शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजन खान यांचा अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 20:05 IST

बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुणे : बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे अर्ज सुपूर्त केला. खान यांच्या अर्जावर सूचक म्हणून लेखक संजय भास्कर जोशी यांची, तर अनुमोदक म्हणून संतोष शेणई, संदेश भांडारे, भारत देसडला, रमेश राठीवडेकर आणि गोपाळ कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.खान म्हणाले, 'संमेलनाध्यक्षपद एका वर्षासाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी नसते. मी पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. तरीही कोणतेही आदरणीय, ज्येष्ठ नाव समोर आल्यास माघार घेण्याची माझी तयारी असेल.'लेखक, कार्यकर्ता म्हणून मी आजवर काम करत आलो आहे. लेखकाची ओळख मर्यादित असते. सम्मेलनाध्यक्ष पदाला महाराष्ट्रात वलय, आदराचे स्थान आहे. त्यामुळे लेखकाच्या कामाला संम्मेलनाध्यक्षपदाच्या वलयाचा निश्चित उपयोग होतो. राज्यात, देशभरात अनेक छोटी संमेलने होत असली तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्यामुळे संमेलनाकडे गांभीर्याने पहायला हवे, असेही ते म्हणाले.संमेलने खर्चिक होत आहेत, अशी टीका होत असली तरी साहित्याचा सोहळा दिमाखदार होत असेल तर कद्रु तक्रार करण्यात अर्थ नाही. साहित्यासाठी खर्च झालेला पैसा कधीच वाया जात नाही. याउलट, खर्च काळानुसार वाढला पाहिजे, अशी टिपण्णी खान यांनी केली. जात, धर्म बाजूला सारून सर्व लेखकांनी मराठीतील एक कुटुंब म्हणून समान पातळीवर आले पाहिजे. मराठी भाषेने देशाचे भाषिक, राजकीय नेतृत्व केले आहे. त्यामुळे मराठी कधीही मरणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे